शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

पुरे झाला त्रागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:36 IST

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. ...

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. त्यांचे पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी नाशिकमुक्कामी विधान करुन आगीत तेल ओतले. खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हावेसे वाटेल, पण पक्षाला तसे वाटायला हवे ना, असे महाजन म्हणाले. अर्थात महाजन काही चुकीचे विधान केलेले नाही. पण आता पक्षातील सहकारी त्यांना वास्तव लक्षात आणून देत असले तरी खडसे ते समजून घेत नाही, हे दुर्देव आहे. ४० वर्षे मी भाजपामध्ये आहे, भाजपाला वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले, अनेकांना पदे देऊन संधी दिली, असे खडसे वारंवार म्हणत असतात. त्यांचे कथन पूर्ण सत्य आहे, कोणीही ते नाकारत नाही. परंतु पुन्हा त्यांनीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमक्ष म्हटल्याप्रमाणे, सद्यस्थितीत भाजपामध्ये ते चौकशीतील व्यक्ती आहे, क्लिन चिटमधील नाही, हे सत्य कटू असले तरी स्विकारावे लागणार आहे. शरद पवार यांच्या प्रसिध्द वाक्याचा आधार बहुदा भाजपाने खडसे यांच्याबाबत घेतला असावा. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ या वाक्प्रचारानुसार भाजपाने खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना बळ देण्याचे निश्चित केलेले दिसते. आणि महाजन यांनी या विश्वासाला पात्र ठरत पक्षाला अनुकूल असे निकाल दिले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, जामनेर व जळगाव पालिका निवडणूक महाजन यांनी जिंकून दाखवली. जळगाव महापालिका निवडणुकीत खडसे यांनी केवळ समर्थक उमेदवारांसाठी दोन दिवस सभा घेतल्या तरी सहा पैकी केवळ एक उमेदवार निवडून आला. जामनेरात महाजन यांनी सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या. मात्र खडसे यांना मुक्ताईनगरात १७ पैकी १३ जागा जिंकता आल्या. राजकारणात नेतृत्वाची पिढी बदलत आहे. भाजपामधील तरुण पिढीला खडसे यांच्याविषयी आदर असला तरी महाजन यांच्याविषयी आपुलकी आहे. सत्ता असल्याने कामांसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ महाजन यांच्याभोवती असते. लागोपाठच्या विजयामुळे महाजन यांचा प्रभाव वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. राजकारणाचे बदलते वास्तव पाहता खडसे अस्वस्थ आहेत. त्यातून पक्षाला अडचणीत आणणारी विधाने, कारवाया खडसे यांच्याकडून सुरु आहे. आमदारांच्या बनावट लेटरपॅडवरील तक्रार, प्रचाराची बनावट क्लिप, मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारा भाजपातील पहिला आमदार असल्याचे विधान हे पाहता भाजपा आणि खडसे या दोघांनी समन्वयाने वाद टाळायला हवे, अशीच भावना हितचिंतकांमध्ये आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव