शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 03:06 IST

महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

महाराष्ट्रात गेली दोन वर्षे मराठा आरक्षणावरून हलचल माजली आहे. त्याचे सामाजिक परिणामांबरोबरच दूरगामी राजकीय परिणामही होणार आहेत. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींचा सामंजस्याने स्वीकार करून जो-जो मागास घटक असेल त्याला विकास साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यायला हवी आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक मागासलेपणाचा जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे मराठा समाज हा या तिन्ही घटकांच्या पातळीवर मागास राहिला असल्याचे स्पष्ट केले आहे. तो निर्णय झाल्यावर आरक्षण देण्याचा आता राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण संपविण्यासाठी किंवा त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. ते किती आणि कोणत्या प्रवर्गातून द्यायचे, हा महत्त्वपूर्ण निकाल आपण सर्वांनी घ्यायचा आहे. हा समाज ‘इतर मागासवर्ग’ यामध्ये समाविष्ट करण्यास सध्या ज्या समाजघटकांचा समावेश या प्रवर्गात आहे, त्यांचा विरोध आहे, असे चित्र उभे करण्यात आले आहे. परिणामी, मराठा समाज विरुद्ध इतर मागासवर्गीय समाज यांच्यात संघर्षाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनुसूचित जाती, जमाती, भटका वर्ग आणि इतर मागासवर्ग आदींसाठी बावन्न टक्के आरक्षण आहे. वास्तविक घटनेतील अनुच्छेद १६ (ब)नुसार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही; पण त्यातच असेही म्हटले आहे की, विशिष्ट परिस्थितीत त्याहून अधिक आरक्षण देता येईल. नागराज विरुद्ध कर्नाटक सरकारच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णयही दिला आहे. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) महाराष्ट्रात सध्या १९ टक्के आरक्षण आहे. एकूण आरक्षणाची मर्यादा वाढविता येत नाही, म्हणून ‘इतर मागासवर्गीयां’मध्ये मराठा समाजाचा समावेश केला तर संघर्षाची वेळ येणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी आणि अपेक्षा यांचा विशिष्ट परिस्थितीचा आधार घेत स्वतंत्रपणे १६ ते २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय करता येऊ शकतो. जेणेकरून ओबीसींच्या आरक्षणासही धक्का लागणार नाही. मराठा समाजाचा त्या प्रवर्गात समावेश केल्याने त्यात होणारी गर्दीही कमी राहील.

ओबीसीमध्ये समावेश केल्यास दोन्ही समाज घटकांना १९ टक्के आरक्षणातच अडकून पडावे लागेल. त्याऐवजी हा उत्तम मार्ग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, न्यायालयात आव्हान दिले जाईल, घटनेत तरतूद नाही, असाही युक्तिवाद करण्यात येईल. मात्र, विशिष्ट परिस्थितीत ते पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येते, हे तमिळनाडू सरकारने सिद्ध केले आहे. त्यासाठी त्या राज्यातील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखी भूमिका घेतली होती तशीच भूमिका महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी घेऊन ‘ओबीसी विरुद्ध मराठा समाज’ असा संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय सुसंवादासाठी राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा आहे. हे राज्य फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आहे, असे आपण मान्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची आजवरची वाटचाल या पार्श्वभूमीवर ध्यानात ठेवावी लागेल. सर्व राजकीय पक्षांचीही ही भूमिका आहे. त्यामुळे ओबीसींना धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले तर उत्तमच होईल. हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही, अशी भीती वाटते. हीसुद्धा काही मर्यादेपर्यंत खरी आहे. नागराज खटल्याचा निकाल तसेच तमिळनाडू सरकारच्या निर्णयाचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचे परिणाम देशभर उमटू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यास कोणी धजावणार नाही. महाराष्ट्राने सर्व समाज घटकांच्या उन्नतीचा मार्ग निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सामंजस्याचे आरक्षण स्वीकारायला हरकत नाही.

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण