शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ते माणसांना आणि देवालाही खेळवतात

By गजानन जानभोर | Updated: August 2, 2018 04:18 IST

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात.

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. त्यातून राजकारणी माणसे सोडली तर कुणाचेही भले होत नाही. देवाच्या तक्रारी सोडविणे फारच सोपे आणि तसे केल्याने लोकप्रियता लाभत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी यात अग्रभागी असतात. असे धार्मिक प्रश्न वणव्यात रूपांतरित झाले की समाजाची मती गुंग होते आणि त्याला आपल्या जगण्याच्या हक्कांचा कायम विसर पडतो. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नेमके हेच सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपुरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले जात आहे. लोकं त्याला विरोध करताहेत. त्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना राजकीय नेत्यांची फूस आहे. या पुढाऱ्यांना ही धार्मिक स्थळे आणि तेथील देवांबद्दल आस्था आहे, असे सामान्यांना वाटत असेल तर ती आपलीच फसवणूक आहे. या राजकारण्यांना लोकांच्या धर्मश्रद्धेचे भांडवल करायचे आहे. धार्मिक प्रश्न सतत चेतवत ठेवले की लोकं आपल्या नागरी समस्यांची चर्चा करीत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली निष्क्रियता दडून राहते ही गोष्ट या चलाख मंडळींना चांगली ठाऊक आहे. धार्मिक अतिक्रमणांना पाठिंबा देऊन ते जाणीवपूर्वक न्यायालयाचा अवमानही करीत आहेत आणि या अपराधात त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलेला सहभागही तेवढाच चिंताजनक आहे.अलीकडेच नागपुरात आलेल्या जलतांडवामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष अजूनही खदखदत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या नगरसेवकांना धार्मिक अतिक्रमणाच्या माध्यमातून अनायसे ‘देव’ आठवले आहेत. ही देवदुर्लभ संधी त्यांना सोडायची नाही. खेदाची बाब ही की, एरवी नगरसेवकांच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक आपल्या प्रभागातील साºया समस्या विसरून केवळ धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक धार्मिक स्थळ वाचवले की सामान्यांच्या जीवन-मरणाचे सारे प्रश्न सुटतात, लोकांच्या मनातील रोषही शमतो, हे या राजकारण्यांना ठाऊक आहे. एकदा ही सर्व अतिक्रमणे वाचवली की, हे निष्क्रिय नगरसेवक हिरो ठरतील आणि पुढच्या निवडणुकीत ते निवडूनही येतील.इथे नमूद करण्यासाठी आणखी एक गोष्ट, धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सामान्य नागरिकांचा विरोध नसतोच. हे राजकारणीच त्यांना भडकावतात. आधी अस्मिता चेतवायच्या व नंतर भडकलेल्या भावनांचा समूह आपल्यामागे कसा येईल, याची तजवीज करायची, हे घाणेरडे राजकारण केवळ नागपूरच नव्हे तर देशात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गरीब माणसाचा निवारा अनधिकृत ठरतो व ते दुबळे अतिक्रमण हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने सहज सोपेही असते. गरिबाची झोपडी तोडल्यानंतर जातसमूहाच्या भावना कधी दुखावत नाहीत आणि असे अतिक्रमण हटविणे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असल्याचे पुढारलेपणही करता येते. देवांच्या अतिक्रमणाबाबत मात्र तसे नाही. ते हटविता येत नाही. कुणी तसे धाडस केलेच तर धार्मिक भावना दुखावतात. प्रसंगी दंगलीही उसळतात आणि मग कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीच्या मतांसाठी ते ‘देव’ कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जातात. अशा धार्मिक अस्मितांचे अंगारे-धुपारे विझू नये यासाठी वर्षभर देवादिकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी रस्त्यावरच भरलेले महाप्रसाद, भंडारे न चुकता तुमची वाट पाहत असतातच. राजकारण्यांनी आपल्या मतलबासाठी भरवलेला हा देवाचा बाजार आहे, त्यातील आपण प्यादे आहोत. ते एकाचवेळी माणसांना आणि देवालाही खेळवत आहेत. देवाचे ठीक आहे, पण किमान माणसांनी तरी ही बदमाषी ओळखायला नको का?- गजानन जानभोर

टॅग्स :Templeमंदिर