शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ते गरजतात, हे गुरगुरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:16 IST

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो.

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो. ते गर्जना करणार आणि हे नुसतेच गुरगुरणार. तशीही मोठ्या संघटनेसमोर व राष्ट्रीय पातळीवर सत्तास्थित असणाऱ्या पक्षासमोर प्रादेशिक पातळीवरच खुरटलेल्या पक्षांची व त्यांच्या पुढा-यांची उंची, वजन, स्थान आणि त्यांचे बलाबल जोखण्याची क्षमता आता जनतेने प्राप्त केली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गुरगुरतात, दरदिवशी नव्या कुरापती पुढे करतात, स्थानिक प्रश्नांवरच्या त्यांच्या तक्रारीही बºयाच असतात. पण भाजपचे सत्तावान त्यांची फारशी दखल घेताना कधी दिसत नाहीत. फडणवीस ती घेत नसतील तर मोदींकडून तशी अपेक्षाही करायची नसते. मोदींचा पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. २१ राज्यात सत्ताधारी आहे. महाराष्ट्रातही तो मुख्यमंत्रिपदावर आहे आणि त्याने सेनेला येथे जेमतेम चार आणि तीही बिनामहत्त्वाची मंत्रिपदे दिली आहेत. केंद्रातला तिचा मंत्री बाळासाहेबांच्या भाषेत ‘नुसता रिकाम्या बॅगा घेऊन फिरत असतो’. सभा समारंभाची निमंत्रणे असतात, त्यात व्यासपीठावर जागाही मिळते, प्रसंगी एखाददुसरा कौतुकाचा शब्दही ऐकविला जातो. पण सारे तेवढ्यावरच थांबते. जास्तीची मंत्रिपदे नाहीत, महत्त्वाची खाती नाहीत आणि केंद्रातही फारशी वट नाही. ही स्थिती जेवढी दयनीय तेवढीच आपल्या अस्तित्वाची दखल ठेवण्यासाठी अधूनमधून कुरघोडी करायला लावण्याइतपतच महत्त्वाची उरली असते. शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत जाता येत नाही आणि आता तसेही पवारांनी त्यांचे नाते काँग्रेसशी असल्याचे व ते राहणार असल्याचे सांगून टाकले आहे. तिचे शेतकरी कामगार पक्षाशीही जुळणारे आहे, रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही तुकड्याला तिची मैत्री चालणारी नाही आणि पक्षात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा कोणताही पक्ष तिला जवळ करणार नाही. ही एकाकी अवस्था सेनेपुढे केवळ दोन पर्याय ठेवणारी आहे. एकतर तिने स्वबळावर लढायचे किंवा भाजपच्या आश्रयाने उभे राहायचे. याआधी सेनेने स्वबळावर निवडणूक लढविली आहे, तीत तिला आपले उमेदवार भाजपच्या उमेदवाराएवढ्या संख्येने विजयी करणे जमले नाही. भाजपला सेनेची साथ हवी असतानाही, केवळ पवारांच्या शब्दावर विसंबून राहून त्या पक्षाने राज्यात आपले सरकार आणले. पवारांची ती साथ सेनेला खाली पहायला लावणारी आणि, तुम्ही नाही तर आम्ही, आपला नाही तर बाहेरचा पाठिंबा असे करून सेनेला नमविणारी होती. भाजपने सेनेची ताकद व तिच्या डरकाळीचा प्रभाव तेव्हा जोखला आहे. नंतरच्या काळात देतील ते पदे घेऊन सेना फडणवीसांसोबत गेली. गेल्या तीन-चार वर्षात भाजपने सेनेला आणखी दुबळे केले आहे. सेनेचे नेतृत्व प्रादेशिक व तिला मर्यादाही महाराष्ट्राची. त्यामुळे सेनेत जाऊनही एखाद्याला आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्याची सोय नाही. परिणामी नेत्यांएवढेच अनुयायीही प्रादेशिकच. त्यांची भाषा, विषय आणि आवाकाही प्रादेशिक. मग मोठी माणसे येत नाहीत आणि आहेत तीच जपायची असतात. सेनेची ही अडचण शहांना समजते, मोदींना कळते आणि फडणवीसांनाही चांगली ठाऊक असते. पवारही तिच्या या कोंडीमुळे प्रसन्न असतात. याचमुळे ‘तुम्हाला आमच्या मागून येण्याखेरीज गत्यंतर नाही’ असे फडणवीस सेनेला स्पष्ट शब्दात ऐकवू शकतात. पूर्वी सेनेची समजूत घालायला महाजन जायचे, कधी मुंडे मातोश्रीवर हजेरी लावायचे, आता मुनगंटीवार जातात आणि सेनेची ‘समजूत’ घालून परत येतात. आपल्या वजनातील ही घट केवळ काळांमुळे नाही तर प्रकृतीमुळेही आहे हे सेनेला कळतच असणार. पण वाघ हा अखेरीस वाघच असतो. तो गवत खात नाही आणि डरकाळ्या फोडणे सोडतही नाही. आपला वचक ज्या बळावर कायम ठेवणे शक्य आहे ते बळ टिकवून धरणे एवढेच त्याचे राजकारण पुढल्या काळात चालत असते. शिवसेनेचे राजकारण आता असे आहे आणि ते भाजपवाल्यांएवढीच मराठी माणसांचीही करमणूक करणारे आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना