शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अशीदेखील एक राज्यनिहाय बंदी

By admin | Updated: September 5, 2016 05:27 IST

एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे

एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे, याचा विचार करावा लागेल एका राज्यातील वकिलाने दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील स्थानिक वकिलाच्या मदतीशिवाय न्यायालयीन प्रकरणे चालविण्यास मनाई करणारे नियम घटनाबाह्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने वकिली व्यवसायात खदखद असलेल्या एका विषयावर पडदा पडण्याऐवजी नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.हा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नियमांच्या संदर्भात दिलेला असला तरी मुंबईसह देशातील बहुतेक सर्वच उच्च न्यायालयांचे नियमही अशाच प्रकारचे असल्याने त्यास देशव्यापी संदर्भ आहे. जमशेद अन्सारी वि. अलाहाबाद हायकोर्ट (सिव्हिल अपील क्र. ६१२०/१६) या प्रकरणात न्या. ए. के. सिक्री व न्या. एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने केलेल्या नियमांचे स्वरूप दुय्यम विधी (सबॉर्टिनेट लेजिस्लेशन) असे आहे. अशा दुय्यम विधींनी वकिलांना आणि पक्षकारांना कायद्याने व राज्यघटनेने बहाल केलेल्या हक्कांचा संकोच केला जाऊ शकतो का, असा मुद्दा होता. याचे उत्तर न्यायालयाने होकारार्थी दिले आहे. हा नियम परराज्यातील वकिलांना पूर्ण मज्जाव करणारा नव्हे तर न्यायालयीन कामाचे नियमन करणारा असल्याने तो मूलभूत अधिकारांवर घातले जाऊ शकणारे रास्त निर्बंध या वर्गात मोडतो, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. १९६१च्या अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्टच्या कलम ३० अन्वये कोणत्याही राज्य बार कौन्सिलकडून सनद घेतलेल्या वकिलास देशभरात कुठेही वकिली करण्याचा अधिकार आहे. शिवाय इतर कोणत्याही नागरिकाप्रमाणे वकिलासही राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१) अन्वये देशात कुठेही व्यवसाय करण्याचा मुलभूत हक्क आहे. शिवाय प्रत्येक पक्षकारास आपल्या पसंतीचा वकील करण्याचा हक्क राज्यघटनेच्या अनुच्छेद २२ (१) व दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ डी व ३०३ अन्वये आहे. अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्टच्या कलम ३४ अन्वये उच्च न्यायालयांना वकिली व्यवसायासाठी अटी व शर्ती ठरविण्याचा अधिकार आहे. हाच अधिकार वापरून उच्च न्यायालयांनी हे नियम केले आहेत. पण ते केवळ उच्च न्यायालयांना नव्हे तर त्या राज्यातील सर्व न्यायालयांना लागू होतात. यानुसार एका राज्यातील वकिलास दुसऱ्या राज्यात वकिली करण्यासाठी एखाद्या स्थानिक वकिलासोबतच वकीलपत्र दाखल करावे लागते. इतर कोणत्याही मुलभूत हक्काप्रमाणे व्यवसायाचा हक्कही अनिर्बंध नाही व व्यापक समाजहितासाठी त्यावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. न्यायदानाचे काम निर्वेधपणे व विनाविलंब पार पडणे हे नक्कीच समाजहिताचे आहे व त्याच हेतूने हा नियम केलेला असल्याने तो वैध आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिलांच्या हक्कांचे रक्षण करणे अपेक्षित आहे त्या कौन्सिलनेही या नियमाचे समर्थन केले आहे. पण हा निकाल चुकीचा आहे, असे मला वाटते. कारण एका हाताने दिलेला अधिकार दुसऱ्या हाताने काढून घेण्याचा हा प्रकार आहे. राज्यघटनेने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांवर ठराविक निकषांत बसणारे निर्बंध जरूर घातले जाऊ शकतात. पण हे निर्बंंध संसद किंवा राज्य विधिमंडळांनी रीतसर कायदा करून घालायला हवेत, हे राज्यघटनेचे बंधन आहे. उच्च न्यायालयाने केलेले नियम या निकषांत बसत नसल्याने ते कायदा किंवा राज्यघटनेहून वरचढ ठरू शकत नाहीत, या मुद्द्याला न्यायालयाने हवे तेवढे महत्व दिले नाही असे वाटते. शिवाय अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्ट लागू होण्यापूर्वी सन १९५३ मध्ये एका उच्च न्यायालयाने केलेला अशाच प्रकारचा नियम आपण स्वत:च अश्विनी कुमार घोष वि. अरविंद बोस या प्रकरणात अवैध ठरवून रद्द केला होता, याचाही सर्वोच्च न्यायालयास विसर पडलेला दिसतो. तूर्तास तरी हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने त्याचे पालन सर्वांना करावेच लागेल. पण संधी मिळेल तेव्हा त्याच्या फेरविचारासाठी प्रयत्न करावे लागतील. एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील ही राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे, याचाही विचार करावा लागेल.- अजित गोगटे