शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

एवढेच सांगायचे...मोहनजी, आता क्षिप्र चल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:54 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो. मात्र पुस्तके आणि त्यांनी निर्माण केलेल्या समजुती तशाच राहतात. संघानेही कालानुरूप बदलले पाहिजे व तो बदलत आहे ही सरसंघचालक मोहन भागवत यांची कोलांटउडी नाही. काळाने त्यांच्या व संघातील नव्या विचारांच्या लोकांच्या मनात घडवून आणलेली ही एक चांगल्या व स्वागतार्ह बदलाची चिन्हे आहेत. सारे बदलले तरी आम्ही तसेच आहोत ही कर्मठ भूमिका फार लवकर कालबाह्य होते. १९२५ मध्ये स्थापन झालेला व गेली १२० वर्षे तसाच, गणवेशापासून विचारांपर्यंत राहिलेला संघ हा त्यातल्याच नव्यांना कालविसंगत वाटू लागला होता. त्यातून सावरकरांच्या इच्छेविरुद्ध जाऊन संघाने जनसंघाची स्थापना केली. त्याला लोकशाहीच्या गरजेनुसार समाजाभिमुख होणे भाग पडले. परिणामी संघाच्या तुलनेत त्याला मिळणारा लोकमताचा पाठिंबा मोठा होता व तो क्रमाने वाढत गेला. हा पाठिंबाच संघाच्या बंद विचारांसमोरचे आव्हान ठरला. जनसंघात वा भाजपात संघाबाहेरून आलेली माणसे संघविचार वा संघगुरूंना कशी मानतील? किंवा त्यांना आपले परात्पर गुरू तरी कसे समजतील? मग त्यांना सांभाळायला (कारण खरी सांभाळायची असते ती सत्ता, संघटना नव्हे) आपली कुंपणे जरा किलकिली करणे गरजेचे होते. इतर संघटनांना ही गरज भासली नाही. गांधीजी कालानुरूप बदलत राहिले. १९२० पूर्वी चातुर्वर्ण्य म्हणणारे गांधी नंतरच्या काळात फक्त आंतरजातीय लग्नांनाच परवानगी देणारे व त्याला हजर राहणारे बनले. ईश्वर आणि अल्ला यांचा एकत्र उच्चार करू लागले. ज्या संघटना त्यांच्या पोथ्यांना घट्ट धरून राहिल्या त्या साऱ्यांच्याच समोर काळाचे संकट उभे राहिले. ते मार्क्सच्या पोथीवाद्यांना जरा उशिरा समजले. समाजवाद्यांना ते समजले तेव्हा ते जवळपास संपलेही होते. आपले राजकीय आद्यग्रंथच नव्हे तर आपल्या धार्मिक पोथ्याही दिवसेंदिवस कालविसंगत होत असतात. त्या स्वत:वर लादून ठेवण्याचे वर्तमानाचे काम नव्हे. अखेर माणूस हाच तेवढा खरा व तोच तेवढा सनातन असतो. तो काळानुरूप बदलतो. मार्क्सचे कॅपिटल मात्र बदलत नाही. हिटलरचे ‘माइन काम्फ’ किंवा माओचे ‘रेड बुक’ही तसेच राहते. आपल्याकडे यात फार वेगाने बदल झाले आहेत. शंकराचार्यांना ज्ञानेश्वरांनी खोडून काढले आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ टिळकांनी चुकीचा ठरवला. या स्थितीत ‘बंच आॅफ थॉट्स’ हे गोळवलकरांचे सांगणे असले तरी आणि ते मूळ स्वरूपात उपलब्ध असले तरी त्याचे आजवर अनुयायी राहिलेले लोक अर्ध्या चड्ड्यांवर समाधान कसे मानतील? त्यांना फूलपँटच केवळ नाही तर मोबाइल लागेल, संगणक लागेल, प्रचारासाठी ट्रोल्ससारखी अविश्वसनीय साधने लागतील आणि हो, संघही केवळ गुरुदक्षिणेवर चालणार नाही. गोमांसाच्या भक्षणावर नागपुरात किंवा महाराष्ट्र व राजस्थानात बंदी घालता येते, पण ती बंगाल, केरळ, मणिपूर, नागालँड आणि काश्मिरात कशी घालणार? अशा वेळी पुस्तक बदलायचे की माणसांना पुस्तकांनी तयार केलेल्या चौकटीत कोंबायचे? पण काही का असेना भागवतांनी ही कोंडी फोडली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. आता त्यांच्यापुढचा नवा प्रश्न मात्र मोठा आहे. प्रत्येक संघटनेत काही नाफेरवादी कर्मठ असतात. अशांची संख्या संघात फार मोठी आहे. भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. आव्हाने पुढेही आहेत. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. बाबरीवाल्यांना जोडायचे आहे. त्यासाठी हिंदुत्वातील कडव्यांना आवरायचेही आहे. काही का असेना भागवतांनी सुरुवात केली आहे. त्यांना या क्षेत्रात यश लाभावे यासाठी एवढेच सांगायचे, ‘मोहनजी, आता क्षिप्र चल’.>भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत