शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

प्रेमाचा झरा... डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:07 IST

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि सुमारे ७५ संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविवार, २२ जून रोजी पुण्यात होत आहे...

- सचिन ईटकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे) पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझा सबनीस सरांशी जवळून परिचय झाला. तत्पूर्वी माझ्या मराठवाड्यातील लेखक म्हणून मला त्यांच्याविषयी आपुलकीचे अनौपचारिक नाते होतेच!

गेल्या दहा वर्षांत त्यांच्याशी माझा ऋणानुबंध दिवसागणिक घट्ट होत गेला. जमीनदार कुटुंबात जन्मलेले सबनीस सर तरुणपणात वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेऊ लागले. शाहिरी करू लागले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्वतःची मानवतावादी भूमिका घासूनपुसून अधिक ठसठशीत केली. 

आदिवासी मुलांच्या अनेक कार्यशाळांमध्ये डफावर थाप देऊन त्यांनी केलेल्या आवाहनामुळे मनं पेटून उठत. मराठवाडा ही जन्मभूमी आणि खान्देशातील धुळे ही सबनीसांची कर्मभूमी होती. समीक्षक म्हणून त्यांनी वेगळी वाट चोखाळली. 

सन २०१६ पिंपरी-चिंचवड येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात  झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस यांची निवड झाली. सातत्याने वैचारिक लिखाण करणाऱ्या एका चळवळ्या समीक्षक व लेखकाला मराठी साहित्यविश्वाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ही खूप समाधानाची बाब आहे. योगायोग असा की मला त्या संमेलनाचा मुख्य समन्वयक म्हणून काम करण्याची संधी डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे मिळाली होती.

ते प्रखर विवेकवादी तसेच संवेदनशील समीक्षक, विचारवंत असून, स्वतंत्रपणे विचार मांडत आले आहेत. महापुरुषांच्या विचारांमध्ये जे जनकल्याणाचे आणि गरजेचे असेल त्याच विचारांना पुढे नेले पाहिजे, यावर ते भर देतात. 

कुठल्याही महापुरुषाच्या तत्त्वज्ञानाच्या ते आहारी जात नाहीत. आक्रमक शैलीमुळे त्यांच्याकडून एखादे विधान सुटते. त्याचा त्यांना बऱ्याचदा त्रासही सहन करावा लागला आहे. पण त्यांचे मन निर्मळ असल्यामुळे अशा अनेक बिकट प्रसंगांतून ते बाहेर पडले आहेत. 

सबनीसांनी तयार केलेला लेखकांचा आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांचा गोतावळा पाहिल्यावर थक्क व्हायला होते. उपेक्षित किंवा दुर्लक्षित वर्गातून आलेल्या शेकडो लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांची ऊर्जा वाढवली आहे. मी त्यांना प्रेमाने वाहणारा झरा असे म्हणेन.

साहित्य संमेलनाच्या त्यांच्या अध्यक्षपदाला जवळपास दहा वर्षे होत आली, पण ते अजूनही संमेलनाध्यक्षाइतकेच सतत कार्यमग्न आहेत. मध्यंतरी त्यांना जीवघेणा अपघात झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना होती. डॉ. सबनीस त्यातून बाहेर पडले. त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही मनोमन प्रार्थना. 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्यmarathiमराठीPuneपुणे