शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

देवाचीही भीती नाही

By गजानन दिवाण | Updated: August 14, 2018 18:00 IST

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

देव आहे की नाही, यावर खल करीत बसण्यापेक्षा ही श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आम्ही गुण्या-गोविंदाने जगत आहोत, हे सत्य प्रत्येकाने स्वीकारायलाच हवे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, फक्त त्याची योग्य किंमत द्यावी लागते, अशा व्यवहारिक तत्वावर चालणाऱ्या या जगात कोणालाच कशाचा धाक नाही. काहीही केले तर पैशांच्या जोरावर त्यातून बाहेर पडता येते, हे ठाऊक असल्याने भीती म्हणून कोणाची राहिलीच नाही. म्हणूनच देवाची श्रद्धा महत्त्वाची वाटते.

या दरबारात तरी कोणी खोटे बोलत नाही, असे आम्हाला वाटते. हे खोटेपण एकतर त्याला स्वत:लाच माहित असते आणि दुसरा जर कोणी हे ओळखून असेल तर तो त्याचा श्रद्धेतला देव. या दरबारात तो न चुकता जातो आणि सारे पाप कबूल करून आपल्या कमाईतला काहीसा भाग दानपेटीत देऊन मोकळा होतो. एखादी दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा सरकारचे जीएसटी, नोटाबंदीसारखे पाऊल याचा परिणाम बाजारपेठेतील प्रत्येक क्षेत्रावर होत असला तरी दानपेटीवर मात्र फारसा होत नाही.

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

यंदाचेच पाहा. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर हे चार जिल्हे वगळता राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात खरीप हातात पडेल, याची अजिबात शाश्वती नाही. थोड्या दिवसांत पाऊस न झाल्यास रबीचीही आशा मावळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार आहेत. अशा तंगीच्या दिवसांतही दानपेट्यांमधील रक्कम काही कमी होताना दिसत नाही.

याचाच अर्थ गरीबांचे हे ‘दान’ नाही. माणसांमधील कोडगेपण इतके वाढत आहे की देवालाही ते सोडत नाहीत. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील कालिकादेवीची दानपेटी रविवारी उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. म्हणजे ‘त्या’ भक्ताने देवाचीच १० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक दानपेट्यांमधून ही फसवणूक समोर आली होती.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरूपतीलाही या लोकांनी सोडले नाही. या दानपेटीत चक्क ८.२९ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. श्रद्धेतल्या या देवाला फसवून काय हाशील? श्रद्धेनुसार, करता, करविता हा देवच असेल तर केलेली ही फसवणूक तो कशी स्वीकारेल? या दानाच्या बदल्यात तो चांगला आशीर्वाद तरी कसा देईल? हे प्रश्न पडणारा श्रद्धाळू असे फसवणुकीचे उद्योग करीत नाही आणि जो हे उद्योग करतो, तो देवालाही भीत नाही, हेच खरे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTempleमंदिरfraudधोकेबाजीNote Banनोटाबंदी