शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय! मुंबई एपीएमसीची वाट काेण लावतंय?

By नारायण जाधव | Updated: January 8, 2024 10:43 IST

गेल्या वर्षी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील साडेतीनशे बाजार समित्यांची शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे. या बाजार समितीच्या १२ संचालकांना विविध कारणास्तव अपात्र ठरवूनदेखील मायबाप राज्यकर्त्यांनी समितीच्या संचालक मंडळांतील आपल्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या अपात्रतेस स्थगिती दिली आहे. ही स्थगिती दिली असली तरी कायदेशीर निर्बंधामुळे बाजार समितीच्या प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा आल्या आहेत. यामुळे दैनंदिन हजारो कोटींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, साखर-मसाला आणि दाणाबंदर या पाचही बाजारपेठांची पूर्ण वासलात लागली आहे.

गेल्या वर्षी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. याच दरम्यान सभापती अशोक डक व उपसभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर २०२३ अखेर पदाचा राजीनामा दिला. शिवाय त्यानंतरच्या कालावधीत आणखी तीन सदस्य तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरले. नियमानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठका होण्यासाठी १८ पैकी ११ संचालक असतील तरच गणपूर्ती पूर्ण होते. मात्र, सद्य:स्थितीत एपीएमसीत १८ पैकी १२ सदस्य अपात्र ठरले असून, केवळ ६ सदस्य संचालक मंडळावर आहेत. याच दरम्यान अशाेक डक यांना काळजीवाहू सभापती म्हणून जबाबदारी दिली. तेव्हापासून ती त्यांच्याकडेच आहे. परंतु, संचालक मंडळाची गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने बैठका ठप्प आहेत. परिणामी धोरणात्मक निर्णयाला खीळ बसली आहे.

नको तिथे नको ती कामे घेण्यात येत आहेत, तर अत्यावश्यक कामांना फाटा देण्यात आला आहे. दाणाबंदरात केलेली ३० कोटींची कामे, विविध बैठकांसाठी येणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींवर होणारी उधळपट्टी, शौचालय आणि एफएसआय घोटाळा, दाणाबंदर-साखर मसाला मार्केटच्या सेस वसुलीत होणारी हात की सफाई यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर विरजण पडले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचपैकी धोकादायक झालेल्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा मुद्दा गाजत आहे. सध्या रिअल इस्टेल मार्केटला जो उठाव आला आहे, त्यातून राज्यकर्त्यांच्या तोंंडालाही पाणी सुटले आहे. यामुळे त्यांनी केवळ कांदा-बटाटाच नव्हे तर मुख्यालयासह पाचही बाजारपेठांच्या पुनर्बांधणीचा घाट रचला आहे. तोही संचालक मंडळाचा कोरम पूर्ण नसताना. सध्याच्या आहे त्या संचालकांनी ठरावीक राज्यकर्त्यांना त्यासाठी ठेकेदारी आणि टक्केवारीचे गाजर दाखविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMarketबाजार