शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 03:06 IST

महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

महाराष्ट्रात गेली दोन वर्षे मराठा आरक्षणावरून हलचल माजली आहे. त्याचे सामाजिक परिणामांबरोबरच दूरगामी राजकीय परिणामही होणार आहेत. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींचा सामंजस्याने स्वीकार करून जो-जो मागास घटक असेल त्याला विकास साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यायला हवी आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक मागासलेपणाचा जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे मराठा समाज हा या तिन्ही घटकांच्या पातळीवर मागास राहिला असल्याचे स्पष्ट केले आहे. तो निर्णय झाल्यावर आरक्षण देण्याचा आता राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण संपविण्यासाठी किंवा त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. ते किती आणि कोणत्या प्रवर्गातून द्यायचे, हा महत्त्वपूर्ण निकाल आपण सर्वांनी घ्यायचा आहे. हा समाज ‘इतर मागासवर्ग’ यामध्ये समाविष्ट करण्यास सध्या ज्या समाजघटकांचा समावेश या प्रवर्गात आहे, त्यांचा विरोध आहे, असे चित्र उभे करण्यात आले आहे. परिणामी, मराठा समाज विरुद्ध इतर मागासवर्गीय समाज यांच्यात संघर्षाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनुसूचित जाती, जमाती, भटका वर्ग आणि इतर मागासवर्ग आदींसाठी बावन्न टक्के आरक्षण आहे. वास्तविक घटनेतील अनुच्छेद १६ (ब)नुसार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही; पण त्यातच असेही म्हटले आहे की, विशिष्ट परिस्थितीत त्याहून अधिक आरक्षण देता येईल. नागराज विरुद्ध कर्नाटक सरकारच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णयही दिला आहे. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) महाराष्ट्रात सध्या १९ टक्के आरक्षण आहे. एकूण आरक्षणाची मर्यादा वाढविता येत नाही, म्हणून ‘इतर मागासवर्गीयां’मध्ये मराठा समाजाचा समावेश केला तर संघर्षाची वेळ येणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी आणि अपेक्षा यांचा विशिष्ट परिस्थितीचा आधार घेत स्वतंत्रपणे १६ ते २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय करता येऊ शकतो. जेणेकरून ओबीसींच्या आरक्षणासही धक्का लागणार नाही. मराठा समाजाचा त्या प्रवर्गात समावेश केल्याने त्यात होणारी गर्दीही कमी राहील.

ओबीसीमध्ये समावेश केल्यास दोन्ही समाज घटकांना १९ टक्के आरक्षणातच अडकून पडावे लागेल. त्याऐवजी हा उत्तम मार्ग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, न्यायालयात आव्हान दिले जाईल, घटनेत तरतूद नाही, असाही युक्तिवाद करण्यात येईल. मात्र, विशिष्ट परिस्थितीत ते पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येते, हे तमिळनाडू सरकारने सिद्ध केले आहे. त्यासाठी त्या राज्यातील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखी भूमिका घेतली होती तशीच भूमिका महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी घेऊन ‘ओबीसी विरुद्ध मराठा समाज’ असा संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय सुसंवादासाठी राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा आहे. हे राज्य फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आहे, असे आपण मान्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची आजवरची वाटचाल या पार्श्वभूमीवर ध्यानात ठेवावी लागेल. सर्व राजकीय पक्षांचीही ही भूमिका आहे. त्यामुळे ओबीसींना धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले तर उत्तमच होईल. हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही, अशी भीती वाटते. हीसुद्धा काही मर्यादेपर्यंत खरी आहे. नागराज खटल्याचा निकाल तसेच तमिळनाडू सरकारच्या निर्णयाचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचे परिणाम देशभर उमटू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यास कोणी धजावणार नाही. महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण