शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

‘तो’ ताजमहालच ! , तेजोमहाल अथवा शिवमंदिर ही विचारधारा चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:14 IST

ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे

भारतीय इतिहास ही एक गौरवगाथा आहे. एक असा कोष ज्याचा प्रत्येक काळ महान नायकांच्या शौर्यकथांनी समृद्ध झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सम्राट अशोक, चंद्रगुप्त, अकबर, महाराणाप्रताप, टिपू सुल्तान अशी शेकडो नावे घेता येतील ज्यांच्या स्मृती आजही जनमानसात कायम आहेत. या नायकांनी आपआपला कार्यकाळ गाजवला असून त्यांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही आणि तसे करणे योग्यही ठरणार नाही. परंतु अलीकडच्या काळात भारतवंशात इतिहास बदलाचे वारे वेगाने वाहात आहेत. प्रामुख्याने राजकारण्यांमध्ये इतिहास आणि त्यातील नायकांचा अस्त्राप्रमाणे वापर करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. खोट्याचे खरे आणि खºयाचे खोटे ठरविण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशा या पोस्टट्रुथच्या युगात राजकारण्यांचे अनुकरण लोकांकडूनही होणे स्वाभाविकच म्हणायचे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहालच्या अस्तित्वाबाबतही अशाच एका वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ताजमहाल हे तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असून हिंदूंना येथे पूजाअर्चेची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका आग्रा येथील सहा वकिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने पुरातत्त्व खात्यास आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली असून ज्या ठिकाणी ताजमहालची ऐतिहासिक वास्तू आहे तेथे त्यापूर्वी तेजोमहाल अथवा शिवमंदिर होते ही विचारधारा चुकीची असल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार सतराव्या शतकात शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली होती, असेही पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यापूर्वीच ताजमहाल हे मंदिर असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी न्यायालय आपला निकाल देईलच. परंतु इतिहास बदलण्याची ही वाढती प्रवृत्ती या वैविध्यपूर्ण देशासाठी घातक ठरू नये, असे वाटते. सहमती आणि असहमतीचे लोकशाहीत स्वतंत्र स्थान आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकालाच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगताना दुसºया व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय