शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट मोठी, ‘तुकड्या’एवढी..एकूणच महसूल खाते कात टाकत असल्याचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:50 IST

तुकडेबंदीचा विषय समजून घेण्यासाठी जमिनी किंवा भूखंडाच्या मालकीविषयीची राज्याची वाटचालही पाहायला हवी.

महाराष्ट्रातील जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करणारा ७८ वर्षे जुना कायदा स्थगित करून महायुती सरकारने सगळ्या महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील लाखो मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय घेताना सरकारने शेतीचे बदलते स्वरूप, कृषी तंत्रज्ञानाचा वाढता वापर, कुटुंबे विभक्त होत असल्याने निर्माण होणाऱ्या गरजा आदींचा विचार केला आहे. जिवंत सात-बारा मोहीम किंवा रक्ताच्या नात्यात नि:शुल्क जमीन हस्तांतरण अशा दिलासादायक योजना राबविणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी विविध निर्णयांचा धडाका लावला असून, एकूणच महसूल खाते कात टाकत असल्याचे चित्र आहे.

तुकडेबंदीचा विषय समजून घेण्यासाठी जमिनी किंवा भूखंडाच्या मालकीविषयीची राज्याची वाटचालही पाहायला हवी. एकतर आतापर्यंत जितकी चर्चा कमाल जमीनधारणेविषयी व सिलिंग कायद्याने त्यावर घातलेल्या निर्बंधांविषयी झाली, तितकी किमान धारणेविषयी कधी झाली नाही. १९५० किंवा ६० च्या दशकात देशभर जमीन सुधारणा केल्या गेल्या. महाराष्ट्रात १९६१ साली कमाल जमीनधारणा म्हणजे सिलिंगचा कायदा आला. तेव्हापासून जिरायती जमिनीसाठी ५४ एकर, हंगामी बागायती जमिनीसाठी ३६ एकर, एका पाण्याची खात्री असलेल्या बारमाही बागायतीसाठी २७ एकर आणि कायम बागायतीसाठी १८ एकर ही कमाल धारणेची मर्यादा लागू झाली. या धोरणाचे फायदे खूप झाले; परंतु एक मोठा तोटाही झाला. जमिनीचे इतके तुकडे पडले की, खेड्यापाड्यांत ते कसायलाही परवडेनासे झाले. अल्प व अत्यल्प भूधारकांचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले. दुसरीकडे, किमान जमीनधारणा किंवा शहरी जमिनीच्या तुकड्यांचा वापर अत्यंत क्लिष्ट अशा कायदेशीर गुंतागुंतीत अडकला. त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. कारण, कायदे जितके किचकट व क्लिष्ट, तितके महसूल किंवा नागरी यंत्रणांमधील विविध घटक खूश असतात.

कायद्यातील पळवाटा शोधण्याची किंमत वसूल करता येते. महाराष्ट्रात झपाट्याने नागरीकरण झाले. वाड्यावस्त्या व पाड्यांची खेडी बनली. खेड्यांची गावे, गावांची शहरे आणि शहरांची महानगरे झाली. सध्या तामिळनाडूनंतर नागरीकरणाबाबत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. निम्म्याहून अधिक लोक शहरांमध्ये राहतात. परंतु, तुकडेबंदी कायद्यामुळे घरे, दुकानांसाठी छोटे भूखंड वापरता येत नाहीत. मोठ्या बिल्डरनाही एकापेक्षा अधिक लोकांची जमीन एकत्र करून इमारती उभ्या कराव्या लागतात. आता सरकारच्या निर्णयामुळे या जमिनींचा वापर वाढेल, सरकारला अधिक महसूल मिळेल आणि लोकांची सोय होईल. एका अंदाजानुसार, राज्यातील जवळपास ५० लाख भूखंडधारकांची या निर्णयामुळे तुकडेबंदीच्या मनस्तापातून सुटका होईल. हा मनस्ताप मोठा आहे. कारण, मुळात तुकडेबंदी कायदाच कमालीचा गुंतागुंतीचा आहे. शेतीच्या लागवडीसाठी पुरेशी जमीन उपलब्ध असावी, या हेतूने हा कायदा १९४७ साली तेव्हाच्या मुंबई प्रांतात लागू झाला.

या कायद्यात स्थानिक क्षेत्र घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये त्याचे निकष वेगळे राहिले. त्यात एकवाक्यता असावी म्हणून २०२३ मध्ये मुंबई शहर-उपनगर, अकोला आणि रायगड हे चार जिल्हे वगळता राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्राचा निकष बागायतीसाठी १० गुंठे व जिरायतीसाठी २० गुंठे करण्यात आला. शहरी भागातील छोट्या तुकड्यांचा वापर घरे बांधण्यासाठी किंवा व्यवसायासाठी केला तर विशिष्ट रक्कम भरून ते व्यवहार नियमित करून घ्यावे लागतात. ही रक्कम २०१७ मध्ये भूखंडाच्या किमतीच्या २५ टक्के करण्यात आली आणि गेल्या १ जानेवारीला ती ५ टक्के झाली.

आता १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या आधारे १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीतील व्यवहारांसाठी पाच टक्के रक्कम आकारली जाते. अशा प्रकरणांची संख्या मोठी आहे. तुकडेबंदी स्थगित करतानाच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. कारण, यातून केवळ भूखंडधारकांचेच नुकसान झाले असे नाही. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार होत नसल्याने इतकी वर्षे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी किंवा अकृषक कराच्या माध्यमातून मिळणारा सरकारचा महसूलही बुडाला.  तुकडेबंदी स्थगित करण्याच्या नव्या निर्णयामुळे महसूलही वाढेल आणि शहरांमध्ये अगदी एक गुंठा म्हणजे एक हजार चाैरस फुटांच्या जागेचाही निवासी, व्यावसायिक वापर करता येईल. थोडक्यात विषय छोट्या तुकड्यांचा असला तरी निर्णय मोठे परिणाम घडविणारा आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे