शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

एवढेच सांगायचे...मोहनजी, आता क्षिप्र चल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:54 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो. मात्र पुस्तके आणि त्यांनी निर्माण केलेल्या समजुती तशाच राहतात. संघानेही कालानुरूप बदलले पाहिजे व तो बदलत आहे ही सरसंघचालक मोहन भागवत यांची कोलांटउडी नाही. काळाने त्यांच्या व संघातील नव्या विचारांच्या लोकांच्या मनात घडवून आणलेली ही एक चांगल्या व स्वागतार्ह बदलाची चिन्हे आहेत. सारे बदलले तरी आम्ही तसेच आहोत ही कर्मठ भूमिका फार लवकर कालबाह्य होते. १९२५ मध्ये स्थापन झालेला व गेली १२० वर्षे तसाच, गणवेशापासून विचारांपर्यंत राहिलेला संघ हा त्यातल्याच नव्यांना कालविसंगत वाटू लागला होता. त्यातून सावरकरांच्या इच्छेविरुद्ध जाऊन संघाने जनसंघाची स्थापना केली. त्याला लोकशाहीच्या गरजेनुसार समाजाभिमुख होणे भाग पडले. परिणामी संघाच्या तुलनेत त्याला मिळणारा लोकमताचा पाठिंबा मोठा होता व तो क्रमाने वाढत गेला. हा पाठिंबाच संघाच्या बंद विचारांसमोरचे आव्हान ठरला. जनसंघात वा भाजपात संघाबाहेरून आलेली माणसे संघविचार वा संघगुरूंना कशी मानतील? किंवा त्यांना आपले परात्पर गुरू तरी कसे समजतील? मग त्यांना सांभाळायला (कारण खरी सांभाळायची असते ती सत्ता, संघटना नव्हे) आपली कुंपणे जरा किलकिली करणे गरजेचे होते. इतर संघटनांना ही गरज भासली नाही. गांधीजी कालानुरूप बदलत राहिले. १९२० पूर्वी चातुर्वर्ण्य म्हणणारे गांधी नंतरच्या काळात फक्त आंतरजातीय लग्नांनाच परवानगी देणारे व त्याला हजर राहणारे बनले. ईश्वर आणि अल्ला यांचा एकत्र उच्चार करू लागले. ज्या संघटना त्यांच्या पोथ्यांना घट्ट धरून राहिल्या त्या साऱ्यांच्याच समोर काळाचे संकट उभे राहिले. ते मार्क्सच्या पोथीवाद्यांना जरा उशिरा समजले. समाजवाद्यांना ते समजले तेव्हा ते जवळपास संपलेही होते. आपले राजकीय आद्यग्रंथच नव्हे तर आपल्या धार्मिक पोथ्याही दिवसेंदिवस कालविसंगत होत असतात. त्या स्वत:वर लादून ठेवण्याचे वर्तमानाचे काम नव्हे. अखेर माणूस हाच तेवढा खरा व तोच तेवढा सनातन असतो. तो काळानुरूप बदलतो. मार्क्सचे कॅपिटल मात्र बदलत नाही. हिटलरचे ‘माइन काम्फ’ किंवा माओचे ‘रेड बुक’ही तसेच राहते. आपल्याकडे यात फार वेगाने बदल झाले आहेत. शंकराचार्यांना ज्ञानेश्वरांनी खोडून काढले आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ टिळकांनी चुकीचा ठरवला. या स्थितीत ‘बंच आॅफ थॉट्स’ हे गोळवलकरांचे सांगणे असले तरी आणि ते मूळ स्वरूपात उपलब्ध असले तरी त्याचे आजवर अनुयायी राहिलेले लोक अर्ध्या चड्ड्यांवर समाधान कसे मानतील? त्यांना फूलपँटच केवळ नाही तर मोबाइल लागेल, संगणक लागेल, प्रचारासाठी ट्रोल्ससारखी अविश्वसनीय साधने लागतील आणि हो, संघही केवळ गुरुदक्षिणेवर चालणार नाही. गोमांसाच्या भक्षणावर नागपुरात किंवा महाराष्ट्र व राजस्थानात बंदी घालता येते, पण ती बंगाल, केरळ, मणिपूर, नागालँड आणि काश्मिरात कशी घालणार? अशा वेळी पुस्तक बदलायचे की माणसांना पुस्तकांनी तयार केलेल्या चौकटीत कोंबायचे? पण काही का असेना भागवतांनी ही कोंडी फोडली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. आता त्यांच्यापुढचा नवा प्रश्न मात्र मोठा आहे. प्रत्येक संघटनेत काही नाफेरवादी कर्मठ असतात. अशांची संख्या संघात फार मोठी आहे. भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. आव्हाने पुढेही आहेत. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. बाबरीवाल्यांना जोडायचे आहे. त्यासाठी हिंदुत्वातील कडव्यांना आवरायचेही आहे. काही का असेना भागवतांनी सुरुवात केली आहे. त्यांना या क्षेत्रात यश लाभावे यासाठी एवढेच सांगायचे, ‘मोहनजी, आता क्षिप्र चल’.>भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत