शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

प्रेमाचा झरा... डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:07 IST

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि सुमारे ७५ संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविवार, २२ जून रोजी पुण्यात होत आहे...

- सचिन ईटकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे) पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझा सबनीस सरांशी जवळून परिचय झाला. तत्पूर्वी माझ्या मराठवाड्यातील लेखक म्हणून मला त्यांच्याविषयी आपुलकीचे अनौपचारिक नाते होतेच!

गेल्या दहा वर्षांत त्यांच्याशी माझा ऋणानुबंध दिवसागणिक घट्ट होत गेला. जमीनदार कुटुंबात जन्मलेले सबनीस सर तरुणपणात वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेऊ लागले. शाहिरी करू लागले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्वतःची मानवतावादी भूमिका घासूनपुसून अधिक ठसठशीत केली. 

आदिवासी मुलांच्या अनेक कार्यशाळांमध्ये डफावर थाप देऊन त्यांनी केलेल्या आवाहनामुळे मनं पेटून उठत. मराठवाडा ही जन्मभूमी आणि खान्देशातील धुळे ही सबनीसांची कर्मभूमी होती. समीक्षक म्हणून त्यांनी वेगळी वाट चोखाळली. 

सन २०१६ पिंपरी-चिंचवड येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात  झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस यांची निवड झाली. सातत्याने वैचारिक लिखाण करणाऱ्या एका चळवळ्या समीक्षक व लेखकाला मराठी साहित्यविश्वाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ही खूप समाधानाची बाब आहे. योगायोग असा की मला त्या संमेलनाचा मुख्य समन्वयक म्हणून काम करण्याची संधी डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे मिळाली होती.

ते प्रखर विवेकवादी तसेच संवेदनशील समीक्षक, विचारवंत असून, स्वतंत्रपणे विचार मांडत आले आहेत. महापुरुषांच्या विचारांमध्ये जे जनकल्याणाचे आणि गरजेचे असेल त्याच विचारांना पुढे नेले पाहिजे, यावर ते भर देतात. 

कुठल्याही महापुरुषाच्या तत्त्वज्ञानाच्या ते आहारी जात नाहीत. आक्रमक शैलीमुळे त्यांच्याकडून एखादे विधान सुटते. त्याचा त्यांना बऱ्याचदा त्रासही सहन करावा लागला आहे. पण त्यांचे मन निर्मळ असल्यामुळे अशा अनेक बिकट प्रसंगांतून ते बाहेर पडले आहेत. 

सबनीसांनी तयार केलेला लेखकांचा आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांचा गोतावळा पाहिल्यावर थक्क व्हायला होते. उपेक्षित किंवा दुर्लक्षित वर्गातून आलेल्या शेकडो लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांची ऊर्जा वाढवली आहे. मी त्यांना प्रेमाने वाहणारा झरा असे म्हणेन.

साहित्य संमेलनाच्या त्यांच्या अध्यक्षपदाला जवळपास दहा वर्षे होत आली, पण ते अजूनही संमेलनाध्यक्षाइतकेच सतत कार्यमग्न आहेत. मध्यंतरी त्यांना जीवघेणा अपघात झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना होती. डॉ. सबनीस त्यातून बाहेर पडले. त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही मनोमन प्रार्थना. 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्यmarathiमराठीPuneपुणे