शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

ते माणसांना आणि देवालाही खेळवतात

By गजानन जानभोर | Updated: August 2, 2018 04:18 IST

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात.

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. त्यातून राजकारणी माणसे सोडली तर कुणाचेही भले होत नाही. देवाच्या तक्रारी सोडविणे फारच सोपे आणि तसे केल्याने लोकप्रियता लाभत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी यात अग्रभागी असतात. असे धार्मिक प्रश्न वणव्यात रूपांतरित झाले की समाजाची मती गुंग होते आणि त्याला आपल्या जगण्याच्या हक्कांचा कायम विसर पडतो. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नेमके हेच सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपुरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले जात आहे. लोकं त्याला विरोध करताहेत. त्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना राजकीय नेत्यांची फूस आहे. या पुढाऱ्यांना ही धार्मिक स्थळे आणि तेथील देवांबद्दल आस्था आहे, असे सामान्यांना वाटत असेल तर ती आपलीच फसवणूक आहे. या राजकारण्यांना लोकांच्या धर्मश्रद्धेचे भांडवल करायचे आहे. धार्मिक प्रश्न सतत चेतवत ठेवले की लोकं आपल्या नागरी समस्यांची चर्चा करीत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली निष्क्रियता दडून राहते ही गोष्ट या चलाख मंडळींना चांगली ठाऊक आहे. धार्मिक अतिक्रमणांना पाठिंबा देऊन ते जाणीवपूर्वक न्यायालयाचा अवमानही करीत आहेत आणि या अपराधात त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलेला सहभागही तेवढाच चिंताजनक आहे.अलीकडेच नागपुरात आलेल्या जलतांडवामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष अजूनही खदखदत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या नगरसेवकांना धार्मिक अतिक्रमणाच्या माध्यमातून अनायसे ‘देव’ आठवले आहेत. ही देवदुर्लभ संधी त्यांना सोडायची नाही. खेदाची बाब ही की, एरवी नगरसेवकांच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक आपल्या प्रभागातील साºया समस्या विसरून केवळ धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक धार्मिक स्थळ वाचवले की सामान्यांच्या जीवन-मरणाचे सारे प्रश्न सुटतात, लोकांच्या मनातील रोषही शमतो, हे या राजकारण्यांना ठाऊक आहे. एकदा ही सर्व अतिक्रमणे वाचवली की, हे निष्क्रिय नगरसेवक हिरो ठरतील आणि पुढच्या निवडणुकीत ते निवडूनही येतील.इथे नमूद करण्यासाठी आणखी एक गोष्ट, धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सामान्य नागरिकांचा विरोध नसतोच. हे राजकारणीच त्यांना भडकावतात. आधी अस्मिता चेतवायच्या व नंतर भडकलेल्या भावनांचा समूह आपल्यामागे कसा येईल, याची तजवीज करायची, हे घाणेरडे राजकारण केवळ नागपूरच नव्हे तर देशात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गरीब माणसाचा निवारा अनधिकृत ठरतो व ते दुबळे अतिक्रमण हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने सहज सोपेही असते. गरिबाची झोपडी तोडल्यानंतर जातसमूहाच्या भावना कधी दुखावत नाहीत आणि असे अतिक्रमण हटविणे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असल्याचे पुढारलेपणही करता येते. देवांच्या अतिक्रमणाबाबत मात्र तसे नाही. ते हटविता येत नाही. कुणी तसे धाडस केलेच तर धार्मिक भावना दुखावतात. प्रसंगी दंगलीही उसळतात आणि मग कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीच्या मतांसाठी ते ‘देव’ कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जातात. अशा धार्मिक अस्मितांचे अंगारे-धुपारे विझू नये यासाठी वर्षभर देवादिकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी रस्त्यावरच भरलेले महाप्रसाद, भंडारे न चुकता तुमची वाट पाहत असतातच. राजकारण्यांनी आपल्या मतलबासाठी भरवलेला हा देवाचा बाजार आहे, त्यातील आपण प्यादे आहोत. ते एकाचवेळी माणसांना आणि देवालाही खेळवत आहेत. देवाचे ठीक आहे, पण किमान माणसांनी तरी ही बदमाषी ओळखायला नको का?- गजानन जानभोर

टॅग्स :Templeमंदिर