शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरे झाला त्रागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:36 IST

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. ...

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. त्यांचे पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी नाशिकमुक्कामी विधान करुन आगीत तेल ओतले. खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हावेसे वाटेल, पण पक्षाला तसे वाटायला हवे ना, असे महाजन म्हणाले. अर्थात महाजन काही चुकीचे विधान केलेले नाही. पण आता पक्षातील सहकारी त्यांना वास्तव लक्षात आणून देत असले तरी खडसे ते समजून घेत नाही, हे दुर्देव आहे. ४० वर्षे मी भाजपामध्ये आहे, भाजपाला वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले, अनेकांना पदे देऊन संधी दिली, असे खडसे वारंवार म्हणत असतात. त्यांचे कथन पूर्ण सत्य आहे, कोणीही ते नाकारत नाही. परंतु पुन्हा त्यांनीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमक्ष म्हटल्याप्रमाणे, सद्यस्थितीत भाजपामध्ये ते चौकशीतील व्यक्ती आहे, क्लिन चिटमधील नाही, हे सत्य कटू असले तरी स्विकारावे लागणार आहे. शरद पवार यांच्या प्रसिध्द वाक्याचा आधार बहुदा भाजपाने खडसे यांच्याबाबत घेतला असावा. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ या वाक्प्रचारानुसार भाजपाने खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना बळ देण्याचे निश्चित केलेले दिसते. आणि महाजन यांनी या विश्वासाला पात्र ठरत पक्षाला अनुकूल असे निकाल दिले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, जामनेर व जळगाव पालिका निवडणूक महाजन यांनी जिंकून दाखवली. जळगाव महापालिका निवडणुकीत खडसे यांनी केवळ समर्थक उमेदवारांसाठी दोन दिवस सभा घेतल्या तरी सहा पैकी केवळ एक उमेदवार निवडून आला. जामनेरात महाजन यांनी सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या. मात्र खडसे यांना मुक्ताईनगरात १७ पैकी १३ जागा जिंकता आल्या. राजकारणात नेतृत्वाची पिढी बदलत आहे. भाजपामधील तरुण पिढीला खडसे यांच्याविषयी आदर असला तरी महाजन यांच्याविषयी आपुलकी आहे. सत्ता असल्याने कामांसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ महाजन यांच्याभोवती असते. लागोपाठच्या विजयामुळे महाजन यांचा प्रभाव वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. राजकारणाचे बदलते वास्तव पाहता खडसे अस्वस्थ आहेत. त्यातून पक्षाला अडचणीत आणणारी विधाने, कारवाया खडसे यांच्याकडून सुरु आहे. आमदारांच्या बनावट लेटरपॅडवरील तक्रार, प्रचाराची बनावट क्लिप, मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारा भाजपातील पहिला आमदार असल्याचे विधान हे पाहता भाजपा आणि खडसे या दोघांनी समन्वयाने वाद टाळायला हवे, अशीच भावना हितचिंतकांमध्ये आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव