शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हे तर चटावरचे श्राद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 07:06 IST

कामकाज रेटून नेण्याकडे असलेला सत्तापक्षाचा कल आणि वेगवेगळ्या कारणांनी सरकारशी थेट न भिडणारे विरोधक हे चित्र निकोप आणि निर्भीड लोकशाहीला पोषक नक्कीच नाही

संसदीय लोकशाही आणि तिची मूल्ये यांचा संकोच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत असल्याची अनेक उदाहरणे अवतीभवती असताना परवा संपलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानेदेखील दुर्दैवाने तोच अनुभव दिला. महाराष्ट्राचे समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाला दिशा देतील, अशी अर्थगर्भ भाषणे विधिमंडळात देणारी एकाहून एक सरस माणसे काळाच्या पडद्याआड गेली,  त्यांच्यासोबतच अशी भाषणेदेखील जणू लोप पावली आहेत.  

कामकाज रेटून नेण्याकडे असलेला सत्तापक्षाचा कल आणि वेगवेगळ्या कारणांनी सरकारशी थेट न भिडणारे विरोधक हे चित्र निकोप आणि निर्भीड लोकशाहीला पोषक नक्कीच नाही. सरकारशी भांडा, संघर्ष करा आणि सरकारला लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी भाग पाडा, याऐवजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आरडाओरडा करण्यावर विरोधकांचा भर असेल तर त्यातून सवंग प्रसिद्धीशिवाय काय साध्य होणार? विधानसभा, विधान परिषदेच्या व्यतिरिक्त पायऱ्यांवर हल्ली जणू तिसरे सभागृह  भरविले जाते. सभागृहात हजर राहून सरकारची कोंडी करण्याऐवजी या तिसऱ्या सभागृहाच्या माध्यमातून सरकारबद्दल माध्यमांमध्ये, जनतेत भ्रम, संभ्रम तयार करणे ही  पद्धत आता प्रचलित झाली आहे.

विधानभवनच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणे किंवा सभागृहात एकमेकांच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल खालच्या पातळीवरची घोषणाबाजी करणे हे लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यांपासून आपण दूर जात असल्याचे लक्षण आहे. एकेकाळी देशाला धोरणात्मक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आणि विधानमंडळाने केले; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हीच अपेक्षा महाराष्ट्र विधान मंडळाकडून असताना दिसते ते वास्तव अस्वस्थ व्हावे, असेच आहे. केवळ  २० मंत्री असल्याने सत्ता पक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट कोलमडल्याचे चित्र पूर्ण अधिवेशनात बघायला मिळाले. सभागृहात उत्तरे द्यायला मंत्रीच नसल्यामुळे बरेचदा कामकाज पुढे ढकलावे लागण्याची वेळ आली. जिथे ४३ मंत्री हवेत तिथे फक्त २०  जण राज्याचा गाडा हाकत आहेत; त्यातच एकही राज्यमंत्री नाही.

गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात ही अवस्था आहे. विधानसभेतील  कामकाजाचे ताळतंत्र पार बिघडलेले दिसले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विक्रमी लक्षवेधी सूचना कामकाजात घेतल्या. एकेका दिवशी २०-२० लक्षवेधी सूचना असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. कामकाजाचा विक्रम करणे हा एक भाग आहे, मात्र त्याच वेळी चटावरच्या श्राद्धासारखे कामकाज  उरकणे हे कितपत योग्य आहे? सभागृहातील प्रत्येक कामकाजाचे आपले वेगळे महत्त्व असते. लक्षवेधींच्या माध्यमातून बरेचदा धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे विधेयकांचे रूपांतर कायद्यामध्ये होत असते. त्यामुळे प्रत्येक विधेयकावर सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे. गतकाळात हे भान राखले गेले; पण हल्ली विधेयके गोंधळातच मंजूर करून घेण्यावर सत्तापक्षाचा भर दिसतो. सगळ्याच गोष्टींची अशी बुलेट ट्रेन करणे उचित नव्हे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. मात्र, सरकारकडून ठोस मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यात विरोधकांना अपयश आले.  

यानिमित्ताने सरकारची असंवेदनशीलतादेखील दिसली. पंचनामे व्हायचे तेव्हा होऊ देत त्याआधी काही प्रमाणात मदत जाहीर करणे सरकारला शक्य होते. ‘हे देणारे सरकार आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच म्हणतात. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात त्याचा प्रत्यय आला नाही.  कांदा उत्पादकांना मदत करण्यासंदर्भात मात्र शिंदे यांनी संवेदनशीलता दाखवली. आमदारांचा वाढता गोंधळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पूर्वी प्रत्येकच पक्षांमध्ये चार-पाच आमदारांची शाऊटिंग ब्रिगेड असायची. विशिष्ट वेळी आणि अपवादात्मक परिस्थितीत या ब्रिगेडचा उपयोग खुबीने करून घेतला जात असे. मात्र, हल्ली तो इतका वारंवार केला जातो की त्यामुळे सभागृहाच्या शिस्तीला ग्रहण लागते. विधानभवन परिसरात आमदारांचे वर्तन कसे असावे, यासाठीची आचारसंहिता आता निश्चित केली जाणार आहे. मुळात अशी आचारसंहिता आणावी लागावी, हीच दुर्दैवाची बाब आहे. आमदारांची विधानभवनातील वर्तणूक ही कायद्याच्या चौकटीत बसविण्याची वेळ येण्यापेक्षा नैतिकता, संसदीय मूल्यांची जपणूक आणि कर्तव्याच्या कसोटीवर निश्चित करून त्यावर अंमल झाला असता तर पुरोगामी महाराष्ट्राला  ते अधिक शोभून दिसले असते.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार