शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

By विजय दर्डा | Updated: November 20, 2017 03:10 IST

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे.

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे. ज्या चित्रपटास अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले नाही व जो अद्याप लोकांनी पाहिलेला नाही त्यावरून कट्टरवाद्यांनी ओरड सुरू केली. ऐकीव माहितीवर गोंधळ घालायचा, फतवे काढायचे, हीच हिंदुस्तानची संस्कृती आहे का? आपण एका लोकशाही देशात राहत आहोत, हे विसरून चालणार नाही. येथे सर्व धर्म, सर्व भाषा आणि इतिहासाचा सन्मान करणारे लोक राहतात. खरं काय ते समजून न घेता, कोणताही विचार न करता गोंधळ घालणाºया मूर्खांचा तर हा देश नक्कीच नाही!कुरापतखोरांचे हे उद्योग आणि त्याबाबत सरकारचा नाकर्तेपणा पाहिला की, आपण नक्की कोणत्या देशात राहत आहोत, असे विचारावेसे वाटते. आपण दहशतवाद्यांच्या देशात तर राहत नाही ना? कोणीही उठून त्याला वाटेल तसा फतवा काढायला आपण तालिबानी होत चाललो आहोत की ‘इसिस’ची सल्तनत येथे स्थापन झाली आहे? असे फतवे काढले जाण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही असे अतिरेकी प्रकार अनेकवेळा झाले आहेत. पण आपली सरकारे याकडे डोळेझाक करतात, हे दुर्दैव आहे. कधी धर्माच्या नावाने तर कधी जातीच्या नावाने मते मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये अशा लोकांना लगाम घालण्याचा विचार राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या मनातही येत नाही. भारतासारख्या देशात हे प्रकार सर्वस्वी अमान्य आहेत, हे मला निक्षून सांगावेसे वाटते. धर्म किंवा जातीचा विचार न करता दमदाटीची आणि अतिरेकी भाषा बोलणाºयांवर सरकारला सक्तीने कारवाई करावीच लागेल, अन्यथा या शक्तींचा बोलबाला होईल व त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील.आपण लोकशाही देशात राहत असल्याने येथे प्रत्येकाच्या विचाराचा आदर ्व्हायलाच हवा. ‘पद्मावती’ चित्रपटाविषयी बोलायचे तर हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काही गडबड आहे असे वाटले तर तेवढा भाग त्यातून काढून टाकायला हवा. आधी चित्रपट पाहू द्या, मगच त्याच्याविषयी बोलता येईल, असे बूंदीच्या राणीनेही म्हटले आहे. मला वाटते की, एखाद्या समाजवर्गाचा अपमान होत असेल, कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्यास विरोध करणे समजू शकते. कोणाच्याही भावना न दुखावण्याची भारताची संस्कृती आहे, शिकवण आहे. पण काही झाले तरी ‘पद्मावती’ हा एक चित्रपट आहे, हे विसरून चालणार नाही. तो काही ऐतिहासिक माहितीपट नाही. त्यामुळे ‘पद्मावती’ चित्रपट एक नाट्य म्हणूनच पाहायला हवा. जेव्हा चित्रपट तयार करणे सुरू झाले व कोणाला त्याची माहितीही नव्हती तेव्हाही काही संघटना त्याविरुद्ध अस्तन्या वळून पुढे आल्या, याने मी चक्रावून गेलो. जयपूरच्या महालात घूमर नृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी या चित्रपटाच्या सेट््सची नासधूस केल्या गेली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. संजय लीला भन्साळी यांनी याकडे एक आव्हान म्हणून पाहिले व मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत सेट उभे केले. ४५ दिवसांच्या सलग चित्रीकरणानंतर चित्रपट तयार झाला. या चित्रपटावर १६० कोटी रुपयांचा खर्च झाला. संजय लीला भन्साळी हे आरडाओरड करणारी व्यक्ती नाहीत. ते कुठल्या पार्टीला जात नाहीत की राजकारणातही पडत नाहीत. त्यांचे आजवरचे सर्वच चित्रपट एकाहून एक सरस आहेत. त्यांनी प्रत्येक संस्कृतीवर चित्रपट काढला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर ‘बाजीराव-मस्तानी’, गुजरातच्या ंसंस्कृतीवर ‘हम दिल दे चुके सनम’. राजस्थानच्या संस्कृतीवर आता त्यांनी ‘पद्मावती’ तयार केला आहे. याआधी त्यांनी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ हा चित्रपट काढला होता. सर्व धर्मांना एका सूत्रात बांधण्याचे काम त्यांनी केले आहे. ‘अल्झायमर’ आजारावर त्यांनी ‘ब्लॅक’ हा चित्रपट काढला.‘पद्मावती’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोण हिने ३० किलो वजनाचे दागिने व ३० किलो वजनाचा पोशाख घालून घूमर नृत्य केले आहे. अंगावर ६० किलोचे वजन घेऊन नृत्य करणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. खरं तर कलाकारांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. परंतु काही कट्टरपंथी शक्ती आपले हित साधण्यासाठी विरोधाच्या क्रूर मार्गांचा अवलंब करतात, हे मोठे दुर्दैव आहे. अशा लोकांना किती महत्त्व द्यायचे, याचे भान प्रसारमाध्यमांनीही राखायला हवे. मी पुन्हा एकदा निक्षून सांगेन की, सरकार व सर्व राजकीय पक्षांनी या कट्टरपंथी शक्तींविरुद्ध कठोर पावले उचलायलाच हवीत, नाही तर त्या देश बरबाद करून टाकतील!नाव नाही, परिस्थिती बदलाआणखी एक बातमी चर्चेत आहे. मध्य प्रदेशच्या ऐतिहासिक व व्यापारी शहराचे नाव ‘इंदौर’ ऐवजी ‘इंदूर’ असे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच त्यासंबंधीचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारकडे जाईल. महापालिका, राज्य व केंद्र या सर्व ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता असल्याने येत्या काही महिन्यांत ‘इंदौर’चे ‘इंदूर’ झल्यास आश्चर्य वाटायला नको. पण मला असे विचारायचे आहे की, नाव बदलून काय होईल? कलकत्त्याचे कोलकाता झाले, बंगलोरचे बंगळुरू झाले, मद्रासचे चेन्नई झाले, बम्बईचे मुंबई झाले, पूनाचे पुणे झाले आणि मेंगलोरचे मंगळुरू झाले. पण काय फरक पडला? या सर्व शहरांपुढील प्रश्न पूर्वी होते तसेच आजही कायम आहेत. नाव बदलल्याने लोकांचे जीवन सुसह्य झाले का? तेथे २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी मिळू लागले का? की तेथील प्रदूषण कमी झाले? हे सर्व झाले नसेल तर नाव बदलून फायदा काय? माझ्या मते, शहरांचे नामांतर ही एक निव्वळ राजकीय चाल आहे. एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे, ‘ये पब्लिक है सब जानती है!’(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साली