शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

हा औचित्यभंगच!

By admin | Updated: March 2, 2016 02:49 IST

घटनात्मक नैतिकता पाळायची नाही, असा जणू काही चंगच आपल्या देशातील राजकीय पक्षांनी बांधला आहे काय, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे माजी महालेखापाल

घटनात्मक नैतिकता पाळायची नाही, असा जणू काही चंगच आपल्या देशातील राजकीय पक्षांनी बांधला आहे काय, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे माजी महालेखापाल विनोद राय यांची सरकारी बँकांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक. भारताच्या राज्यघटनेच्या १४८(१) कलमातील तरतुदीनुसार महालेखापाल या घटनात्मक पदावर काम केलेल्या व्यक्तीची कोणत्याही सरकारी, निमसरकारी वा संलग्न आस्थापनात वा कार्यालयात किंवा मंडळात कोठल्याही पदावर नेमणूक करता येत नाही. परंतु या नव्या मंडळाचे अध्यक्षपद विनावेतन व अर्धवेळ कामाचे व एकप्रकारे ‘मानद पद’ असल्याने राज्यघटनेतील संबंधित तरतुदीचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असा युक्तिवाद सरकार नक्कीच करणार आहे. या तरतुदीचा शब्दश: अर्थ लावला, तर सरकारचा युक्तिवाद योग्य ठरेल. पण राज्यघटनेतील प्रत्येक तरतुदीला त्यातील शब्दांपलीकडे आशय आहे आणि त्याचा संबंध ‘घटनात्मक नैतिकते’शी आहे. ‘ही घटना जितकी उत्तम प्रकारे राबवली जाईल, तितकी ती चांगली ठरेल आणि जर ती योग्य प्रकारे अंमलात आणली गेली नाही, तर ती वाईट असल्याचे मानले जाईल’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना संमत होण्याआधी घटना समितीसमोर केलेल्या आपल्या अंतिम भाषणात म्हटले होते. त्याचबरोबर ‘ही घटना राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय संरचना बदलून नव्याने त्या आखण्यात आल्या, तर राज्यघटनेची चौकट तशीच ठेवूनही ती आतून पोखरता येऊ शकते’, असेही डॉ आंबेडकर यांनी म्हणून ठेवले आहे. बाबासाहेबांच्या या दोन विधानांचा रोख हा ‘घटनात्मक नैतिकते’वर जसा आहे, तसा तो ‘प्रशासकीय औचित्या’वरही आहे. नेमकी हीच ‘घटनात्मक नैतिकता’ व हेच ‘प्रशासकीय औचित्य’ गेल्या काही दशकात सरसहा पायदळी तुडवले जात आले आहे. विनोद राय यांची नेमणूक हे त्याचे ताजे उदाहरण. बंँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून अशा मंडळाची स्थापन करावी, ही शिफारस केंद्र सरकारच्या अर्थखात्यातील वित्तसेवा विभागाने केली होती. विनोद राय निवृत्तीपूर्वी या विभागाचे सचिव होते. सचिवपदावरून निवृत्त झाल्यावरच त्यांची महालेखापाल म्हणून नेमणूक झाली होती. हा सारा तपशील राय यांच्या ‘हितसंबंधां’वर प्रकाश टाकत नाही काय? कायद्याच्या कक्षेत राहून करण्यात आलेला हा औचित्यभंग आहे. ‘महालेखापाल’ या घटनात्मक पदाबाबत जेव्हा घटना समितीत चर्चा झाली, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की, ‘लोकशाही राज्यव्यवस्थेतील राज्यकारभाराच्या दृष्टीने हे पद न्याययंत्रणेपेक्षाही महत्वाचे मानले गेले पाहिजे. सरकारी योजना व कार्यक्र म यांच्यासाठी जी आर्थिक तरतूद केली जाईल, ती योग्यरीत्या खर्च होते की नाही, याचा आढावा घेण्याला लोकशाही राज्यकारभारात अनन्यसाधारण असे महत्व आहे’. लोकशाहीत जनहिताच्या कारभारात कार्यक्रम व योजना यांच्या अंमलबजावणीसाठी जो पैसा कराच्या रूपाने सरकार गोळा करते, त्याचा विनियोग उचितरीत्या होणे अत्यंत आवश्यक आहे, असा बाबासाहेबांच्या या उद्गारांचा मतितार्थ होता. अशा अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तीला कोणतेही आमिष दाखवले जाऊ नये किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये, याच हेतूने महालेखापल या पदाला ‘घटनात्मक’ दर्जा देण्यात आला. परंतु ‘प्रशासकीय औचित्या’चा मुद्दाच आता राज्यकारभारात उरलेला नाही, हेच राय यांची नेमणूक दर्शवते. याच राय यांना यंदाच्या प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाय त्यांची महालेखापाल म्हणूनची कारकीर्ददेखील वादग्रस्तच ठरली होती. वस्तुत: महालेखापालाने पडद्याआड राहून प्रसिद्धीच्या झोतात न येता राज्यकारभारावर अंकुश ठेवण्याचे आपले काम पार पाडावे, अशीच घटनाकारांची अपेक्षा होती. पण ‘भ्रष्टाचारा’च्या मुद्याभोवती सत्तेसाठीचे साठमारीचे राजकारण फिरू लागल्यावर ‘महालेखापाल’ पदाला ‘महत्व’ येत गेले. ‘टू-जी’, ‘कोळसा’ या घोटाळ्यातील महालेखापालांचे अहवाल हे सत्तेच्या राजकारणातील हत्त्यार बनले. हे अहवाल राय यांनीच दिले होते,व त्याचा भाजपाला फायदा झाला होता. त्यामुळेच त्यांना पद्म पुरस्कार व बँकविषयक मंडळाचे अध्यक्षपद ही बक्षिसी, असा आरोप आता होत आहे. आजचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असताना महालेखापाल पद भूषविलेल्या व्यक्तीला सरकारने कोणत्याही कामासाठी नेमू नये, असा आग्रह सभागृहात धरला होता. पण तो ‘बोलाचाच भात...’ होता, हेही तेवढेच खरे. समाजजीवनात आणि साहजिकच राजकारणातही, मूल्यांची इतकी घसरण होत असताना, ‘घटनात्मक नैतिकते’चा आग्रह अनाठायी नाही का, हा प्रश्न आता विचारला जाणे अपरिहार्य ठरू लागणार असेच म्हणायला हवे!