शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराची ‘महाराजधानी’! जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 05:26 IST

कालपरवाच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ (एनसीआरबी) या यंत्रणेचा ताजा अहवाल सार्वजनिक झाला. त्यानुसार महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे राज्य ठरले आहे.

महाराष्ट्र हे जन्मापासूनच अनेक बाबतीत सकारात्मक अर्थाने सातत्याने देशातील क्रमांक एकचे राज्य होते आणि आजही आहे. सर्वाधिक देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), सर्वाधिक दरडोई उत्पन्न, सर्वाधिक औद्योगीकरण, सर्वाधिक रोजगार, सामाजिक अभिसरण.. अशा अनेक निकषांवर राज्याने वर्षानुवर्षे आपला झेंडा फडकत ठेवला आणि देशातील सर्वाधिक विकसित राज्याचा बहुमानही कायम राखला. पुढे इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या वर्चस्वाला आव्हान देणे सुरू केले. त्यापैकी काही राज्ये एखाद-दुसऱ्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या पुढेही निघून गेली. तरीदेखील अद्याप तरी कोणत्याही राज्याला सर्वाधिक विकसित राज्याचा बहुमान महाराष्ट्रापासून हिरावून घेता आलेला नाही; परंतु हे खेदपूर्वक नमूद करावे लागते, की गत काही वर्षांत महाराष्ट्र काही बाबतीत नकारात्मक अर्थानेही क्रमांक एकचे राज्य म्हणून पुढे येऊ लागला आहे.

कालपरवाच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ (एनसीआरबी) या यंत्रणेचा ताजा अहवाल सार्वजनिक झाला. त्यानुसार महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब खचितच भूषणावह नाही. त्यातही गंभीर बाब म्हणजे तीनही वर्षी महाराष्ट्राने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांच्या संख्येच्या बाबतीत आधीच्या वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. भ्रष्टाचाराच्या सर्वच निकषांवर महाराष्ट्राने क्रमांक एक सोडलेला नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदलेल्या गुन्ह्यांची संख्या, न्यायालयात प्रलंबित भ्रष्टाचाराशी निगडित खटल्यांची संख्या, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सर्वात कमी शिक्षेचा दर, अशा सर्वच बाबतीत इतर एकही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही फिरकू शकले नाही!

या तीन वर्षांच्या कालखंडात राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सत्तेची खुर्ची उबविली असल्याने कुणालाही दुसऱ्याकडे बोट दाखविण्यास वाव नाही. राजकारण्यांचा भ्रष्टाचार मोठा की नोकरशहांचा, अशी चर्चा बरेचदा रंगते. मुळात ही चर्चाच निरर्थक आहे. राज्यकर्ते खंबीर, खमके असल्यास नोकरशहा भ्रष्टाचार करण्यास धजावूच शकत नाहीत! उलट जेव्हा राज्यकर्तेच भ्रष्टाचारात आकंठ बुडतात, तेव्हा नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराला तर धरबंधच राहत नाही! इतरत्र कुठे जाण्याची गरजच नाही. महाराष्ट्रानेच ही दोन्ही चित्रे अनुभवली आहेत. चिरीमिरीची प्रकरणे सोडून द्या; पण नोकरशाहीच्या पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांमध्ये राज्यकर्त्यांचा वाटा असतोच असतो! भ्रष्टाचार केवळ नोकरशाहीच्या पातळीवर होतो, असे मानण्याचे अजिबात कारण नाही. अनेकदा तर राजकीय नेत्यांकडूनच नोकरशहांवर भ्रष्टाचार करण्यासाठी आणि त्यातून त्यांचा वाटा पोहोचविण्यासाठी दबाव आणला जातो.

जेव्हा सरकार एकापेक्षा जास्त राजकीय पक्षांच्या टेकूवर उभे असते आणि भविष्य धूसर असते, तेव्हा तर राजकीय नेते आणि नोकरशहांच्या अभद्र युतीला जास्तच बहार येते! मध्यंतरी माहितीचा अधिकार आणि लोकपाल प्रणालीचे खूप गुणगान झाले. या दोन प्रणाली कार्यरत झाल्या, की भ्रष्टाचार संपलाच म्हणून समजा, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. दुर्दैवाने त्यानंतर भ्रष्टाचार कमी व्हायचे तर सोडाच, उलट चांगलाच वाढला, हेच एनसीआरबीची आकडेवारी अधोरेखित करीत आहे. केवळ प्रणाली आणून चालणार नाही, तर त्या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी, मानसिकतेत बदल आणि कायद्याची भीती निर्माण करणे, या बाबी आत्यंतिक गरजेच्या आहेत. त्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा (एसीबी)सह सर्वच भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा, आवश्यक तेवढे मनुष्यबळ व तंत्रज्ञान उपलब्ध करून मजबूत करणे आवश्यक आहे.

सोबतीला भ्रष्टाचाराशी संबंधित खटले वेगाने निकाली काढणे, शिक्षांची कडक व जलद अंमलबजावणी करणे, कायद्यांत बदल करून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अधिक कडक शिक्षांची तरतूद करणे, जनजागृती करणे इत्यादी पावलेही उचलली जायला हवी. बहुतांश प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार रोख रकमेत होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी स्वाभाविकपणे जादा दर्शनी मूल्यांच्या चलनी नोटांचा वापर होतो. आता देशात डिजिटल पेमेंट प्रणाली चांगलीच अंगवळणी पडली आहे. तेव्हा केंद्र सरकारने हळूहळू चलनातून बड्या नोटा काढून घेण्याचा पर्यायही तपासून बघायला हवा. देशाच्या प्रगतीसाठी सर्वाधिक बाधक असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई कोणत्या एका मार्गाने नव्हे, तर बहुविध मार्गांनीच लढावी लागणार आहे आणि त्यासाठी जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार आहे!

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्र