शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...

By अतुल कुलकर्णी | Updated: November 17, 2024 06:47 IST

यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना तुम्ही सगळ्यांनी कसे बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे याचे वस्तुपाठ घालून दिले आहेत. येणारी पिढी त्यासाठी कायम तुमचा उल्लेख करत राहील...

अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबईप्रचारासाठी धावपळ करणाऱ्या सात वीरांनो,नमस्कार.आपण सगळे प्रचारात व्यस्त आहात. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस. शेवटी शेवटी माणूस खूप वेगाने धावायचा प्रयत्न करतो. अशावेळी पायात पाय अडकून पडण्याची भीती असते; पण प्रचार करताना या गोष्टी होणारच. काळजी करू नका. तुम्हाला काहीजण बशीर बद्र यांचा हा शेर नक्की ऐकवतील... दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश रहे,जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों...अशा शेरोशायरीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपल्याला आता जम कर लढाई करायची आहे. युद्ध जिंकायचे आहे. आपल्या विरोधकांना चारीमुंड्या चीत करायचे आहे. एकदा का समोरच्याचा पराभव झाला, की मग तो स्वतःहूनच शर्मिंदा होऊन आपल्याकडे दोस्तीसाठी येईल. बशीर बद्र जुन्या जमान्याचे शायर होते. आपण नव्या जमान्याचे आहोत. त्यामुळे हा शेरच बदलला पाहिजे...दुश्मनी जम कर करो, कोई गुंजाइश न छोडो, जब कभी वो सामने आये, गर्दन झुका के आये...अशा पद्धतीने आपण बशीरजींच्या शेरची नव्या जमान्यासोबत जी ओळख करून दिली आहे, त्याचे आम्हाला फार कौतुक आहे. शेवटी आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून आपल्यालाच इतिहास घडवायचा आहे. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते असेच चालू ठेवा. पुढच्या जमान्यात आपल्यावरच अशा पद्धतीची शेरोशायरी झाली पाहिजे हे लक्षात असू द्या.यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना तुम्ही सगळ्यांनी कसे बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे याचे वस्तुपाठ घालून दिले आहेत. येणारी पिढी त्यासाठी कायम तुमचा उल्लेख करत राहील... मागच्या आठवड्यातच, आपण बाहेर जसे बोलता, तसेच घरी बोला... असा सल्ला आम्ही दिला होता. मात्र त्यावर चार चांद चढवण्याचे काम भाजपाचे पाशा पटेल यांनी केले आहे. ज्या पद्धतीची भाषा आणि हातवारे करत त्यांनी सभेत भाषण केले, तो या निवडणुकीचा परमोच्च क्षण होता असे म्हणायला हरकत नाही. या निवडणुकीचे आपण सगळे हिरो आहात. वसंत देशमुख, सदाभाऊ खोत, नितेश राणे, संजय राऊत, सुनील राऊत, अरविंद सावंत अशा सगळ्या जबरदस्त बोलणाऱ्यांचे सरदार पाशा पटेल ठरले. या सात जणांचे त्यासाठी विशेष अभिनंदन. खऱ्या अर्थाने हे सात वीर वेडात दौडले. ते जे काही बोलले, ज्या पद्धतीचे हातवारे त्यांनी केले त्यासाठी आमची लेखणी अतिशय छोटी ठरेल. इतके महान कर्तृत्व त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिले. ज्यांना कोणाला असेच हातवारे करत कसे बोलावे हे शिकायचे असेल तर त्यांनी निवडणुकीनंतर त्यांच्याकडे क्लासेस लावायला हरकत नाही... पाशा पटेल बांबू लागवडीच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याची दखल कार्पोरेट क्षेत्राने घेतली आहे; पण ते अशा प्रकारचे बांबू लावतात हे पहिल्यांदा महाराष्ट्राला दिसले असेल... त्यासाठी ते अभिनंदनास आणि विशेष पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आहेत. कार्पोरेट क्षेत्रही आता त्यांच्या हातवाऱ्यांनी प्रभावित होऊन गेले असेल...प्रियंका गांधी यांनी शिर्डीत भाषण करताना, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलेतोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा अशी ओळ ऐकवली. ह्या अशा ओळी ऐकवण्यापेक्षा आणि लोकांनी अशी भाषणे ऐकण्यापेक्षा तुम्ही लोकांनी भाषणाचा जो ट्रेंड सेट करून दिला आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे असे तुम्हाला वाटत नाही का..? सोयाबीन, कापसाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारी, महागाई यापेक्षा तुम्ही लोकांनी जी भाषणे केली आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत. हे सिद्ध करणारा एक शोधनिबंध तुमच्यातल्याच काही लोकांनी लिहिला पाहिजे. संजय राऊत यांच्याकडून या शोधनिबंधावर प्रस्तावना लिहून घेतली पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीला तुमच्या भाषणांवर अभ्यास करून स्वतःची भाषणे तयार करता येतील. कुसुमाग्रजांची एक कविता होती. ती सुद्धा काळानुरूप बदलली पाहिजे. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हाला बदल असलेली कविता अशी सुचली आहे  -तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण वेडात प्रचारी वीर दौडले सात...ते वदता शब्दही थोडे, किंचित तिखेसरदार पहा सरसावुनि उठले सारे भाषणात टाकुनी बाण, फेकले सारेउसळले वादाचे मेघ लाख निमिषात खालून आग, वर आग, आग बाजूंनीकार्यकर्ते उसळले लाख तीव्र इमानी सर्वत्र चमकले सात जीव ते मानी,खग सात झळकले अभिमानी पक्षातसभांमधून दिसतील अजूनि बाण शब्दांचे सर्वत्र तरंगे अजूनि स्वर शब्दांचेक्षितिजावर उठतो अजूनि स्वर शब्दांचा अशाच सभांची सर्वत्र मागणी होतावेडात प्रचारी वीर दौडले साततेव्हा ही कविता आपण सगळ्यांना पाठवू... आपल्या कौतुकाची कवनं येणाऱ्या काळात लिहू, म्हणजे भावी पिढी आपल्याला कायम लक्षात ठेवेल..! या निवडणुकीत आपण मिळवलेली ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.     - आपलाच बाबुराव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी