शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

ते माणसांना आणि देवालाही खेळवतात

By गजानन जानभोर | Updated: August 2, 2018 04:18 IST

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात.

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. त्यातून राजकारणी माणसे सोडली तर कुणाचेही भले होत नाही. देवाच्या तक्रारी सोडविणे फारच सोपे आणि तसे केल्याने लोकप्रियता लाभत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी यात अग्रभागी असतात. असे धार्मिक प्रश्न वणव्यात रूपांतरित झाले की समाजाची मती गुंग होते आणि त्याला आपल्या जगण्याच्या हक्कांचा कायम विसर पडतो. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नेमके हेच सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपुरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले जात आहे. लोकं त्याला विरोध करताहेत. त्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना राजकीय नेत्यांची फूस आहे. या पुढाऱ्यांना ही धार्मिक स्थळे आणि तेथील देवांबद्दल आस्था आहे, असे सामान्यांना वाटत असेल तर ती आपलीच फसवणूक आहे. या राजकारण्यांना लोकांच्या धर्मश्रद्धेचे भांडवल करायचे आहे. धार्मिक प्रश्न सतत चेतवत ठेवले की लोकं आपल्या नागरी समस्यांची चर्चा करीत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली निष्क्रियता दडून राहते ही गोष्ट या चलाख मंडळींना चांगली ठाऊक आहे. धार्मिक अतिक्रमणांना पाठिंबा देऊन ते जाणीवपूर्वक न्यायालयाचा अवमानही करीत आहेत आणि या अपराधात त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलेला सहभागही तेवढाच चिंताजनक आहे.अलीकडेच नागपुरात आलेल्या जलतांडवामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष अजूनही खदखदत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या नगरसेवकांना धार्मिक अतिक्रमणाच्या माध्यमातून अनायसे ‘देव’ आठवले आहेत. ही देवदुर्लभ संधी त्यांना सोडायची नाही. खेदाची बाब ही की, एरवी नगरसेवकांच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक आपल्या प्रभागातील साºया समस्या विसरून केवळ धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक धार्मिक स्थळ वाचवले की सामान्यांच्या जीवन-मरणाचे सारे प्रश्न सुटतात, लोकांच्या मनातील रोषही शमतो, हे या राजकारण्यांना ठाऊक आहे. एकदा ही सर्व अतिक्रमणे वाचवली की, हे निष्क्रिय नगरसेवक हिरो ठरतील आणि पुढच्या निवडणुकीत ते निवडूनही येतील.इथे नमूद करण्यासाठी आणखी एक गोष्ट, धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सामान्य नागरिकांचा विरोध नसतोच. हे राजकारणीच त्यांना भडकावतात. आधी अस्मिता चेतवायच्या व नंतर भडकलेल्या भावनांचा समूह आपल्यामागे कसा येईल, याची तजवीज करायची, हे घाणेरडे राजकारण केवळ नागपूरच नव्हे तर देशात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गरीब माणसाचा निवारा अनधिकृत ठरतो व ते दुबळे अतिक्रमण हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने सहज सोपेही असते. गरिबाची झोपडी तोडल्यानंतर जातसमूहाच्या भावना कधी दुखावत नाहीत आणि असे अतिक्रमण हटविणे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असल्याचे पुढारलेपणही करता येते. देवांच्या अतिक्रमणाबाबत मात्र तसे नाही. ते हटविता येत नाही. कुणी तसे धाडस केलेच तर धार्मिक भावना दुखावतात. प्रसंगी दंगलीही उसळतात आणि मग कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीच्या मतांसाठी ते ‘देव’ कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जातात. अशा धार्मिक अस्मितांचे अंगारे-धुपारे विझू नये यासाठी वर्षभर देवादिकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी रस्त्यावरच भरलेले महाप्रसाद, भंडारे न चुकता तुमची वाट पाहत असतातच. राजकारण्यांनी आपल्या मतलबासाठी भरवलेला हा देवाचा बाजार आहे, त्यातील आपण प्यादे आहोत. ते एकाचवेळी माणसांना आणि देवालाही खेळवत आहेत. देवाचे ठीक आहे, पण किमान माणसांनी तरी ही बदमाषी ओळखायला नको का?- गजानन जानभोर

टॅग्स :Templeमंदिर