शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘तो’ ताजमहालच ! , तेजोमहाल अथवा शिवमंदिर ही विचारधारा चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:14 IST

ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे

भारतीय इतिहास ही एक गौरवगाथा आहे. एक असा कोष ज्याचा प्रत्येक काळ महान नायकांच्या शौर्यकथांनी समृद्ध झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सम्राट अशोक, चंद्रगुप्त, अकबर, महाराणाप्रताप, टिपू सुल्तान अशी शेकडो नावे घेता येतील ज्यांच्या स्मृती आजही जनमानसात कायम आहेत. या नायकांनी आपआपला कार्यकाळ गाजवला असून त्यांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही आणि तसे करणे योग्यही ठरणार नाही. परंतु अलीकडच्या काळात भारतवंशात इतिहास बदलाचे वारे वेगाने वाहात आहेत. प्रामुख्याने राजकारण्यांमध्ये इतिहास आणि त्यातील नायकांचा अस्त्राप्रमाणे वापर करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. खोट्याचे खरे आणि खºयाचे खोटे ठरविण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशा या पोस्टट्रुथच्या युगात राजकारण्यांचे अनुकरण लोकांकडूनही होणे स्वाभाविकच म्हणायचे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहालच्या अस्तित्वाबाबतही अशाच एका वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ताजमहाल हे तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असून हिंदूंना येथे पूजाअर्चेची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका आग्रा येथील सहा वकिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने पुरातत्त्व खात्यास आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली असून ज्या ठिकाणी ताजमहालची ऐतिहासिक वास्तू आहे तेथे त्यापूर्वी तेजोमहाल अथवा शिवमंदिर होते ही विचारधारा चुकीची असल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यापूर्वीच ताजमहाल हे मंदिर असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी न्यायालय आपला निकाल देईलच. परंतु इतिहास बदलण्याची ही वाढती प्रवृत्ती या वैविध्यपूर्ण देशासाठी घातक ठरू नये, असे वाटते. सहमती आणि असहमतीचे लोकशाहीत स्वतंत्र स्थान आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकालाच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगताना दुसºया व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय