शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

गूढ कथाकाराची जन्मशताब्दी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 12:04 IST

श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला  १० जुलैपासून प्रारंभ होत आहे. जीए कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अक्षरधारा यांच्यावतीने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त...  

- प्रा. मिलिंद जोशी आधुनिक मराठी लघुकथेच्या क्षेत्रात जी. ए. कुलकर्णी यांनी कथाकार म्हणून अतुलनीय निर्मिती केली आहे. त्यांचे नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. जन्म बेळगावचा. वडील कोर्टात लिपिक होते. जी. ए. लहान असतानाच ते वारले. ते शाळेत जाऊ लागल्यानंतर आईचेही निधन झाले. बहिणीदेखील अकाली वारल्या. लहान वयातच नियतीच्या तडाख्यांमुळे त्यांचे अंत:करण विदीर्ण झाले. त्यामुळेच जीवनाची अर्थशून्यता आणि नियतीवाद हा लहानपणापासून त्यांच्या चिंतनाचा विषय बनला. ज्याला नियती म्हटले जाते. तीच माणसांची आयुष्ये निर्धारित करते, हा सारा कळसूत्राचा खेळ आहे. लौकिक अर्थाने त्याला योगायोग म्हटले जाते पण हे नियतीदानच आहे. अशा नियतीच्या हातचे खेळणे बनलेली माणसेच जीएंच्या बहुतांश कथांच्या केंद्रस्थानी आहेत. १९३१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. इंग्रजी विषय घेऊन त्यांनी लिंगराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.ए. झाल्यानंतर ते काही काळ मुंबईच्या सरकारी कचेरीत नोकरीला होते. १९४७ला ते परत बेळगावला आले आणि हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. असांकेतिक, अनोख्या, आक्षेपार्ह मानवी व्यवहारासंबंधी त्यांना प्रचंड कुतूहल होते. काही अमानुष सिद्धी, शक्ती साध्य करण्यासाठी जी साधना माणसे गुप्तपणे करतात. तिची माहिती मिळविणे हाही त्यांच्या कुतूहलाचा भाग होता. ही माहिती त्यांना त्यांच्या महाविद्यालयातला शिपाई तिरकाप्पा देत असे. या साऱ्यातून अनुभवाचा मोठा खजिना त्यांच्या हाती लागला. ‘माणूस नावाचं बेट’ या कथेमुळे जीएंनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. स्थळ काळात असणारी आयुष्याची सुख दु:खे, त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य त्याचे दर्शन घडविण्याचा, वेध घेण्याचा प्रयत्न या गंभीर प्रकृतीच्या कथाकाराने केला. जीएंनी चार प्रकारच्या कथा लिहिल्या. पारंपरिक पद्धतीच्या कौटुंबिक कथा, ज्यांचा दु:खांत शेवट असतो. मानवी व्यवहारात काही घटना व संघर्ष मूलभूत स्वरुपाचे असतात, त्यांच्या कथा. आधुनिक काळाशी संदर्भित रूपक कथा अगर बोधकथा आणि ग्रीक, पाश्चिमात्य साहित्यातील गाजलेल्या कथांचा, आधुनिक काळाशी सुसंगत अर्थ व्यक्त करणाऱ्या कथा. काही समीक्षकांना जीएंनी कथेत गुंतून न पडता कादंबरीकडे वळायला हवे होते, असे वाटते. त्याबद्दल जीएंनी स्वत: एक महत्त्वाचा लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, ‘मी केवळ कथा लिहिल्या कारण, हा साहित्य प्रकार मला आव्हानात्मक वाटतो. कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज नसतो. कोळ्याने विणलेल्या जाळ्याला जसा केंद्रबिंदू असतो. त्याप्रमाणे लघुकथेलाही एक सेंद्रिय स्वरुपाचे केंद्र असते.’ जीएंना आपल्या मित्रांना, चाहत्यांना पत्रे लिहिण्याचा छंद होता. साहित्यिक जगातल्या सांकेतिक मान-सन्मानांपासून ते तसे दूरच राहिले. दोन सन्मान त्यांना मिळाले. साहित्य अकादमीचे पारितोषिक  त्यांच्या काजळमाया कथासंग्रहाला मिळाले. ते त्यांनी स्वीकारले पण  तांत्रिक कारणांसाठी जेव्हा वाद झाला तेव्हा त्यांनी ते परत केले.  जीएंच्या निधनानंतर पुण्यातल्या एका रस्त्याला जी. ए. कुलकर्णी पथ असे नाव दिले. त्या समारंभाला पु. ल. देशपांडे उपस्थित होते. जीएंच्या नावाची पाटी उंच असल्यामुळे तिचे अनावरण करताना पुलंना थोडी यातायात करावी लागली. भाषणात पूल म्हणाले, ‘जीए नावाच्या पाटीपर्यंत पोहोचण्यासाठी इतके कष्ट पडतात. त्यांच्याइतकी प्रतिभेची उंची गाठणे किती अवघड आहे, हे सांगायलाच नको. जीए हे मराठी कथेतले उत्तुंग शिखर आहे. त्याला अभिवादन करण्यातच मी धन्यता मानतो.’ पुलंची ही भावना समस्त मराठी माणसांची आहे.(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)