शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

समन्वयवादी, वैचारिक दिशा देणारे ‘रावसाहेब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:39 IST

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.

- प्रा. संतोष पद्माकर पवार, ज्येष्ठ कवी

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाच्या निमित्ताने कसबे यांनी ‘झोत’ या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण चिकित्सा करून संघाचा दांभिकपणा उघड केला. संघाबाबत मोठी खळबळ उडवून दिली. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा फॅसिस्ट चेहरा समोर आला. गोळवलकरांच्या या पुस्तकातील अनेक मुद्दे अगदी अलीकडे संघाला मागे घ्यावे लागले.ऐंशीच्या दशकात कसबे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीला आविष्कृत करायला सुरुवात केली. इंदिरा गांधींचे आणीबाणी युग आणि त्यातून संघ आणि समाजवादी लोकांनी एकमेकांशी मैत्री केल्याच्या पार्श्वभूमीवर कसबे यांचे लेखन समाजवाद्यांची एक प्रकारे कानउघाडणी करणारे होते़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या चळवळीतील नेतृत्वाने तडजोडवादी राजकारण केले. फक्त आंबेडकर म्हणविणारे ‘निळे’ आणि फक्त मार्क्स म्हणणारे ‘डावे’ राजकारण यांच्या वैचारिक संघर्षात कसबे यांनी समन्वयाची भूमिका घेत समतोल साधला. ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हा ग्रंथ त्यातूनच आल्याचे दिसते. त्यांना मार्क्सवादी ठरविण्याचेदेखील प्रयत्न झाले. सत्यशोधक मार्क्सवादाची भूमिका घेणारे शरद पाटील यांनीदेखील कसबे यांच्या भूमिकेची चिकित्सा केली आहे. ती वाचण्याजोगी आहे.पुरोगामी चळवळीत ताठर भूमिका घेऊन चळवळीचे नुकसान करणाऱ्यांना कसबे हे कायम अडचणीचे ठरले. गांधी-आंबेडकर यांच्या संबंधाबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांची अत्यंत कडवट भूमिका असताना कसबे हे तसा विचार कधीही करत नाहीत. उलट गांधीविरोधाने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाल्याचे मत मांडतात. आक्रमक मांडणी हा त्यांच्या वक्तृत्वाचा गुणविशेष आहे. त्यांचे लेखन या वक्तृत्वाचे पुढचे उपयोजन आहे. झोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार, देशीवाद समाज व साहित्य, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, भक्ती आणि धम्म, मानव आणि धर्मचिंतन, हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद या सर्व ग्रंथांची निर्मिती आणि त्यांचा कालावधी यांचा खूप निकटचा संबंध असून त्या-त्या काळात उपयुक्त राजकीय, वैचारिक भूमिका घेत त्यांनी या ग्रंथांचे लेखन केले.नाशिकच्या लोस्ली सोनी सेंटरमध्ये एका व्याख्यानातून त्यांचा मे. पुं. रेगे यांच्यासोबत झालेला जाहीर वाद अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या जातीची आडवी रचना पुरस्काराचा कसबे यांनी देशीवादाचा संदर्भ घेऊन मोठा प्रतिवाद केला. त्यांनी आयुष्यभर पुरोगामित्वाचा प्रसार आणि प्रचार केला. मात्र पुरोगामी म्हणवून घेणाºयांनाच कसबे पेलवले नाहीत.महाराष्ट्रात प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी, ‘हे सरकार मराठेतर सवर्णांचे आणि महारेतर दलितांचे’ असल्याचे म्हटले. कसबे हे शिवशक्ती-भीमशक्तीचे पुरस्कर्ते असल्याचा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र त्यांचे हे आकलन तटस्थ होते. शिवसेनेचे हिंदुत्व हे सरधोपट आहे आणि ते भाजप, विहिंपसारखे त्रिशूळासारखे टोकदार नाही हेही त्यांनी मांडले.चाचपडणाºया काळात धाडसी भूमिका घेणे, आपले खासगी सिद्धान्त मांडत मोठ्या प्रश्नाला भिडणे हे त्यांचे वैशिष्ट्य़ म्हणूनच लाखोंचे मराठा मोर्चे निघत असताना मराठा समाजातील सरंजामी घटक आणि त्यातील उतरंडीवर बोलत ओबीसी घटकांच्या हक्कासाठी कसबे मुलाखती देत होते. असे धाडस दाखविणारे विचारवंत विरळे आहेत. ते सरधोपट कार्यकर्तेगिरी करणारे विचारवंत नाहीत. डोळसपणे बघणे हा त्यांचा बाणा आहे. तत्त्वज्ञान मांडताना स्वजातीला गोंजारण्यात त्यांनी धन्यता मानलेली नाही. बाबरी पाडल्यानंतर मुस्लीम प्रश्नाची मांडणी करून इस्लामच्या परिवर्तनाची गरज त्यांनी प्रतिपादन करीत मुस्लिमांचे प्रबोधन आणि उत्थान यावर भर दिला. हे करताना त्यांनी सावरकरांच्या नवमतवादावर कोरडे ओढले. अनेक छोट्या-मोठ्या संमेलनांत कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून गेले. वैचारिक साहित्याप्रमाणेच ललित साहित्याशीही त्यांचा अनुबंध आहे. विखे पाटील साहित्य पुरस्कार निवडीत त्यांनी निवडलेल्या साहित्यकृतींना पुढे साहित्य अकादमी मिळाली. यातूनही त्यांचे आकलन व दूरदृष्टी दिसून येते.

‘झोत’ या ग्रंथाची चाळिशी आणि त्याचे लेखन करणाºया डॉ. रावसाहेब कसबे यांचा अमृतमहोत्सव असा दुहेरी कार्यक्रम आज संगमनेर (जि. अहमदनगर) येथे समाजवादी संमेलनात होत आहे.