शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:42 IST

कर्नाटकच्या राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा निर्दयी गैरवापर करून राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नेहमीसाठी कलंक लावला आहे.

- अ‍ॅड़ असीम सरोदेकर्नाटकच्या राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा निर्दयी गैरवापर करून राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नेहमीसाठी कलंक लावला आहे.कर्नाटकातील निवडणुकानंतर घडणाऱ्या घटनांकडे केवळ ‘राजकीय घडामोडी’ म्हणून बघणे अपूर्णपणाचे ठरेल. कारण लोकशाहीच्या प्रक्रिया, संविधानातील तरतुदींनाच वेठीस धरण्याचा अश्लाघ्य प्रकार सध्या घटनाक्रम म्हणून पुढे येतो आहे. राज्यपालांचे कार्य संविधानकेंद्री व पक्षातीत असावे याचा विसर पडलेले राज्यपाल वज्जुभाई वाला हे घटनात्मकपद धारण करूनसुद्धा भाजपाचे नेते आणि संघाचे कार्यकर्ते म्हणून वागत आहेत़ एक राजकीय पक्ष म्हणून भाजपा आणि कर्नाटकचे राज्यपाल संविधानासोबत खोडसाळ प्रकारचा खेळखंडोबा करीत आहेत़ जे संविधानाचा मान राखत नाहीत, घटनात्मक तरतुदींचा अपमान करतात किंवा कायदेशीरतेचे पालन करीत नाहीत त्यांचे देशावर प्रेम नाही किंवा ते देशभक्त नाहीत, असे म्हणण्याची पद्धत अजून तरी अस्तित्वात नाही़राजकीय कारणांसाठी रात्री सर्वोच्च न्यायालय उघडल्याची घटना प्रथमच देशात घडली आहे़ राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, हे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील ‘अधिकारांचे विभाजन’ हे तत्त्व पाळले़ घटनेनुसार न्यायव्यवस्था व कायदेमंडळ यांच्यात अधिकारांचे विभाजन झालेले आहे़ राज्यपाल व राष्ट्रपतींच्या काही निर्णयांमध्ये न्यायव्यवस्थेने ढवळाढवळ करू नये, हे तत्त्व आहे़ पण हे तत्त्व एकतर्फी पालन केल्याने इतरांना तत्त्वहीन वागण्याची परवानगी मिळू नये, यावर आता सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल. खरे तर सर्वोच्च न्यायालयाने त्याचवेळी येडियुरप्पांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची प्रत फॅक्सद्वारे कर्नाटक राज्यपाल कार्यालयातून मागवून घेतली असती तर बरीच स्पष्टता आली असती़ कोणताही निर्णय घेण्याची प्रक्रिया न्याय्य व न्यायिक आहे का? हा कायद्याचा प्रश्न ठरतोच़ येडियुरप्पांची देहबोली व चेहºयावरील निरुत्साह तसेच छोट्या छोट्या राजकीय विजयांचा जल्लोष करतानाही उपस्थित राहणाºया पंतप्रधान मोदी व अमित शहा यांची अनुपस्थिती यातून राज्यपालांसह भाजपाच्या नेत्यांमध्ये आपण गुन्हेगारी कृत्य केल्याची भावना (गिल्टी मार्इंड) प्रकर्षाने दिसते.गोव्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपाचे मुळीच बहुमत नसतानाही त्यांनी इतर पक्षांना हाताशी घेऊन सरकार स्थापन केले़ त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, काँगे्रसला अधिक जागा मिळूनही त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता व त्यामुळे राज्यपालांनी भाजपा व इतरांना संधी दिली. आता याच आधारे बघितले तर काँग्रेस व जनता दला(सेक्युलर)ने निवडणुकानंतर त्वरित एकत्रितपणे ११७ आमदारांसह सत्तास्थापनेचा दावा केला.भाजपाला केवळ १०४ आमदार असल्याने ते सत्ता स्थापन करण्यासाठीचे ११२ आमदारसंख्या गाठू शकणार नाहीत, हे स्पष्टपणे दिसत असताना राज्यपालांनी भाजपाला आमंत्रित करणे चुकीचे व आमदार खरेदीच्या भ्रष्टाचाराला निमंत्रण देणारे ठरते. या संपूर्ण प्रक्रियेबाबत व त्यामागील भ्रष्ट उद्देशांबाबत सर्वोच्च न्यायालय जरूर विचार करेल, असे दिसते़ लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू नये यासाठी आवश्यक ते अन्वयार्थ काढून संविधानातील काही त्रुटी, अस्पष्टता यांचा गैरवापर कुणीही करू नये, असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे़(ज्येष्ठ संविधान अभ्यासक)

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८