शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ते माणसांना आणि देवालाही खेळवतात

By गजानन जानभोर | Updated: August 2, 2018 04:18 IST

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात.

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. त्यातून राजकारणी माणसे सोडली तर कुणाचेही भले होत नाही. देवाच्या तक्रारी सोडविणे फारच सोपे आणि तसे केल्याने लोकप्रियता लाभत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी यात अग्रभागी असतात. असे धार्मिक प्रश्न वणव्यात रूपांतरित झाले की समाजाची मती गुंग होते आणि त्याला आपल्या जगण्याच्या हक्कांचा कायम विसर पडतो. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नेमके हेच सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपुरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले जात आहे. लोकं त्याला विरोध करताहेत. त्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना राजकीय नेत्यांची फूस आहे. या पुढाऱ्यांना ही धार्मिक स्थळे आणि तेथील देवांबद्दल आस्था आहे, असे सामान्यांना वाटत असेल तर ती आपलीच फसवणूक आहे. या राजकारण्यांना लोकांच्या धर्मश्रद्धेचे भांडवल करायचे आहे. धार्मिक प्रश्न सतत चेतवत ठेवले की लोकं आपल्या नागरी समस्यांची चर्चा करीत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली निष्क्रियता दडून राहते ही गोष्ट या चलाख मंडळींना चांगली ठाऊक आहे. धार्मिक अतिक्रमणांना पाठिंबा देऊन ते जाणीवपूर्वक न्यायालयाचा अवमानही करीत आहेत आणि या अपराधात त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलेला सहभागही तेवढाच चिंताजनक आहे.अलीकडेच नागपुरात आलेल्या जलतांडवामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष अजूनही खदखदत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या नगरसेवकांना धार्मिक अतिक्रमणाच्या माध्यमातून अनायसे ‘देव’ आठवले आहेत. ही देवदुर्लभ संधी त्यांना सोडायची नाही. खेदाची बाब ही की, एरवी नगरसेवकांच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक आपल्या प्रभागातील साºया समस्या विसरून केवळ धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक धार्मिक स्थळ वाचवले की सामान्यांच्या जीवन-मरणाचे सारे प्रश्न सुटतात, लोकांच्या मनातील रोषही शमतो, हे या राजकारण्यांना ठाऊक आहे. एकदा ही सर्व अतिक्रमणे वाचवली की, हे निष्क्रिय नगरसेवक हिरो ठरतील आणि पुढच्या निवडणुकीत ते निवडूनही येतील.इथे नमूद करण्यासाठी आणखी एक गोष्ट, धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सामान्य नागरिकांचा विरोध नसतोच. हे राजकारणीच त्यांना भडकावतात. आधी अस्मिता चेतवायच्या व नंतर भडकलेल्या भावनांचा समूह आपल्यामागे कसा येईल, याची तजवीज करायची, हे घाणेरडे राजकारण केवळ नागपूरच नव्हे तर देशात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गरीब माणसाचा निवारा अनधिकृत ठरतो व ते दुबळे अतिक्रमण हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने सहज सोपेही असते. गरिबाची झोपडी तोडल्यानंतर जातसमूहाच्या भावना कधी दुखावत नाहीत आणि असे अतिक्रमण हटविणे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असल्याचे पुढारलेपणही करता येते. देवांच्या अतिक्रमणाबाबत मात्र तसे नाही. ते हटविता येत नाही. कुणी तसे धाडस केलेच तर धार्मिक भावना दुखावतात. प्रसंगी दंगलीही उसळतात आणि मग कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीच्या मतांसाठी ते ‘देव’ कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जातात. अशा धार्मिक अस्मितांचे अंगारे-धुपारे विझू नये यासाठी वर्षभर देवादिकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी रस्त्यावरच भरलेले महाप्रसाद, भंडारे न चुकता तुमची वाट पाहत असतातच. राजकारण्यांनी आपल्या मतलबासाठी भरवलेला हा देवाचा बाजार आहे, त्यातील आपण प्यादे आहोत. ते एकाचवेळी माणसांना आणि देवालाही खेळवत आहेत. देवाचे ठीक आहे, पण किमान माणसांनी तरी ही बदमाषी ओळखायला नको का?- गजानन जानभोर

टॅग्स :Templeमंदिर