शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

गुजरातचे त्रिकोणी राजरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 09:32 IST

हिमाचल प्रदेशनंतर अखेर वीस दिवसांनी भारतीय निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

हिमाचल प्रदेशनंतर अखेर वीस दिवसांनी भारतीय निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १८२ जागांसाठी १ व ५ डिसेंबरला मतदान आणि हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला मतमोजणी होईल. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे आणि दोन्हीकडे पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा तो पक्ष करतो. तरीदेखील मतदानाच्या तारखा उशिरा जाहीर झाल्याने गुजरातमध्ये निवडणुकीआधी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटनांसाठी सत्ताधारी पक्षाला जास्तीचे वीस दिवस मिळाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनवेळा गृहराज्याच्या दौऱ्यावर गेले. रविवारी सायंकाळी मोरबी येथे झुलता पूल तुटल्याने १३५ जणांचा मृत्यू झाला, त्या दिवशीही ते गुजरातमध्येच होते. दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रमही त्यांनी केले. तथापि, निवडणूक आयोगाचा हा अजिबात पक्षपात नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ गुरुवारच्या पत्रकार परिषदेत त्यांना बरीच शाब्दिक कसरत करावी लागली.

अगदी मोरबी पूल दुर्घटना हेदेखील उशीर होण्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले.  हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत ८ जानेवारीला तर गुजरातची मुदत ८ फेब्रुवारीला संपत असल्याने उशीर झाला नसल्याचा दावा राजीव कुमार यांनी केला. परंतु, वीस दिवस उशिरा गुजरातची तारीख जाहीर करण्याशी त्याचा काय संबंध, हे त्यांना सांगता आले नाही. गुजरातमध्ये आता केवळ ३८ दिवसच आचारसंहिता असेल. असो. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा सत्तेवर येण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. गेली जवळपास २८ वर्षे भाजप तिथे सत्तेवर आहे. सातव्यांदा सत्ता मिळाल्यानंतर पूर्वेकडील पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांच्या ३३ वर्षांच्या सलग कारकिर्दीच्या विक्रमाशी उजव्या भाजपला पश्चिमेकडील गुजरातमध्ये बरोबरी करता येईल. मार्च १९९५ मध्ये पायउतार झालेले काँग्रेसचे छबीलदास मेहता हे गुजरातचे शेवटचे गैरभाजप मुख्यमंत्री. त्यानंतर भाजपचे विजयपर्व सुरू झाले. केशूभाई पटेल, सुरेश मेहता, शंकरसिंह वाघेला, दिलीप पारिख यांच्यानंतर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनले. त्यांनी सलग तीन विजय मिळवले व नंतर राष्ट्रीय पातळीवर भाजपचा चेहरा बनले.

२०१४ मध्ये बडोदा व वाराणसी येथून विजयी होऊन पंतप्रधान बनल्यानंतर बडोद्याच्या खासदारकीचा राजीनामा दिला. मोदी यांच्यानंतर आनंदीबेन पटेल, विजय रूपाणी व भूपेंद्र पटेल असे तीन मुख्यमंत्री गेल्या आठ वर्षांत गुजरातने पाहिले खरे; परंतु गुजरातच्या राजकारणाचा चेहरा नरेंद्र मोदी हेच राहिले. गेल्या वेळच्या, २०१७ च्या निवडणुकीत मोदी हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्यानेच भाजपला काँग्रेसकडून कडवी लढत दिली गेली. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकूर हे तरुणांचे त्रिकूट काँग्रेससाठी मैदानात होते. परंतु, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याचा फटका काँग्रेसला बसला. तरीदेखील भाजप शंभरचा आकडा गाठू शकला नाही. काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळविला. त्यापैकी डझनभर आमदार गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षात गेले. आरक्षणासाठी लढणारे हार्दिक पटेल हेही भाजपमध्ये गेले. काँग्रेस पक्ष दुबळा होत गेला. राजकीय डावपेचात निष्णात अहमद पटेल आणि महाराष्ट्रातून जाऊन गुजरातमध्ये लढणारे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाकाळात निधन झाले. या दोघांचीही कमतरता पक्षाला यंदाच्या निवडणुकीत जाणवेल. यंदा काँग्रेसकडे मोठा चेहरा नाही. नरेंद्र मोदी व अमित शहा ही दिग्गजांची जोडी पूर्ण ताकदीने रणांगणात उतरली आहे.

पंजाबसारखा चमत्कार घडविण्याचा दावा अरविंद केजरीवाल करीत आहेत. त्यांचा आम आदमी पक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहे. पंजाबचे राजकारण वेगळे व गोव्याचेही वेगळे. गोव्यातही सत्तेवर येण्याचा दावा करीत आप ताकदीने उतरला होता. गुजरातचे साधारण चित्र असे आहे, की शहरी भागात भाजपचा तर ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा ते चलनी नोटांवर लक्ष्मी व गणपतीची छायाचित्रे लावण्याची मागणी करीत आम आदमी पक्षाने बऱ्यापैकी हिंदुत्ववादी सूर धरला आहे. त्यामुळे तो पक्ष भाजपची हक्काची हिंदुत्ववादी मते खातो की भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडतो, यावर संख्याबळाचे अंतिम आकडे अवलंबून असतील. विधानसभा निवडणुकीत भाजपचे पारडे स्पष्टपणे जड आहे. ते तसेच राहावे असा मोदी-शहा यांचा प्रयत्न राहील. कारण, त्यावरच दीड वर्षावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची समीकरणे ठरतील.

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप