शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पावसाने पुन्हा आणले डोळ्यांत पाणी!

By किरण अग्रवाल | Updated: October 16, 2022 11:42 IST

The rain brought tears to the eyes again : अकोला जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा अगदी ढगफुटीसदृश्य जोरदार पाऊस झाला; त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

 -  किरण अग्रवाल

प्रारंभीचा फटका सहन करून दुबार पेरणी केलेल्या बळीराजाला पुन्हा पावसाने नागवले आहे, पण गेल्या वेळेच्याच नुकसानीची भरपाई मिळण्याची मारामार असताना नवीन नुकसानीचे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक बनले आहे.

कधी कधी निसर्ग वा संकटेही अशी काही परीक्षा घेतात की, सहनशीलता तसेच धैर्यही पणास लागावे. रब्बीचा हंगाम सुरू होताना पावसाचा फटका सहन करून पीक पेरणी केलेल्या बळीराजाला या हंगामाच्या मध्यातही ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने असा काही दणका दिला आहे की, त्याच्या आशा-आकांक्षाच भुईसपाट झाल्या आहेत. अशा स्थितीत सरकारने पंचनाम्यांचे कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्तांसाठी तातडीने मदत जाहीर करणे गरजेचे आहे.

हंगामाच्या प्रारंभीच्या जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने अशी काही संततधार लावून धरली होती की, अनेकांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. महागामोलाचे बियाणे वाया गेलेच, मेहनतीवरही पाणी फिरले होते. अखेर कशी तरी उधार-उसनवारी करून पुन्हा पेरणी केली. तर आता हाताशी पीक येऊ घातले असताना अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यांसह बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांच्याही काही भागात पुन्हा अगदी ढगफुटीसदृश्य जोरदार पाऊस झाला; त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या आठवड्यात काही ठिकाणी झालेल्या धुवाधार पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन व वेचणीस आलेल्या कापसासह अन्य पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकट्या अकोला जिल्ह्यात ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत; पण यापूर्वीच्याच पंचनाम्यांचे सोपस्कार आटोपूनही मदत मिळाली नसताना आता पुन्हा हे कसली कागदे नाचवताहेत? शासनात असो, की प्रशासनात; शेतकरीपुत्रच बसलेले असताना ही काय चेष्टा चालवलीय बळीराजाची? तिकडे पीक विमा उतरविलेल्या कंपन्या त्यांची मुजोरी सोडायला तयार नाहीत, इकडे गेल्या वेळच्या नुकसानभरपाईपोटी शासनाचा मदत निधी येऊनही तो संबंधितांच्या बँक खात्यात अजून जमा होऊ शकला नाही. अरे, किती लालफीतशाहीचा कारभार कराल आणि कुठे फेडाल हे सारे?

दुर्दैव असे की, एकीकडे राजकीय अस्थिरतेमुळे ज्याच्या दारात हात पसरावेत तेच त्यांच्या विवंचनात दिसत आहेत; आणि दुसरीकडे निसर्गही जणू हात धुऊन मागे लागला आहे. त्यामुळे बळीराजा कोलमडून पडल्यासारखी स्थिती झाली आहे. शेतातील सोयाबीन सडले, तर बाजारात भाव पडले. १०/१२ हजारांपर्यंत गेलेले सोयाबीन आता अवघ्या पाच हजारांवर आले आहे. मातीत मिसळलेल्या पांढऱ्या सोन्याकडे हताशपणे पाहात बसलेल्या बांधा-बांधावरील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आसवं घरातील सर्वच सदस्यांची अस्वस्थता वाढवीत आहेत. ती आसवं शासनातील कुणाला दिसणार नसतील तर याच आसवांत उद्या मतपेट्या वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.

हंगाम उधळून लावणाऱ्या पावसाने जे नुकसान घडविले आहे, त्याचे सरसकट पंचनामे नोंदवून तातडीने मदत जाहीर करण्याची व ओल्या दुष्काळाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे; पण इतर व सत्तेतीलही पक्ष काय करीत आहेत? अजूनही खंजीर, गद्दार व खोक्यांच्या आरोप - प्रत्यारोपाखेरीज ते बाहेर पडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संवेदनशील नेतृत्वकर्ते म्हणून पाहिले जात आहे, तेव्हा त्यांनी याकडे तातडीने लक्ष पुरविण्याची अपेक्षा आहे.

सारांशात, नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने दुबार पेरणी करून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्याला पार उद्ध्वस्त करून टाकल्याचे पाहता शासकीय पंचनाम्याच्या सोपस्कारात वेळ न दवडता तातडीने नुकसानग्रस्तांच्या हाती भरपाई कशी मिळेल यासाठी निर्णय होणे गरजेचे आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस