शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

विचारांचा करा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:08 IST

जीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच.

- प्रल्हाद वामनराव पैजीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. त्यासाठीच आतापर्यंत आपण व्यवसाय व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, अर्थ व्यवस्थापन इ. शिकत आलोय. पण हे सर्व शिकत असतानाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपण जीवन जगत असतो. करिअर, कुटुंब, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध या सर्वांचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध येत असतो. म्हणूनच जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमणे खूप गरजेचे आहे. त्यालाच आपण लाइफ मॅनेजमेंट असे म्हणतो. सदगुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवनविद्या हे शास्त्र आहे. पण जेव्हा हे शास्त्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणतो तेव्हा ती जीवन जगण्याची कला होते. आयुष्यात आपल्याला सतत यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण काय करतो...? आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यांना देऊन मोकळे होतो. उद्योगधंद्यात अपयश आले तर वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी यांना दोष देतो. नातेसंबंधात आपण नेहमीच दुसºयांनाच दोषी ठरवतो आणि अगदीच कोणी सापडले नाही तर दैवाला, नशिबाला दोष देण्यात तर आपली मास्टरीच असते. काही लोक तर सगळीकडे सांगत फिरतात, ‘वक्त से पहले और नसिब से ज्यादा इन्सान को कुछ नही मिलता.’ त्यांचे हे वाक्य कोळून प्यायल्यासारखी मग त्यापुढची पिढी वागू लागते आणि समाजात अशा प्रकारे गैरसमज वाढत जातात. जर दैवात असेल तसेच घडणार असेल तर आपण काम, प्रयत्न कशाला करायचे किंवा जर नशिबात नापास होणार असे लिहिले असेल तर अभ्यासच कशाला करायचा अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. खरे तर अपयशाचे खापर इतरांवर आणि यशाचे कर्तृत्व स्वत:कडे घेणे हा माणसाचा स्वभावगुण आहे. सदगुरू सांगतात, ‘जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच.’ थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या आयुष्यात जो काही परिणाम आहे मग ते यश असेल किंवा अपयश असेल. आपण त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक