शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाविना फळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 23:35 IST

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते.

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते. पण अगदी खेड्यापाड्यातील लोकांना आवडेल असे लोकसाहित्य त्यांनी सहजपणे व विपुल लिहिल्याचे दिसते. डफगाणी, देवीच्या भक्तांना प्रिय अशी लयबद्ध कवनेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या एका डफ गाण्यात अवघडराव, अभिमानराव, धीरराव असे अवघे रावच राव आहेत तर दुसऱ्या डफगाण्यात क, ख, जपासून सुरू होणाऱ्या गावांची नावे आहेत. एका ओवीत सात-आठ गावे सांगता सांगता ६० ओव्यातून चारपाचशे गावांची नावे त्यांनी दिली आहेत.रामदासस्वामी हे समाजजीवनाशी जोडले गेलेले इहवादी संत होते. प्रपंचाचे व्यर्थपण अधोरेखित न करता ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग पाहावे परमार्थ विवेका’ हे परखड विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. समर्थांनी मारोती उपासना आणि रामभक्तीतून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा लोकात जागवली. लोकमान्य टिळकांनी कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवातून एका कालसापेक्ष चैतन्य समाजाला दिले असावे असे वाटते.बारा वर्षे तप केल्यावर त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी आणि सोरटी सोमनाथ ते कामरूप असे भारतभ्रमण केले. देशभर होणारी लुटालूट, नापिकी, घरेदारे जाळणे, गुरे पळवणे, गावांचा विध्वंस, बायकांचे अपहरण सारे त्यांनी पाहिले. नि:सत्त्व जनता, प्रतिकारशून्य मृतवत् समुदाय पाहिला. अस्मानी-सुल्तानी आणि परचक्र निरूपण ही दोन प्रकरणे त्याकाळची सामाजिक परिस्थिती चितारणारी आहेत.अकरा महिन्यांच्या काशी मुक्कामात मुक्त झालेल्या आपल्या देशाचे जे स्वप्न त्यांनी पाहिले ते आनंदभुवन किंवा श्रीवनभुवनी या काव्यात त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. ‘समर्थ साधक’ या नावाने रामदासांविषयी महत्त्वाची माहिती देताना समर्थांचा प्रभावी हजरजबाबीपणा लेखकाने व्यक्त केला आहे. ते सांगतात की, समर्थ सज्जनगडावरून चाफळास निघाले असता मार्गात पाली येथील खंडोबा यात्रेत त्यांनी शाहिरांचे सवालजवाब ऐकले.जिंकल्यामुळे गर्वाने फुगलेल्या शाहिराला त्यांनी प्रश्न टाकला - ‘किती पृथ्वीचे वजन? किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक? किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग।। अशी मर्यादांची जाणीव देत निरुत्तर करणारा, नशिबाला दोष देणाऱ्यांना ‘कष्टाविण फळ नाही’, अचूक यत्न करायला हवेत हे सांगणारा मार्गदर्शक मोलाचा असतो. संत रामदास हे असेच मार्गदर्शन करणारे संत होते. त्यांनी प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनाही उपदेश करण्यात मागे-पुढे पाहिलेनाही.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे