शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

समन्वयवादी, वैचारिक दिशा देणारे ‘रावसाहेब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:39 IST

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.

- प्रा. संतोष पद्माकर पवार, ज्येष्ठ कवी

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाच्या निमित्ताने कसबे यांनी ‘झोत’ या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण चिकित्सा करून संघाचा दांभिकपणा उघड केला. संघाबाबत मोठी खळबळ उडवून दिली. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा फॅसिस्ट चेहरा समोर आला. गोळवलकरांच्या या पुस्तकातील अनेक मुद्दे अगदी अलीकडे संघाला मागे घ्यावे लागले.ऐंशीच्या दशकात कसबे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीला आविष्कृत करायला सुरुवात केली. इंदिरा गांधींचे आणीबाणी युग आणि त्यातून संघ आणि समाजवादी लोकांनी एकमेकांशी मैत्री केल्याच्या पार्श्वभूमीवर कसबे यांचे लेखन समाजवाद्यांची एक प्रकारे कानउघाडणी करणारे होते़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या चळवळीतील नेतृत्वाने तडजोडवादी राजकारण केले. फक्त आंबेडकर म्हणविणारे ‘निळे’ आणि फक्त मार्क्स म्हणणारे ‘डावे’ राजकारण यांच्या वैचारिक संघर्षात कसबे यांनी समन्वयाची भूमिका घेत समतोल साधला. ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हा ग्रंथ त्यातूनच आल्याचे दिसते. त्यांना मार्क्सवादी ठरविण्याचेदेखील प्रयत्न झाले. सत्यशोधक मार्क्सवादाची भूमिका घेणारे शरद पाटील यांनीदेखील कसबे यांच्या भूमिकेची चिकित्सा केली आहे. ती वाचण्याजोगी आहे.पुरोगामी चळवळीत ताठर भूमिका घेऊन चळवळीचे नुकसान करणाऱ्यांना कसबे हे कायम अडचणीचे ठरले. गांधी-आंबेडकर यांच्या संबंधाबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांची अत्यंत कडवट भूमिका असताना कसबे हे तसा विचार कधीही करत नाहीत. उलट गांधीविरोधाने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाल्याचे मत मांडतात. आक्रमक मांडणी हा त्यांच्या वक्तृत्वाचा गुणविशेष आहे. त्यांचे लेखन या वक्तृत्वाचे पुढचे उपयोजन आहे. झोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार, देशीवाद समाज व साहित्य, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, भक्ती आणि धम्म, मानव आणि धर्मचिंतन, हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद या सर्व ग्रंथांची निर्मिती आणि त्यांचा कालावधी यांचा खूप निकटचा संबंध असून त्या-त्या काळात उपयुक्त राजकीय, वैचारिक भूमिका घेत त्यांनी या ग्रंथांचे लेखन केले.नाशिकच्या लोस्ली सोनी सेंटरमध्ये एका व्याख्यानातून त्यांचा मे. पुं. रेगे यांच्यासोबत झालेला जाहीर वाद अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या जातीची आडवी रचना पुरस्काराचा कसबे यांनी देशीवादाचा संदर्भ घेऊन मोठा प्रतिवाद केला. त्यांनी आयुष्यभर पुरोगामित्वाचा प्रसार आणि प्रचार केला. मात्र पुरोगामी म्हणवून घेणाºयांनाच कसबे पेलवले नाहीत.महाराष्ट्रात प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी, ‘हे सरकार मराठेतर सवर्णांचे आणि महारेतर दलितांचे’ असल्याचे म्हटले. कसबे हे शिवशक्ती-भीमशक्तीचे पुरस्कर्ते असल्याचा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र त्यांचे हे आकलन तटस्थ होते. शिवसेनेचे हिंदुत्व हे सरधोपट आहे आणि ते भाजप, विहिंपसारखे त्रिशूळासारखे टोकदार नाही हेही त्यांनी मांडले.चाचपडणाºया काळात धाडसी भूमिका घेणे, आपले खासगी सिद्धान्त मांडत मोठ्या प्रश्नाला भिडणे हे त्यांचे वैशिष्ट्य़ म्हणूनच लाखोंचे मराठा मोर्चे निघत असताना मराठा समाजातील सरंजामी घटक आणि त्यातील उतरंडीवर बोलत ओबीसी घटकांच्या हक्कासाठी कसबे मुलाखती देत होते. असे धाडस दाखविणारे विचारवंत विरळे आहेत. ते सरधोपट कार्यकर्तेगिरी करणारे विचारवंत नाहीत. डोळसपणे बघणे हा त्यांचा बाणा आहे. तत्त्वज्ञान मांडताना स्वजातीला गोंजारण्यात त्यांनी धन्यता मानलेली नाही. बाबरी पाडल्यानंतर मुस्लीम प्रश्नाची मांडणी करून इस्लामच्या परिवर्तनाची गरज त्यांनी प्रतिपादन करीत मुस्लिमांचे प्रबोधन आणि उत्थान यावर भर दिला. हे करताना त्यांनी सावरकरांच्या नवमतवादावर कोरडे ओढले. अनेक छोट्या-मोठ्या संमेलनांत कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून गेले. वैचारिक साहित्याप्रमाणेच ललित साहित्याशीही त्यांचा अनुबंध आहे. विखे पाटील साहित्य पुरस्कार निवडीत त्यांनी निवडलेल्या साहित्यकृतींना पुढे साहित्य अकादमी मिळाली. यातूनही त्यांचे आकलन व दूरदृष्टी दिसून येते.

‘झोत’ या ग्रंथाची चाळिशी आणि त्याचे लेखन करणाºया डॉ. रावसाहेब कसबे यांचा अमृतमहोत्सव असा दुहेरी कार्यक्रम आज संगमनेर (जि. अहमदनगर) येथे समाजवादी संमेलनात होत आहे.