शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ते गरजतात, हे गुरगुरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:16 IST

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो.

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो. ते गर्जना करणार आणि हे नुसतेच गुरगुरणार. तशीही मोठ्या संघटनेसमोर व राष्ट्रीय पातळीवर सत्तास्थित असणाऱ्या पक्षासमोर प्रादेशिक पातळीवरच खुरटलेल्या पक्षांची व त्यांच्या पुढा-यांची उंची, वजन, स्थान आणि त्यांचे बलाबल जोखण्याची क्षमता आता जनतेने प्राप्त केली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गुरगुरतात, दरदिवशी नव्या कुरापती पुढे करतात, स्थानिक प्रश्नांवरच्या त्यांच्या तक्रारीही बºयाच असतात. पण भाजपचे सत्तावान त्यांची फारशी दखल घेताना कधी दिसत नाहीत. फडणवीस ती घेत नसतील तर मोदींकडून तशी अपेक्षाही करायची नसते. मोदींचा पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. २१ राज्यात सत्ताधारी आहे. महाराष्ट्रातही तो मुख्यमंत्रिपदावर आहे आणि त्याने सेनेला येथे जेमतेम चार आणि तीही बिनामहत्त्वाची मंत्रिपदे दिली आहेत. केंद्रातला तिचा मंत्री बाळासाहेबांच्या भाषेत ‘नुसता रिकाम्या बॅगा घेऊन फिरत असतो’. सभा समारंभाची निमंत्रणे असतात, त्यात व्यासपीठावर जागाही मिळते, प्रसंगी एखाददुसरा कौतुकाचा शब्दही ऐकविला जातो. पण सारे तेवढ्यावरच थांबते. जास्तीची मंत्रिपदे नाहीत, महत्त्वाची खाती नाहीत आणि केंद्रातही फारशी वट नाही. ही स्थिती जेवढी दयनीय तेवढीच आपल्या अस्तित्वाची दखल ठेवण्यासाठी अधूनमधून कुरघोडी करायला लावण्याइतपतच महत्त्वाची उरली असते. शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत जाता येत नाही आणि आता तसेही पवारांनी त्यांचे नाते काँग्रेसशी असल्याचे व ते राहणार असल्याचे सांगून टाकले आहे. तिचे शेतकरी कामगार पक्षाशीही जुळणारे आहे, रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही तुकड्याला तिची मैत्री चालणारी नाही आणि पक्षात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा कोणताही पक्ष तिला जवळ करणार नाही. ही एकाकी अवस्था सेनेपुढे केवळ दोन पर्याय ठेवणारी आहे. एकतर तिने स्वबळावर लढायचे किंवा भाजपच्या आश्रयाने उभे राहायचे. याआधी सेनेने स्वबळावर निवडणूक लढविली आहे, तीत तिला आपले उमेदवार भाजपच्या उमेदवाराएवढ्या संख्येने विजयी करणे जमले नाही. भाजपला सेनेची साथ हवी असतानाही, केवळ पवारांच्या शब्दावर विसंबून राहून त्या पक्षाने राज्यात आपले सरकार आणले. पवारांची ती साथ सेनेला खाली पहायला लावणारी आणि, तुम्ही नाही तर आम्ही, आपला नाही तर बाहेरचा पाठिंबा असे करून सेनेला नमविणारी होती. भाजपने सेनेची ताकद व तिच्या डरकाळीचा प्रभाव तेव्हा जोखला आहे. नंतरच्या काळात देतील ते पदे घेऊन सेना फडणवीसांसोबत गेली. गेल्या तीन-चार वर्षात भाजपने सेनेला आणखी दुबळे केले आहे. सेनेचे नेतृत्व प्रादेशिक व तिला मर्यादाही महाराष्ट्राची. त्यामुळे सेनेत जाऊनही एखाद्याला आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्याची सोय नाही. परिणामी नेत्यांएवढेच अनुयायीही प्रादेशिकच. त्यांची भाषा, विषय आणि आवाकाही प्रादेशिक. मग मोठी माणसे येत नाहीत आणि आहेत तीच जपायची असतात. सेनेची ही अडचण शहांना समजते, मोदींना कळते आणि फडणवीसांनाही चांगली ठाऊक असते. पवारही तिच्या या कोंडीमुळे प्रसन्न असतात. याचमुळे ‘तुम्हाला आमच्या मागून येण्याखेरीज गत्यंतर नाही’ असे फडणवीस सेनेला स्पष्ट शब्दात ऐकवू शकतात. पूर्वी सेनेची समजूत घालायला महाजन जायचे, कधी मुंडे मातोश्रीवर हजेरी लावायचे, आता मुनगंटीवार जातात आणि सेनेची ‘समजूत’ घालून परत येतात. आपल्या वजनातील ही घट केवळ काळांमुळे नाही तर प्रकृतीमुळेही आहे हे सेनेला कळतच असणार. पण वाघ हा अखेरीस वाघच असतो. तो गवत खात नाही आणि डरकाळ्या फोडणे सोडतही नाही. आपला वचक ज्या बळावर कायम ठेवणे शक्य आहे ते बळ टिकवून धरणे एवढेच त्याचे राजकारण पुढल्या काळात चालत असते. शिवसेनेचे राजकारण आता असे आहे आणि ते भाजपवाल्यांएवढीच मराठी माणसांचीही करमणूक करणारे आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना