शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

‘टू बी, ऑर नॉट टू बी’च्या फे-यात अडकून टाळेबंदीचा खेळ खेळण्यात काही अर्थ नाही; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:29 IST

धोरणकर्त्यांपैकी काहीजणांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव परिणामकारक उपाय वाटतो, तर टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आणण्याखेरीज काहीही साध्य झालेले नाही, असे इतर काहीजणांचे मत आहे.

 ‘हॅम्लेट’ या विलियम शेक्सपिअरच्या अजरामर नाट्यकृतीत हॅम्लेटच्या तोंडी एक लांबलचक स्वगत आहे. त्यामधील पहिलेच वाक्य आहे, ‘टू बी, ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन.’ मृत्यू की आत्महत्या, यावर चिंतन करताना झालेली हॅम्लेटची द्विधा मन:स्थिती शेक्सपिअरने या वाक्यातून अगदी अचूकपणे नाट्यरसिकांपर्यंत पोहोचविली होती. कोरोना विषाणूमुळे उभा ठाकलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी टाळेबंदी या उपायाचा वापर करताना जगभरातील सरकारांची अवस्था हॅम्लेटप्रमाणेच झाली आहे. भारतापुरते बोलायचे झाल्यास जवळपास अडीच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर भारतात टप्प्याटप्प्याने टाळेबंदी हटविण्यास प्रारंभ झाला. त्याला आता एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना, महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर टाळेबंदी घोषित करणे सुरू झाले आहे. त्यासंदर्भातही एकवाक्यता नाही. धोरणकर्त्यांपैकी काहीजणांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव परिणामकारक उपाय वाटतो, तर टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आणण्याखेरीज काहीही साध्य झालेले नाही, असे इतर काहीजणांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या उपयुक्ततेसंदर्भातील जागतिक अनुभव आणि शास्त्रोक्त अभ्यासांचे निष्कर्ष तपासणे गरजेचे ठरते. न्यूझीलंडमध्ये झालेल्या एका अभ्यासादरम्यान, २५ देशांनी योजलेल्या टाळेबंदीच्या विविध प्रकारांचा कोरोना महासाथीच्या वक्ररेषेवर (कर्व्ह) कसा परिणाम झाला, याच्या नोंदी घेण्यात आल्या. यातील निष्कर्ष मोठे वेधक आहेत. संशोधकांची किचकट परिभाषा बाजूला ठेवून सर्वसामान्यांना कळणाऱ्या सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या देशांनी महासाथीचा धोका दिसताक्षणी कडक टाळेबंदी लागू केली, त्या देशांना महासाथीचा प्रसार रोखण्यात यश आले. ज्या देशांनी महासाथीचा धोका लक्षात घेण्यास विलंब केला किंवा टाळेबंदी लागू करूनही कडक अंमलबजावणी केली नाही, त्या देशांमध्ये मात्र महासाथीचा वेगाने प्रसार झाला आणि मृत्युसंख्याही मोठी आहे. म्हणजे ढोबळमानाने असे म्हणता येईल, की महासाथीचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी हा परिणामकारक उपाय सिद्ध होऊ शकतो. मात्र, त्यासाठी टाळेबंदीची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे आणि तीच खरी ग्यानबाची मेख आहे! केवळ टाळेबंदीची घोषणा केल्याने महासाथीचा प्रसार रोखण्याचा उद्देश साध्य होत नाही.

उलट टाळेबंदीची केवळ घोषणा करून थातुरमातुर अंमलबजावणी केल्याने अर्थव्यवस्थेला मात्र धोका निर्माण होतो. म्हणजे गाढवही जाते अन् ब्रह्मचर्यही! दुर्दैवाने आम्हा भारतीयांना कोणत्याही समस्येच्या मुळाशी न जाता वरवरचे थातुरमातुर उपाय योजण्याची सवयच जडली आहे. ‘कोविड-१९’ महासाथीच्या बाबतीतही तेच झाले. आधी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता घाईघाईत देशव्यापी टाळेबंदी घोषित करण्यात आली आणि नंतर टाळेबंदी उठवतानाही कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बाधितांचे आकडे वेगाने वाढू लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून पुन्हा स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करण्याचा कल दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित काही काळासाठी बाधितांच्या संख्येचा आलेख उतरणीला लागलेला दिसेलही; पण टाळेबंदी उठवल्याबरोबर परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा धोका कायमच राहील.

वस्तुत: टाळेबंदीकडे पायाभूत आरोग्यसुविधा मजबूत करण्याकरिता पुरेसा वेळ मिळण्यासाठीची उपाययोजना म्हणून बघणे गरजेचे होते. ते न करता टाळेबंदीकडे महासाथीचा प्रसार रोखण्यासाठीची हमखास उपाययोजना म्हणून बघण्यात आले. जणूकाही टाळेबंदी घोषित झाल्याचे कळल्याबरोबर कोरोना विषाणू देशातून काढता पाय घेणार होता! नागरिकांना कायमस्वरूपी घरांमध्ये कोंडून ठेवता येणार नाही, ही वस्तुस्थिती धोरणकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. नागरिकांना घरांमध्ये कोंडून ठेवल्याने अर्थव्यवस्थेची हानी होण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही, हे एव्हाना सिद्ध झाले आहे. त्यामुळे महासाथीचा प्रसार रोखण्यासाठी पायाभूत आरोग्यसुविधा मजबूत करून, चाचण्यांची संख्या वाढविणे व नव्याने उपलब्ध झालेल्या औषधांच्या साहाय्याने बाधितांवर इलाज करणे, हाच एकमेव मार्ग आहे. ‘टू बी, आॅर नॉट टू बी’च्या फे-यात अडकून टाळेबंदीचा खेळ खेळण्यात काही अर्थ नाही; अन्यथा रुळावर येऊ लागलेल्या अर्थव्यवस्थेचा पुन्हा खेळखंडोबा होईल!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस