शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नर्मदा बचाव आंदोलन : काही घडले.. काही बिघडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:49 IST

चार दशकांनंतर नर्मदा बचाव आंदोलन पूर्वीसारखे प्रभावी राहिले नसले तरी, मेधा पाटकर यांची उमेद मात्र अजूनही दुर्दम्य आहे. त्यांचा लढा संपलेला नाही!

अभिलाष खांडेकर

रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’

जगभरात अण्वस्त्रसज्ज देश त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना भारतातल्या अनेक भागांतील गरीब आदिवासी, शेतकरी अजूनही जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. विकासाच्या नावाखाली राबवलेल्या भव्य प्रकल्पांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावे लागते आणि त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट आहे. नर्मदा बचाव आंदोलन हे स्वतंत्र भारतातील सर्वात प्रभावी जनआंदोलनांपैकी एक मानले जाते. या आंदोलनाने गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाविरुद्ध तब्बल ४० वर्षे शांततामय; पण सातत्यपूर्ण संघर्ष केला आहे. या महाकाय प्रकल्पामुळे अडीच लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आणि सुपीक जमीन उद्ध्वस्त झाली.

या खडतर चार दशकांत नर्मदा बचाव आंदोलनाने अनेक चढउतार अनुभवले. मुख्यत्वे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने आधी या भल्यामोठ्या धरणाच्या निर्मितीविरोधात आणि नंतर हजारो विस्थापितांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळण्यासाठी लढा दिला. आंदोलनाच्या पहिल्या २५-३० वर्षांत त्यांना समाजातील अनेक घटकांचा पाठिंबा मिळाला; पण कालांतराने सामाजिक नेते आणि पर्यावरणवाद्यांनी या आंदोलनातून  हळूहळू अंग काढून घेतलेले दिसते. मेधाताई मात्र आजही नर्मदा खोऱ्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि अशिक्षित आदिवासींसाठी लढत आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

या काळात सर्वोच्च न्यायालयातील अनेक खटले आणि निर्णय, आंदोलने, गुजरात-महाराष्ट्र-मध्य प्रदेशातील संघर्ष, जागतिक बँकेचा प्रवेश आणि बाहेर पडणं, ब्रॅडफोर्ड मॉर्सचा अहवाल, केंद्रीय सत्यशोधन समितीचा अहवाल, कॅगचे प्रतिकूल निष्कर्ष, धरणाची उंची ९० मीटरवरून १३७ मीटरपर्यंत वाढवण्याचा वाद, त्यानुसार वाढलेली बुडीत जमीन, प्रकल्प खर्चात झालेली भरमसाठ वाढ, प्रचंड पर्यावरणीय नुकसान, निर्वासितांच्या वेदना, बांधकामातील भ्रष्टाचार, अपूर्ण आणि त्रुटीयुक्त कालवे, नर्मदेचे पाणी कोका-कोला आणि इतर उद्योगांसाठी वळवणे, शासकीय अधिकारी आणि बुद्धिजीवींची उदासीनता.. हे सारे या ४० वर्षांत घडले.

कधीकाळी दुर्गा भागवत, बाबा आमटे, नाना पाटेकर, स्वामी अग्निवेश, अनुपम मिश्र,  प्रा. राज कचरू, भाजप नेते सत्य नारायण जटिया या आणि अनेक पर्यावरणप्रेमी, मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत यांनी नर्मदा आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला होता. मात्र, पुढे भाजप सरकारची कठोर भूमिका आणि इतर कारणांमुळे हा पाठिंबा आटत गेला. २०१७ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी धरणाचे उद्घाटन केले. मुख्यतः गुजरातच्या कोरड्या भागांना लाभ मिळावा म्हणून अनेक दशकांपूर्वी धरणाची योजना आखण्यात आली होती, प्रत्यक्षात काम १९८७ मध्ये सुरू झाले (तेव्हा खर्च ६,४०६ कोटी रुपये होता, आता तो ८०,००० कोटींपर्यंत पोहोचला आहे.) 

धरणाचे उद्घाटन झाल्यानंतर वाटले की, नर्मदा बचाव आंदोलनाची भूमिका आता संपली; पण तसे झाले नाही. मेधा पाटकर यांनी प्रभावित शेतकऱ्यांसह पुन्हा जोरदार आवाज उठवला आणि हे लक्षात आणून दिले की विशेषतः मध्य प्रदेशातील हजारो कुटुंबे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. फक्त विस्थापितांचीच नव्हे, तर स्वतः नर्मदेच्या संरक्षणाचीही वेळ आता आली आहे, कारण तिचे पाणी दूषित होत चालले आहे, ते पिण्यायोग्य राहिलेले नाही; याकडे मेधा पाटकर सातत्याने लक्ष वेधत आहेत. त्यांनी मोठ्या धरणांच्या उपयुक्ततेवर, खर्चावर आणि लाभांवर कायमच प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या कुटुंबांना आपली वडिलोपार्जित जमीन सोडावी लागली, त्यांना दुसऱ्या राज्यात कमी प्रतीच्या जमिनीवर वसवले गेले, त्यांच्या वेदना शब्दातीत आहेत. अश्रूंनी डोळे भरलेले; पण पर्याय नसलेले हजारो विस्थापित अजूनही संघर्ष करत आहेत; हे मेधा पाटकर सातत्याने यंत्रणेसमोर मांडताना दिसतात.

नर्मदा बचाव आंदोलनामुळे ५०,००० कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकले, ही मात्र मोठीच गोष्ट आहे. ४० वर्षांनंतर नर्मदा बचाव आंदोलन कदाचित पूर्वीसारखे प्रभावी राहिले नसले तरी, उमेद मात्र अजूनही दुर्दम्य आहे. पाटकर अजूनही आदिवासी, भूमिहीन आणि दुर्बल घटकांसाठी आवाज उठवत आहेत. आजच्या काळात हे कमी महत्त्वाचे नव्हे!

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकर