शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

विचारांचा करा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:08 IST

जीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच.

- प्रल्हाद वामनराव पैजीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. त्यासाठीच आतापर्यंत आपण व्यवसाय व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, अर्थ व्यवस्थापन इ. शिकत आलोय. पण हे सर्व शिकत असतानाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपण जीवन जगत असतो. करिअर, कुटुंब, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध या सर्वांचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध येत असतो. म्हणूनच जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमणे खूप गरजेचे आहे. त्यालाच आपण लाइफ मॅनेजमेंट असे म्हणतो. सदगुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवनविद्या हे शास्त्र आहे. पण जेव्हा हे शास्त्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणतो तेव्हा ती जीवन जगण्याची कला होते. आयुष्यात आपल्याला सतत यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण काय करतो...? आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यांना देऊन मोकळे होतो. उद्योगधंद्यात अपयश आले तर वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी यांना दोष देतो. नातेसंबंधात आपण नेहमीच दुसºयांनाच दोषी ठरवतो आणि अगदीच कोणी सापडले नाही तर दैवाला, नशिबाला दोष देण्यात तर आपली मास्टरीच असते. काही लोक तर सगळीकडे सांगत फिरतात, ‘वक्त से पहले और नसिब से ज्यादा इन्सान को कुछ नही मिलता.’ त्यांचे हे वाक्य कोळून प्यायल्यासारखी मग त्यापुढची पिढी वागू लागते आणि समाजात अशा प्रकारे गैरसमज वाढत जातात. जर दैवात असेल तसेच घडणार असेल तर आपण काम, प्रयत्न कशाला करायचे किंवा जर नशिबात नापास होणार असे लिहिले असेल तर अभ्यासच कशाला करायचा अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. खरे तर अपयशाचे खापर इतरांवर आणि यशाचे कर्तृत्व स्वत:कडे घेणे हा माणसाचा स्वभावगुण आहे. सदगुरू सांगतात, ‘जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच.’ थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या आयुष्यात जो काही परिणाम आहे मग ते यश असेल किंवा अपयश असेल. आपण त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक