शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

देवाचीही भीती नाही

By गजानन दिवाण | Updated: August 14, 2018 18:00 IST

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

देव आहे की नाही, यावर खल करीत बसण्यापेक्षा ही श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आम्ही गुण्या-गोविंदाने जगत आहोत, हे सत्य प्रत्येकाने स्वीकारायलाच हवे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, फक्त त्याची योग्य किंमत द्यावी लागते, अशा व्यवहारिक तत्वावर चालणाऱ्या या जगात कोणालाच कशाचा धाक नाही. काहीही केले तर पैशांच्या जोरावर त्यातून बाहेर पडता येते, हे ठाऊक असल्याने भीती म्हणून कोणाची राहिलीच नाही. म्हणूनच देवाची श्रद्धा महत्त्वाची वाटते.

या दरबारात तरी कोणी खोटे बोलत नाही, असे आम्हाला वाटते. हे खोटेपण एकतर त्याला स्वत:लाच माहित असते आणि दुसरा जर कोणी हे ओळखून असेल तर तो त्याचा श्रद्धेतला देव. या दरबारात तो न चुकता जातो आणि सारे पाप कबूल करून आपल्या कमाईतला काहीसा भाग दानपेटीत देऊन मोकळा होतो. एखादी दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा सरकारचे जीएसटी, नोटाबंदीसारखे पाऊल याचा परिणाम बाजारपेठेतील प्रत्येक क्षेत्रावर होत असला तरी दानपेटीवर मात्र फारसा होत नाही.

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

यंदाचेच पाहा. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर हे चार जिल्हे वगळता राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात खरीप हातात पडेल, याची अजिबात शाश्वती नाही. थोड्या दिवसांत पाऊस न झाल्यास रबीचीही आशा मावळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार आहेत. अशा तंगीच्या दिवसांतही दानपेट्यांमधील रक्कम काही कमी होताना दिसत नाही.

याचाच अर्थ गरीबांचे हे ‘दान’ नाही. माणसांमधील कोडगेपण इतके वाढत आहे की देवालाही ते सोडत नाहीत. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील कालिकादेवीची दानपेटी रविवारी उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. म्हणजे ‘त्या’ भक्ताने देवाचीच १० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक दानपेट्यांमधून ही फसवणूक समोर आली होती.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरूपतीलाही या लोकांनी सोडले नाही. या दानपेटीत चक्क ८.२९ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. श्रद्धेतल्या या देवाला फसवून काय हाशील? श्रद्धेनुसार, करता, करविता हा देवच असेल तर केलेली ही फसवणूक तो कशी स्वीकारेल? या दानाच्या बदल्यात तो चांगला आशीर्वाद तरी कसा देईल? हे प्रश्न पडणारा श्रद्धाळू असे फसवणुकीचे उद्योग करीत नाही आणि जो हे उद्योग करतो, तो देवालाही भीत नाही, हेच खरे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTempleमंदिरfraudधोकेबाजीNote Banनोटाबंदी