शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘तो’ ताजमहालच ! , तेजोमहाल अथवा शिवमंदिर ही विचारधारा चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:14 IST

ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे

भारतीय इतिहास ही एक गौरवगाथा आहे. एक असा कोष ज्याचा प्रत्येक काळ महान नायकांच्या शौर्यकथांनी समृद्ध झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सम्राट अशोक, चंद्रगुप्त, अकबर, महाराणाप्रताप, टिपू सुल्तान अशी शेकडो नावे घेता येतील ज्यांच्या स्मृती आजही जनमानसात कायम आहेत. या नायकांनी आपआपला कार्यकाळ गाजवला असून त्यांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही आणि तसे करणे योग्यही ठरणार नाही. परंतु अलीकडच्या काळात भारतवंशात इतिहास बदलाचे वारे वेगाने वाहात आहेत. प्रामुख्याने राजकारण्यांमध्ये इतिहास आणि त्यातील नायकांचा अस्त्राप्रमाणे वापर करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. खोट्याचे खरे आणि खºयाचे खोटे ठरविण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशा या पोस्टट्रुथच्या युगात राजकारण्यांचे अनुकरण लोकांकडूनही होणे स्वाभाविकच म्हणायचे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहालच्या अस्तित्वाबाबतही अशाच एका वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ताजमहाल हे तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असून हिंदूंना येथे पूजाअर्चेची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका आग्रा येथील सहा वकिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने पुरातत्त्व खात्यास आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली असून ज्या ठिकाणी ताजमहालची ऐतिहासिक वास्तू आहे तेथे त्यापूर्वी तेजोमहाल अथवा शिवमंदिर होते ही विचारधारा चुकीची असल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यापूर्वीच ताजमहाल हे मंदिर असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी न्यायालय आपला निकाल देईलच. परंतु इतिहास बदलण्याची ही वाढती प्रवृत्ती या वैविध्यपूर्ण देशासाठी घातक ठरू नये, असे वाटते. सहमती आणि असहमतीचे लोकशाहीत स्वतंत्र स्थान आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकालाच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगताना दुसºया व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय