शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचा करा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:08 IST

जीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच.

- प्रल्हाद वामनराव पैजीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. त्यासाठीच आतापर्यंत आपण व्यवसाय व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, अर्थ व्यवस्थापन इ. शिकत आलोय. पण हे सर्व शिकत असतानाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपण जीवन जगत असतो. करिअर, कुटुंब, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध या सर्वांचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध येत असतो. म्हणूनच जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमणे खूप गरजेचे आहे. त्यालाच आपण लाइफ मॅनेजमेंट असे म्हणतो. सदगुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवनविद्या हे शास्त्र आहे. पण जेव्हा हे शास्त्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणतो तेव्हा ती जीवन जगण्याची कला होते. आयुष्यात आपल्याला सतत यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण काय करतो...? आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यांना देऊन मोकळे होतो. उद्योगधंद्यात अपयश आले तर वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी यांना दोष देतो. नातेसंबंधात आपण नेहमीच दुसºयांनाच दोषी ठरवतो आणि अगदीच कोणी सापडले नाही तर दैवाला, नशिबाला दोष देण्यात तर आपली मास्टरीच असते. काही लोक तर सगळीकडे सांगत फिरतात, ‘वक्त से पहले और नसिब से ज्यादा इन्सान को कुछ नही मिलता.’ त्यांचे हे वाक्य कोळून प्यायल्यासारखी मग त्यापुढची पिढी वागू लागते आणि समाजात अशा प्रकारे गैरसमज वाढत जातात. जर दैवात असेल तसेच घडणार असेल तर आपण काम, प्रयत्न कशाला करायचे किंवा जर नशिबात नापास होणार असे लिहिले असेल तर अभ्यासच कशाला करायचा अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. खरे तर अपयशाचे खापर इतरांवर आणि यशाचे कर्तृत्व स्वत:कडे घेणे हा माणसाचा स्वभावगुण आहे. सदगुरू सांगतात, ‘जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच.’ थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या आयुष्यात जो काही परिणाम आहे मग ते यश असेल किंवा अपयश असेल. आपण त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक