शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 03:06 IST

महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

महाराष्ट्रात गेली दोन वर्षे मराठा आरक्षणावरून हलचल माजली आहे. त्याचे सामाजिक परिणामांबरोबरच दूरगामी राजकीय परिणामही होणार आहेत. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींचा सामंजस्याने स्वीकार करून जो-जो मागास घटक असेल त्याला विकास साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यायला हवी आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक मागासलेपणाचा जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे मराठा समाज हा या तिन्ही घटकांच्या पातळीवर मागास राहिला असल्याचे स्पष्ट केले आहे. तो निर्णय झाल्यावर आरक्षण देण्याचा आता राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण संपविण्यासाठी किंवा त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. ते किती आणि कोणत्या प्रवर्गातून द्यायचे, हा महत्त्वपूर्ण निकाल आपण सर्वांनी घ्यायचा आहे. हा समाज ‘इतर मागासवर्ग’ यामध्ये समाविष्ट करण्यास सध्या ज्या समाजघटकांचा समावेश या प्रवर्गात आहे, त्यांचा विरोध आहे, असे चित्र उभे करण्यात आले आहे. परिणामी, मराठा समाज विरुद्ध इतर मागासवर्गीय समाज यांच्यात संघर्षाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनुसूचित जाती, जमाती, भटका वर्ग आणि इतर मागासवर्ग आदींसाठी बावन्न टक्के आरक्षण आहे. वास्तविक घटनेतील अनुच्छेद १६ (ब)नुसार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही; पण त्यातच असेही म्हटले आहे की, विशिष्ट परिस्थितीत त्याहून अधिक आरक्षण देता येईल. नागराज विरुद्ध कर्नाटक सरकारच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णयही दिला आहे. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) महाराष्ट्रात सध्या १९ टक्के आरक्षण आहे. एकूण आरक्षणाची मर्यादा वाढविता येत नाही, म्हणून ‘इतर मागासवर्गीयां’मध्ये मराठा समाजाचा समावेश केला तर संघर्षाची वेळ येणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी आणि अपेक्षा यांचा विशिष्ट परिस्थितीचा आधार घेत स्वतंत्रपणे १६ ते २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय करता येऊ शकतो. जेणेकरून ओबीसींच्या आरक्षणासही धक्का लागणार नाही. मराठा समाजाचा त्या प्रवर्गात समावेश केल्याने त्यात होणारी गर्दीही कमी राहील.

ओबीसीमध्ये समावेश केल्यास दोन्ही समाज घटकांना १९ टक्के आरक्षणातच अडकून पडावे लागेल. त्याऐवजी हा उत्तम मार्ग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, न्यायालयात आव्हान दिले जाईल, घटनेत तरतूद नाही, असाही युक्तिवाद करण्यात येईल. मात्र, विशिष्ट परिस्थितीत ते पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येते, हे तमिळनाडू सरकारने सिद्ध केले आहे. त्यासाठी त्या राज्यातील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखी भूमिका घेतली होती तशीच भूमिका महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी घेऊन ‘ओबीसी विरुद्ध मराठा समाज’ असा संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय सुसंवादासाठी राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा आहे. हे राज्य फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आहे, असे आपण मान्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची आजवरची वाटचाल या पार्श्वभूमीवर ध्यानात ठेवावी लागेल. सर्व राजकीय पक्षांचीही ही भूमिका आहे. त्यामुळे ओबीसींना धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले तर उत्तमच होईल. हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही, अशी भीती वाटते. हीसुद्धा काही मर्यादेपर्यंत खरी आहे. नागराज खटल्याचा निकाल तसेच तमिळनाडू सरकारच्या निर्णयाचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचे परिणाम देशभर उमटू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यास कोणी धजावणार नाही. महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण