शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कष्टाविना फळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 23:35 IST

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते.

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते. पण अगदी खेड्यापाड्यातील लोकांना आवडेल असे लोकसाहित्य त्यांनी सहजपणे व विपुल लिहिल्याचे दिसते. डफगाणी, देवीच्या भक्तांना प्रिय अशी लयबद्ध कवनेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या एका डफ गाण्यात अवघडराव, अभिमानराव, धीरराव असे अवघे रावच राव आहेत तर दुसऱ्या डफगाण्यात क, ख, जपासून सुरू होणाऱ्या गावांची नावे आहेत. एका ओवीत सात-आठ गावे सांगता सांगता ६० ओव्यातून चारपाचशे गावांची नावे त्यांनी दिली आहेत.रामदासस्वामी हे समाजजीवनाशी जोडले गेलेले इहवादी संत होते. प्रपंचाचे व्यर्थपण अधोरेखित न करता ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग पाहावे परमार्थ विवेका’ हे परखड विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. समर्थांनी मारोती उपासना आणि रामभक्तीतून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा लोकात जागवली. लोकमान्य टिळकांनी कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवातून एका कालसापेक्ष चैतन्य समाजाला दिले असावे असे वाटते.बारा वर्षे तप केल्यावर त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी आणि सोरटी सोमनाथ ते कामरूप असे भारतभ्रमण केले. देशभर होणारी लुटालूट, नापिकी, घरेदारे जाळणे, गुरे पळवणे, गावांचा विध्वंस, बायकांचे अपहरण सारे त्यांनी पाहिले. नि:सत्त्व जनता, प्रतिकारशून्य मृतवत् समुदाय पाहिला. अस्मानी-सुल्तानी आणि परचक्र निरूपण ही दोन प्रकरणे त्याकाळची सामाजिक परिस्थिती चितारणारी आहेत.अकरा महिन्यांच्या काशी मुक्कामात मुक्त झालेल्या आपल्या देशाचे जे स्वप्न त्यांनी पाहिले ते आनंदभुवन किंवा श्रीवनभुवनी या काव्यात त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. ‘समर्थ साधक’ या नावाने रामदासांविषयी महत्त्वाची माहिती देताना समर्थांचा प्रभावी हजरजबाबीपणा लेखकाने व्यक्त केला आहे. ते सांगतात की, समर्थ सज्जनगडावरून चाफळास निघाले असता मार्गात पाली येथील खंडोबा यात्रेत त्यांनी शाहिरांचे सवालजवाब ऐकले.जिंकल्यामुळे गर्वाने फुगलेल्या शाहिराला त्यांनी प्रश्न टाकला - ‘किती पृथ्वीचे वजन? किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक? किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग।। अशी मर्यादांची जाणीव देत निरुत्तर करणारा, नशिबाला दोष देणाऱ्यांना ‘कष्टाविण फळ नाही’, अचूक यत्न करायला हवेत हे सांगणारा मार्गदर्शक मोलाचा असतो. संत रामदास हे असेच मार्गदर्शन करणारे संत होते. त्यांनी प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनाही उपदेश करण्यात मागे-पुढे पाहिलेनाही.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे