शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

एवढेच सांगायचे...मोहनजी, आता क्षिप्र चल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:54 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो. मात्र पुस्तके आणि त्यांनी निर्माण केलेल्या समजुती तशाच राहतात. संघानेही कालानुरूप बदलले पाहिजे व तो बदलत आहे ही सरसंघचालक मोहन भागवत यांची कोलांटउडी नाही. काळाने त्यांच्या व संघातील नव्या विचारांच्या लोकांच्या मनात घडवून आणलेली ही एक चांगल्या व स्वागतार्ह बदलाची चिन्हे आहेत. सारे बदलले तरी आम्ही तसेच आहोत ही कर्मठ भूमिका फार लवकर कालबाह्य होते. १९२५ मध्ये स्थापन झालेला व गेली १२० वर्षे तसाच, गणवेशापासून विचारांपर्यंत राहिलेला संघ हा त्यातल्याच नव्यांना कालविसंगत वाटू लागला होता. त्यातून सावरकरांच्या इच्छेविरुद्ध जाऊन संघाने जनसंघाची स्थापना केली. त्याला लोकशाहीच्या गरजेनुसार समाजाभिमुख होणे भाग पडले. परिणामी संघाच्या तुलनेत त्याला मिळणारा लोकमताचा पाठिंबा मोठा होता व तो क्रमाने वाढत गेला. हा पाठिंबाच संघाच्या बंद विचारांसमोरचे आव्हान ठरला. जनसंघात वा भाजपात संघाबाहेरून आलेली माणसे संघविचार वा संघगुरूंना कशी मानतील? किंवा त्यांना आपले परात्पर गुरू तरी कसे समजतील? मग त्यांना सांभाळायला (कारण खरी सांभाळायची असते ती सत्ता, संघटना नव्हे) आपली कुंपणे जरा किलकिली करणे गरजेचे होते. इतर संघटनांना ही गरज भासली नाही. गांधीजी कालानुरूप बदलत राहिले. १९२० पूर्वी चातुर्वर्ण्य म्हणणारे गांधी नंतरच्या काळात फक्त आंतरजातीय लग्नांनाच परवानगी देणारे व त्याला हजर राहणारे बनले. ईश्वर आणि अल्ला यांचा एकत्र उच्चार करू लागले. ज्या संघटना त्यांच्या पोथ्यांना घट्ट धरून राहिल्या त्या साऱ्यांच्याच समोर काळाचे संकट उभे राहिले. ते मार्क्सच्या पोथीवाद्यांना जरा उशिरा समजले. समाजवाद्यांना ते समजले तेव्हा ते जवळपास संपलेही होते. आपले राजकीय आद्यग्रंथच नव्हे तर आपल्या धार्मिक पोथ्याही दिवसेंदिवस कालविसंगत होत असतात. त्या स्वत:वर लादून ठेवण्याचे वर्तमानाचे काम नव्हे. अखेर माणूस हाच तेवढा खरा व तोच तेवढा सनातन असतो. तो काळानुरूप बदलतो. मार्क्सचे कॅपिटल मात्र बदलत नाही. हिटलरचे ‘माइन काम्फ’ किंवा माओचे ‘रेड बुक’ही तसेच राहते. आपल्याकडे यात फार वेगाने बदल झाले आहेत. शंकराचार्यांना ज्ञानेश्वरांनी खोडून काढले आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ टिळकांनी चुकीचा ठरवला. या स्थितीत ‘बंच आॅफ थॉट्स’ हे गोळवलकरांचे सांगणे असले तरी आणि ते मूळ स्वरूपात उपलब्ध असले तरी त्याचे आजवर अनुयायी राहिलेले लोक अर्ध्या चड्ड्यांवर समाधान कसे मानतील? त्यांना फूलपँटच केवळ नाही तर मोबाइल लागेल, संगणक लागेल, प्रचारासाठी ट्रोल्ससारखी अविश्वसनीय साधने लागतील आणि हो, संघही केवळ गुरुदक्षिणेवर चालणार नाही. गोमांसाच्या भक्षणावर नागपुरात किंवा महाराष्ट्र व राजस्थानात बंदी घालता येते, पण ती बंगाल, केरळ, मणिपूर, नागालँड आणि काश्मिरात कशी घालणार? अशा वेळी पुस्तक बदलायचे की माणसांना पुस्तकांनी तयार केलेल्या चौकटीत कोंबायचे? पण काही का असेना भागवतांनी ही कोंडी फोडली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. आता त्यांच्यापुढचा नवा प्रश्न मात्र मोठा आहे. प्रत्येक संघटनेत काही नाफेरवादी कर्मठ असतात. अशांची संख्या संघात फार मोठी आहे. भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. आव्हाने पुढेही आहेत. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. बाबरीवाल्यांना जोडायचे आहे. त्यासाठी हिंदुत्वातील कडव्यांना आवरायचेही आहे. काही का असेना भागवतांनी सुरुवात केली आहे. त्यांना या क्षेत्रात यश लाभावे यासाठी एवढेच सांगायचे, ‘मोहनजी, आता क्षिप्र चल’.>भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत