शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हे तर चटावरचे श्राद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 07:06 IST

कामकाज रेटून नेण्याकडे असलेला सत्तापक्षाचा कल आणि वेगवेगळ्या कारणांनी सरकारशी थेट न भिडणारे विरोधक हे चित्र निकोप आणि निर्भीड लोकशाहीला पोषक नक्कीच नाही

संसदीय लोकशाही आणि तिची मूल्ये यांचा संकोच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत असल्याची अनेक उदाहरणे अवतीभवती असताना परवा संपलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानेदेखील दुर्दैवाने तोच अनुभव दिला. महाराष्ट्राचे समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाला दिशा देतील, अशी अर्थगर्भ भाषणे विधिमंडळात देणारी एकाहून एक सरस माणसे काळाच्या पडद्याआड गेली,  त्यांच्यासोबतच अशी भाषणेदेखील जणू लोप पावली आहेत.  

कामकाज रेटून नेण्याकडे असलेला सत्तापक्षाचा कल आणि वेगवेगळ्या कारणांनी सरकारशी थेट न भिडणारे विरोधक हे चित्र निकोप आणि निर्भीड लोकशाहीला पोषक नक्कीच नाही. सरकारशी भांडा, संघर्ष करा आणि सरकारला लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी भाग पाडा, याऐवजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आरडाओरडा करण्यावर विरोधकांचा भर असेल तर त्यातून सवंग प्रसिद्धीशिवाय काय साध्य होणार? विधानसभा, विधान परिषदेच्या व्यतिरिक्त पायऱ्यांवर हल्ली जणू तिसरे सभागृह  भरविले जाते. सभागृहात हजर राहून सरकारची कोंडी करण्याऐवजी या तिसऱ्या सभागृहाच्या माध्यमातून सरकारबद्दल माध्यमांमध्ये, जनतेत भ्रम, संभ्रम तयार करणे ही  पद्धत आता प्रचलित झाली आहे.

विधानभवनच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणे किंवा सभागृहात एकमेकांच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल खालच्या पातळीवरची घोषणाबाजी करणे हे लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यांपासून आपण दूर जात असल्याचे लक्षण आहे. एकेकाळी देशाला धोरणात्मक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आणि विधानमंडळाने केले; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हीच अपेक्षा महाराष्ट्र विधान मंडळाकडून असताना दिसते ते वास्तव अस्वस्थ व्हावे, असेच आहे. केवळ  २० मंत्री असल्याने सत्ता पक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट कोलमडल्याचे चित्र पूर्ण अधिवेशनात बघायला मिळाले. सभागृहात उत्तरे द्यायला मंत्रीच नसल्यामुळे बरेचदा कामकाज पुढे ढकलावे लागण्याची वेळ आली. जिथे ४३ मंत्री हवेत तिथे फक्त २०  जण राज्याचा गाडा हाकत आहेत; त्यातच एकही राज्यमंत्री नाही.

गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात ही अवस्था आहे. विधानसभेतील  कामकाजाचे ताळतंत्र पार बिघडलेले दिसले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विक्रमी लक्षवेधी सूचना कामकाजात घेतल्या. एकेका दिवशी २०-२० लक्षवेधी सूचना असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. कामकाजाचा विक्रम करणे हा एक भाग आहे, मात्र त्याच वेळी चटावरच्या श्राद्धासारखे कामकाज  उरकणे हे कितपत योग्य आहे? सभागृहातील प्रत्येक कामकाजाचे आपले वेगळे महत्त्व असते. लक्षवेधींच्या माध्यमातून बरेचदा धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे विधेयकांचे रूपांतर कायद्यामध्ये होत असते. त्यामुळे प्रत्येक विधेयकावर सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे. गतकाळात हे भान राखले गेले; पण हल्ली विधेयके गोंधळातच मंजूर करून घेण्यावर सत्तापक्षाचा भर दिसतो. सगळ्याच गोष्टींची अशी बुलेट ट्रेन करणे उचित नव्हे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. मात्र, सरकारकडून ठोस मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यात विरोधकांना अपयश आले.  

यानिमित्ताने सरकारची असंवेदनशीलतादेखील दिसली. पंचनामे व्हायचे तेव्हा होऊ देत त्याआधी काही प्रमाणात मदत जाहीर करणे सरकारला शक्य होते. ‘हे देणारे सरकार आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच म्हणतात. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात त्याचा प्रत्यय आला नाही.  कांदा उत्पादकांना मदत करण्यासंदर्भात मात्र शिंदे यांनी संवेदनशीलता दाखवली. आमदारांचा वाढता गोंधळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पूर्वी प्रत्येकच पक्षांमध्ये चार-पाच आमदारांची शाऊटिंग ब्रिगेड असायची. विशिष्ट वेळी आणि अपवादात्मक परिस्थितीत या ब्रिगेडचा उपयोग खुबीने करून घेतला जात असे. मात्र, हल्ली तो इतका वारंवार केला जातो की त्यामुळे सभागृहाच्या शिस्तीला ग्रहण लागते. विधानभवन परिसरात आमदारांचे वर्तन कसे असावे, यासाठीची आचारसंहिता आता निश्चित केली जाणार आहे. मुळात अशी आचारसंहिता आणावी लागावी, हीच दुर्दैवाची बाब आहे. आमदारांची विधानभवनातील वर्तणूक ही कायद्याच्या चौकटीत बसविण्याची वेळ येण्यापेक्षा नैतिकता, संसदीय मूल्यांची जपणूक आणि कर्तव्याच्या कसोटीवर निश्चित करून त्यावर अंमल झाला असता तर पुरोगामी महाराष्ट्राला  ते अधिक शोभून दिसले असते.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार