शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कष्टाविना फळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 23:35 IST

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते.

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते. पण अगदी खेड्यापाड्यातील लोकांना आवडेल असे लोकसाहित्य त्यांनी सहजपणे व विपुल लिहिल्याचे दिसते. डफगाणी, देवीच्या भक्तांना प्रिय अशी लयबद्ध कवनेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या एका डफ गाण्यात अवघडराव, अभिमानराव, धीरराव असे अवघे रावच राव आहेत तर दुसऱ्या डफगाण्यात क, ख, जपासून सुरू होणाऱ्या गावांची नावे आहेत. एका ओवीत सात-आठ गावे सांगता सांगता ६० ओव्यातून चारपाचशे गावांची नावे त्यांनी दिली आहेत.रामदासस्वामी हे समाजजीवनाशी जोडले गेलेले इहवादी संत होते. प्रपंचाचे व्यर्थपण अधोरेखित न करता ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग पाहावे परमार्थ विवेका’ हे परखड विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. समर्थांनी मारोती उपासना आणि रामभक्तीतून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा लोकात जागवली. लोकमान्य टिळकांनी कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवातून एका कालसापेक्ष चैतन्य समाजाला दिले असावे असे वाटते.बारा वर्षे तप केल्यावर त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी आणि सोरटी सोमनाथ ते कामरूप असे भारतभ्रमण केले. देशभर होणारी लुटालूट, नापिकी, घरेदारे जाळणे, गुरे पळवणे, गावांचा विध्वंस, बायकांचे अपहरण सारे त्यांनी पाहिले. नि:सत्त्व जनता, प्रतिकारशून्य मृतवत् समुदाय पाहिला. अस्मानी-सुल्तानी आणि परचक्र निरूपण ही दोन प्रकरणे त्याकाळची सामाजिक परिस्थिती चितारणारी आहेत.अकरा महिन्यांच्या काशी मुक्कामात मुक्त झालेल्या आपल्या देशाचे जे स्वप्न त्यांनी पाहिले ते आनंदभुवन किंवा श्रीवनभुवनी या काव्यात त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. ‘समर्थ साधक’ या नावाने रामदासांविषयी महत्त्वाची माहिती देताना समर्थांचा प्रभावी हजरजबाबीपणा लेखकाने व्यक्त केला आहे. ते सांगतात की, समर्थ सज्जनगडावरून चाफळास निघाले असता मार्गात पाली येथील खंडोबा यात्रेत त्यांनी शाहिरांचे सवालजवाब ऐकले.जिंकल्यामुळे गर्वाने फुगलेल्या शाहिराला त्यांनी प्रश्न टाकला - ‘किती पृथ्वीचे वजन? किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक? किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग।। अशी मर्यादांची जाणीव देत निरुत्तर करणारा, नशिबाला दोष देणाऱ्यांना ‘कष्टाविण फळ नाही’, अचूक यत्न करायला हवेत हे सांगणारा मार्गदर्शक मोलाचा असतो. संत रामदास हे असेच मार्गदर्शन करणारे संत होते. त्यांनी प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनाही उपदेश करण्यात मागे-पुढे पाहिलेनाही.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे