शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

एकही भूकबळी पडणे हा देशासाठी कलंक, ११ वर्षांच्या संतोषीच्या मृत्यूमुळे हादरला देश

By विजय दर्डा | Updated: October 22, 2017 23:59 IST

झारखंड राज्यातील सिमडेगामध्ये संतोषी या ११ वर्षांच्या मुलीच्या उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण देश हेलावून गेला. पोटाला दोन वेळचे अन्नही देऊ शकत नसेल तर असा विकास काय कामाचा, असे प्रश्नचिन्ह या भूकबळीने सरकारच्या विकासाच्या दाव्यांपुढे उभे केले आहे.

झारखंड राज्यातील सिमडेगामध्ये संतोषी या ११ वर्षांच्या मुलीच्या उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण देश हेलावून गेला. पोटाला दोन वेळचे अन्नही देऊ शकत नसेल तर असा विकास काय कामाचा, असे प्रश्नचिन्ह या भूकबळीने सरकारच्या विकासाच्या दाव्यांपुढे उभे केले आहे. आता असे म्हणायची वेळ आली आहे की, पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनो-आम्हाला बुलेट ट्रेन नको, आम्हाला गुळगुळीत व रुंद रस्ते नको. निदान गरिबांना दोन वेळचे जेवण मिळेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, शेतक-यांची लाचारी दूर होईल, शेतीला पाणी मिळेल, लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल, कुणालाही आपल्या पत्नी किंवा मुलाचे प्रेत खांद्यावरून न्यावे लागणार नाही आणि कीटकनाशके फवारल्याने कुणाही शेतक-याचा मृत्यू होणार नाही, एवढे जरी केलेत तरी भरून पावेल.पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदय, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अन्नधान्य भ्रष्टाचाराची कीडच फस्त करते, याहून मोठी विडंबना कोणती असू शकेल? सरकारी आरोग्य केंद्रांवर औषधे उपलब्ध नाहीत. शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. शेतकरी नष्टचक्राला कंटाळून आत्महत्या करीत आहेत आणि मोठा गाजावाजा करून बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवरील खड्डे भ्रष्टाचाराचे किळसवाणे प्रदर्शन करीत आहेत. आणि आमचे चारित्र्य तरुण पिढीपुढे ‘आदर्श’ बनून पुढे येत आहे. सर्वत्र हा असा भ्रष्टाचार बोकाळला असताना आपण मात्र धूमधडाक्यात दिवाळी साजरी करीत आहोत. बस्स झाले! आणखी स्वप्न दाखवू नका!! लोकांना पोटाला घास मिळेल, डोक्यावर छप्पर मिळेल, प्यायला पाणी मिळेल आणि आजारपण आल्यास औषधोपचार मिळतील एवढे केलेत तरी पुरे आहे.प्रख्यात कवी दुष्यंत कुमार यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी लिहिले होते-भूख है तो सब्र कर,रोटी नही तो क्या हुआ?आजकल दिल्ली में हैजेर-ए-बहस ये मुद्दा..!आता चर्चा आणि बहस खूप झाली. आता आपल्याला उपासमारीविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी लढा द्यावा लागेल. तत्कालीन उपराष्टÑपती भैरोसिंह शेखावत राज्यसभेचे सभापती व शरद पवार केंद्रीय कृषी व अन्नमंत्री असताना राज्यसभेत मी सार्वजनिक वितरण प्रणालीवर प्रहार करताना म्हटले होते की, आपण गरिबांच्या तोंडातील घास खातो आणि त्याची आपल्याला जराही खंत वाटत नाही? त्यावर सभापती शेखावत यांनी पवार साहेबांना सांगितले होते की, विजय दर्डाजी जे विचारताहेत त्याचे उत्तर द्या! खरं तर संपूर्ण देश अद्याप उत्तरच शोधतो आहे. भ्रष्टाचाराच्या रोगाचे समूळ उच्चाटन होण्याची वाट पाहात आहे.आपले सरकार हे कटू वास्तव लपविण्याचा आटापिटा करत असले तरी आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ अहवालातून हे वास्तव जगापुढे मांडले गेले आहे. पूर्वी विकसनशील देशांच्या ‘हंगर इंडेक्स’मध्ये भारताचा क्रमांक ९७ वा होता. ताज्या अहवालात तो आणखी खाली घसरून १०० व्या स्थानावर गेला आहे. याचा अर्थ असा की, भुकेकंगाल देशांच्या क्रमवारीत भारत आणखी वाईट अवस्थेत आला आणि आम्ही म्हणतो विकास होत आहे. उपासमारीच्या बाबतीत भारत आशिया खंडात तिसºया क्रमांकावर आहे. विडंबना बघा! श्रीमंतांच्या संख्येतही आपण जवळजवळ याच स्थितीत आहोत. श्रीमंतीत आपण यश मिळवीत आहोत पण ‘हंगर इंडेक्स’मध्ये आपले बहुतांश शेजारी देश आपल्याहून वरच्या स्थानावर आहेत. २९ व्या क्रमांकावर असलेला चीन यात सर्वात वर आहे. त्यानंतर नेपाळ ७२ व्या, म्यानमार ७७ व्या, श्रीलंका ८४ व्या, बांगलादेश ८८ व्या, पाकिस्तान १०६ व्या तर अफगाणिस्तान १०७ व्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी भारतासारख्या देशासाठी कलंक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक उपासमारीचा अहवाल सांगतो की, जगभरातील एकूण उपाशी लोकांपैकी सुमारे २३ टक्के लोक भारतात आहेत. ‘स्टेट आॅफ फूड सिक्युरिटी अ‍ॅण्ड न्युट्रिशन इन दि वर्ल्ड’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. भारतातील या उपाशी लोकांच्या मोठ्या प्रमाणामुळे सन २०३० पर्यंत जगभरातून उपासमारीचे उच्चाटन करण्याचे लक्ष़्य गाठणे कठीण होऊन बसल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. भारतातील कुपोषित लोकांची संख्या सन २०१५ मध्ये ७८ कोटी होती, ती सन २०१६ मध्ये वाढून ८१.५ कोटी झाली. हे आकडे सरकारला भूषणावह आहेत? सरकारला त्याचे दु:ख होत नाही, भय वाटत नाही? सर्वेक्षण अहवालातून असे दिसते की, भारतात पाच वर्षांहून कमी वयाची ३८ टक्के बालके कुपोषित आहेत. तरुण वयातील ५१ टक्के महिला रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाग्रस्त आहेत. याचे कारण काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर शोधणे कठीण नाही. आपल्याकडे महागाई कशी त्राही भगवान करते हे आपण सर्वच जाणतो. यामुळे गरिबांना दोन वेळची भूक भागविणेही अशक्य होते.हे लिखाण संपविण्यापूर्वी......टाटा ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा यांनी आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये कर्करोग रुग्णालयांसाठी १००० कोटी रुपये देण्याची व अन्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. खरं तर ही बंपर दिवाळी गिफ्ट आहे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात देशाच्या कानाकोपºयातून रुग्ण येत असतात. तेथे उपचार वाजवी शुल्कात होत असले तरी गरिबांना मुंबईत टिकाव धरणे कठीण होते. टाटा ट्रस्टच्या मानवतावादी दातृत्वाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच होईल.(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Deathमृत्यूAdhar Cardआधार कार्ड