शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देवाचीही भीती नाही

By गजानन दिवाण | Updated: August 14, 2018 18:00 IST

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

देव आहे की नाही, यावर खल करीत बसण्यापेक्षा ही श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आम्ही गुण्या-गोविंदाने जगत आहोत, हे सत्य प्रत्येकाने स्वीकारायलाच हवे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, फक्त त्याची योग्य किंमत द्यावी लागते, अशा व्यवहारिक तत्वावर चालणाऱ्या या जगात कोणालाच कशाचा धाक नाही. काहीही केले तर पैशांच्या जोरावर त्यातून बाहेर पडता येते, हे ठाऊक असल्याने भीती म्हणून कोणाची राहिलीच नाही. म्हणूनच देवाची श्रद्धा महत्त्वाची वाटते.

या दरबारात तरी कोणी खोटे बोलत नाही, असे आम्हाला वाटते. हे खोटेपण एकतर त्याला स्वत:लाच माहित असते आणि दुसरा जर कोणी हे ओळखून असेल तर तो त्याचा श्रद्धेतला देव. या दरबारात तो न चुकता जातो आणि सारे पाप कबूल करून आपल्या कमाईतला काहीसा भाग दानपेटीत देऊन मोकळा होतो. एखादी दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा सरकारचे जीएसटी, नोटाबंदीसारखे पाऊल याचा परिणाम बाजारपेठेतील प्रत्येक क्षेत्रावर होत असला तरी दानपेटीवर मात्र फारसा होत नाही.

लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.

यंदाचेच पाहा. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर हे चार जिल्हे वगळता राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात खरीप हातात पडेल, याची अजिबात शाश्वती नाही. थोड्या दिवसांत पाऊस न झाल्यास रबीचीही आशा मावळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार आहेत. अशा तंगीच्या दिवसांतही दानपेट्यांमधील रक्कम काही कमी होताना दिसत नाही.

याचाच अर्थ गरीबांचे हे ‘दान’ नाही. माणसांमधील कोडगेपण इतके वाढत आहे की देवालाही ते सोडत नाहीत. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील कालिकादेवीची दानपेटी रविवारी उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. म्हणजे ‘त्या’ भक्ताने देवाचीच १० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक दानपेट्यांमधून ही फसवणूक समोर आली होती.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरूपतीलाही या लोकांनी सोडले नाही. या दानपेटीत चक्क ८.२९ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. श्रद्धेतल्या या देवाला फसवून काय हाशील? श्रद्धेनुसार, करता, करविता हा देवच असेल तर केलेली ही फसवणूक तो कशी स्वीकारेल? या दानाच्या बदल्यात तो चांगला आशीर्वाद तरी कसा देईल? हे प्रश्न पडणारा श्रद्धाळू असे फसवणुकीचे उद्योग करीत नाही आणि जो हे उद्योग करतो, तो देवालाही भीत नाही, हेच खरे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTempleमंदिरfraudधोकेबाजीNote Banनोटाबंदी