शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

...असा ठणठणपाळ पुन्हा होणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:31 IST

‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करत लेखक-साहित्यिकांची चेष्टामस्करी करणारे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. भरदार मिशा आणि हातात लाकडी टोला धारण केलेले ठणठणपाळचे चित्र म्हणजे साहित्यिकांसाठी मेजवानीच असायची. ललित मासिकात नेमाने प्रसिद्ध होणाऱ्या या सदरातून अनेकांच्या टोप्या उडविल्या जायच्या. त्यामुळे ठणठणपाळचे नेमके लेखक कोण, याबाबत साहित्यविश्वात कमालीची उत्सुकता होती...

- रामदास भटकळसंस्थापक, पॉप्युलर प्रकाशन  

ललित’ मासिक उघडल्यावर बहुतेक वाचक आधी ‘घटका गेली, पळे गेली’ हे सदर वाचायचे. विशेषतः ग्रंथव्यवसायातली मंडळी तर आपल्यावर गदा उगारली गेली नाही ना, ते पाहायला उत्सुक असायची. काहींना ते हवेहवेसेही वाटायचे. ठणठणपाळ गुद्दे कमी मारायचे, क्वचित चिमटे काढायचे; पण, बहुतेक वेळा गुदगुल्या करायचे. बहुतेक समीक्षक साहित्याकडे अतिगंभीरपणे पाहतात. दुर्बोध साहित्य उलगडून सांगण्यासाठी केलेली समीक्षा ही बऱ्याचदा मुळाहून गहन असते. ठणठणपाळ यांना फक्त साहित्यिकांच्या वैयक्तिक लकबींमध्ये रस नव्हता, तर साहित्यातही होता. त्यांच्या सदरातून त्या काळच्या लेखनाबद्दल आणि साहित्यिक घडामोडींबद्दल वाचकांना खूप काही कळायचे. फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी ही अर्कचित्रे काढणाऱ्या कार्टुनिस्टची होती, किंबहुना वसंत सरवटे यांच्या त्या सोबतच्या कार्टुन्सनी बहार यायची, हे लेखन वाचताना हा ठणठणपाळ कानपिचक्या घेणारा कोणी मुंबईकर विनोदी लेखक असावा, इतपत लक्षात यायचे. तरी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात बऱ्यापैकी यश लाभले होते.

त्या दिवसांत गिरगावातील बॉम्बे बुक डेपोत दरवर्षी स्वाक्षरी सप्ताह साजरा होत असे. त्या दहा वर्षांत आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर अशा शंभरहून अधिक साहित्यिकांनी हजेरी लावली. वाचकांना आपल्या आवडत्या लेखकाला भेटून त्यांची स्वाक्षरी घेण्याची संधी मिळत असे. एकदा पांडुरंग कुमठांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले ठणठणपाळ यांना बोलावण्याचे ठरवले, त्यांचे नाव उघड करू नये, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानंतर त्यांना मोकळेपणाने लिहिणे कठीण होईल, अशी भीती होती. त्यांचे जे सरवटेनिर्मित चित्र ‘ललित ‘मध्ये दरमहा यायचे त्याचा एक मोठा कटआऊट करण्यात आला. त्यामागे लपून ठणठणपाळ अशी सही वाचकांना मिळत असे. बराच काळ हा लपंडाव चालू राहिला. मग कोणा मित्राला राहवले नाही आणि त्यांच्या आर्जवामुळे जयवंत दळवी प्रगट झाले. त्यांच्या जन्मशताब्दीमुळे याची विशेष आठवण येते.

वास्तविक दळवी हे कथाकार, ‘चक्र’, ‘सारे प्रवासी घडीचे’सारख्या कादंबऱ्या, ‘बॅरिस्टर’, ‘महानगर’सारखी गंभीर विषयांवरची नाटके लिहून वाचकांना अंतर्मुख करणारे लेखक. त्यांना ग्रंथकर्मीची टोपी उडवायलाही आवडायचे. गंगाधर गाडगीळ मिश्किलीसाठी जसे बंडू स्नेहलतासोबत खेळायचे तसे दळवी ठणठणपाळाच्या अवतारात. त्यांनी स्वतंत्रपणे विनोदी कथाही लिहिल्या. पण त्यांतही निष्पाप सहजता नव्हती. ठणठणपाळाने कोणालाही सोडले नाही. साहित्याकडे गंभीरपणाने पाहणारे प्राध्यापक वा. ल. कुळकर्णी हे या निर्विष विनोदाचे कौतुक करायचे. साहित्य वर्तुळापासून जाणीवपूर्वक लांब राहणारे धारवाडचे जी. ए. कुलकर्णी वाचताना मिटक्या मारायचे. दळवींच्या या लेखनामागे साहित्यातील प्रवाहांची, मानवी स्वभावाची जाण होती. त्यामुळे त्या वाचताना मिटक्या लेखनाला फक्त टिंगलटवाळीचे रूप आले नाही. त्या काळात वाचकांना संदर्भ माहीत असण्याची अधिक शक्यता खरी, पण आज इतक्या वर्षानंतरही या लेखनाची खुमारी अवर्णनीय.

दळवी अमेरिकन माहिती केंद्रात अधिकारी होते. ‘पीएएल ४८०’ नामक एका अजस्र फंडाची जबाबदारी त्यांच्यावर होती. यामार्फत शेकडो पुस्तकांची मराठीत भाषांतरे झाली. यानिमित्ताने अनेक मराठी लेखक, प्रकाशकांशी त्यांचा जवळचा संबंध आला. ज्या सचोटीने सहृदयतेने आणि चोखंदळपणे त्यांनी हे काम केले. त्याने बहुतेक सगळे त्यांचे प्रशंसक झाले. कोणाबद्दल काहीही लिहिले तरी ते मांजरीच्या दातांसारखे इजा करत नसत. दळवींच्या आधी काही दिवस आणि नंतर बराच काळ वेगवेगळ्या लेखकांनी असे नर्मविनोदी सदर लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना ठणठणपाळ होणे शक्य झाले नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र