शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय! मुंबई एपीएमसीची वाट काेण लावतंय?

By नारायण जाधव | Updated: January 8, 2024 10:43 IST

गेल्या वर्षी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील साडेतीनशे बाजार समित्यांची शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे. या बाजार समितीच्या १२ संचालकांना विविध कारणास्तव अपात्र ठरवूनदेखील मायबाप राज्यकर्त्यांनी समितीच्या संचालक मंडळांतील आपल्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या अपात्रतेस स्थगिती दिली आहे. ही स्थगिती दिली असली तरी कायदेशीर निर्बंधामुळे बाजार समितीच्या प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा आल्या आहेत. यामुळे दैनंदिन हजारो कोटींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, साखर-मसाला आणि दाणाबंदर या पाचही बाजारपेठांची पूर्ण वासलात लागली आहे.

गेल्या वर्षी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. याच दरम्यान सभापती अशोक डक व उपसभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर २०२३ अखेर पदाचा राजीनामा दिला. शिवाय त्यानंतरच्या कालावधीत आणखी तीन सदस्य तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरले. नियमानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठका होण्यासाठी १८ पैकी ११ संचालक असतील तरच गणपूर्ती पूर्ण होते. मात्र, सद्य:स्थितीत एपीएमसीत १८ पैकी १२ सदस्य अपात्र ठरले असून, केवळ ६ सदस्य संचालक मंडळावर आहेत. याच दरम्यान अशाेक डक यांना काळजीवाहू सभापती म्हणून जबाबदारी दिली. तेव्हापासून ती त्यांच्याकडेच आहे. परंतु, संचालक मंडळाची गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने बैठका ठप्प आहेत. परिणामी धोरणात्मक निर्णयाला खीळ बसली आहे.

नको तिथे नको ती कामे घेण्यात येत आहेत, तर अत्यावश्यक कामांना फाटा देण्यात आला आहे. दाणाबंदरात केलेली ३० कोटींची कामे, विविध बैठकांसाठी येणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींवर होणारी उधळपट्टी, शौचालय आणि एफएसआय घोटाळा, दाणाबंदर-साखर मसाला मार्केटच्या सेस वसुलीत होणारी हात की सफाई यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर विरजण पडले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचपैकी धोकादायक झालेल्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा मुद्दा गाजत आहे. सध्या रिअल इस्टेल मार्केटला जो उठाव आला आहे, त्यातून राज्यकर्त्यांच्या तोंंडालाही पाणी सुटले आहे. यामुळे त्यांनी केवळ कांदा-बटाटाच नव्हे तर मुख्यालयासह पाचही बाजारपेठांच्या पुनर्बांधणीचा घाट रचला आहे. तोही संचालक मंडळाचा कोरम पूर्ण नसताना. सध्याच्या आहे त्या संचालकांनी ठरावीक राज्यकर्त्यांना त्यासाठी ठेकेदारी आणि टक्केवारीचे गाजर दाखविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMarketबाजार