शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:24 IST

आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

चंद्रकांत दडस, उपसंपादक, मुंबईपेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतात सध्या अन्य इंधन पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात आहे. अलीकडेच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही लवकरच देशात इथेनॉलवर चालणारी वाहने धावण्याचे संकेत दिले आहेत. सध्या देशात १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरले जात असून, हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचे आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

इथेनॉल म्हणजे काय?इथेनॉल इंधन हे इथाइल अल्कोहोल आहे. उसाच्या रसापासून, मळीपासून व खराब झालेल्या साखरेपासून इथेनॉल तयार करण्यात येते. याशिवाय बगॅस, कचरा, गटारीचे पाणी, सर्व कुजणाऱ्या पदार्थांपासून इथेनॉलनिर्मिती करता येते.

पेट्रोलला पर्याय आहे का?वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉल पूर्णपणे वापरता येईल. मात्र, त्यासाठी इंजिनामध्ये काही बदल करावे लागतील. मात्र, सध्याच्या पेट्रोलमध्ये ते मिसळून त्याचा प्रभावी वापरही शक्य आहे. इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याने, इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते, परिणामी उत्सर्जन कमी होते.

पेट्रोल स्वस्त होईल का?इथेनॉलची किंमत जवळपास ६१ रुपये प्रतिलिटर आहे. सध्याच्या महागड्या पेट्रोलमध्ये ते मिसळल्याने किंमत कमी होऊ शकते. मात्र, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ग्राहक फक्त एक लिटर पेट्रोलसाठी पैसे देतो. इथेनॉलमिश्रित पेट्रोलची किंमत पेट्रोल आणि इतर घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पेट्रोल पंपावर स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल.

इंजिन बदलावे लागेल?२० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी वाहन कंपन्यांना वाहनांसाठी नवे इंजिन बसवावे लागेल. यामुळे वाहनांची किंमत वाढेल. अंदाजानुसार, चारचाकी वाहनांच्या किमती ३ हजार ते ५ हजार रुपयांनी तर दुचाकींच्या किमती १ हजार ते २ हजार रुपयांनी वाढू शकतात.

पाण्याच्या तक्रारीचे काय करायचे?अनेक वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याच्या तक्रारी केल्या आहेत. इथेनॉलमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते कोणतेही नुकसान करत नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोलियम डिलर्सना तेल कंपन्यांनी इंधनासाठी दर्जा तपासणीचे पालन करण्यास सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार?इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे साखर कारखान्यांनाही चांगला आर्थिक लाभ होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळणार आहेत. इंधन वापराचा नवा टप्पा ग्रीन हायड्रोजनचा आहे. यात प्रदूषणशून्य टक्के होते. ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारी तत्त्वावर त्याचा वापरही सुरू झाला आहे.

इथेनॉलचे वाहनासाठी तोटे काय? पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा-कार्यक्षम आहे. केवळ इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनाची इंधन कार्यक्षमता पेट्रोलच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी असते.ग्राहकांना इथेनॉल वापरताना गाडीच्या टाक्या अधिक वेळा भरावी लागतील त्याच्यासाठी खर्च वाढू शकतो.१९९२मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये करण्याचे धोरण देशात स्वीकारले गेले.१९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ५% इथेनॉलचा पेट्रोलमध्ये सक्तीने वापर सुरू केलाटीव्हीएस, बजाज या कंपन्यांकडून पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती

टॅग्स :Petrolपेट्रोल