शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धन्यवाद गडकरीजी! २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:39 IST

राष्ट्रीय महामार्गांना २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत आणि जिल्हा आणि गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट कायम खड्ड्यात शोधावी लागेल.

- धर्मराज हल्लाळे

रस्ता तयार झाला अन् एक पावसाळा उलटला की खड्डे दिसतात. हे चित्र पाहायची सवय झाली आहे. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही देऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. एकंदर त्यांच्या कामाची धडाडी आणि दर्जेदार कामाचा आग्रह कौतुकास्पद आहे. इतकेच नव्हे, मराठवाड्यासह राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे ज्या गतीने होत आहेत, ते पाहता विरोधी बाकेही अभिनंदनाने वाजविली जात आहेत. मात्र गरज आहे ती महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा हा राज्य रस्त्यांबाबत कसा आणता येईल, यावर विचार करण्याची. 

मराठवाड्यात ४० राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. सुमारे १५ हजार कोटींची ही कामे आहेत. विशेष म्हणजे नव्याने आणखी साडेसात हजार कोटींच्या कामांना नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या संदर्भाने झालेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष होत असलेली कामे समाधान देणारी आहेत. काही ठिकाणी अडचणी आहेत. मावेजाचे प्रश्न आहेत, परंतु बहुतांश मार्गांचे काम गतीने सुरू आहे. निम्मेअधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रस्तावित घोषणाही प्रत्यक्षात उतरतील, याबद्दल तूर्त शंका नाही. एकीकडे राष्ट्रीय महामार्गांचे समाधान देणारे चित्र असले, तरी राज्य रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी डिसेंबरअखेर खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे जाहीर केले. एक नव्हे, दोन डिसेंबर उलटले तरी खड्ड्यांची स्थिती जैसे थे आहे. साधारणपणे राज्यात ९० हजार किलोमीटरचे राज्य रस्ते सांगितले जातात. त्यातील सुमारे २५ हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त आहेत तर २५ हजार किलोमीटर खड्ड्यांचा मार्ग आहे. त्यातही प्रादेशिक तुलना केली तर मराठवाड्यातील जिल्हा रस्त्यांची स्थिती अधिक बिकट आहे. 

एकीकडे नितीन गडकरी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राष्ट्रीय महामार्गांची प्रगती सांगत होते तर त्याच जिल्ह्यात उदगीरला जोडणारा राज्य रस्ता चार वर्षांपासून खड्ड्यांमध्येच आहे. नक्कीच हा विषय नितीन गडकरी यांच्या अख्यत्यारित येत नाही अन् आला असता तर हा प्रश्न केव्हाच सुटला असता. जी अवस्था राज्य रस्त्यांची आहे, तीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची आहे. नगरपालिका, महापालिका या संस्थांचे अंदाजपत्रक कायम बिघडलेले असते. पाणी आणि पथदिव्यांचे वीज बिले भरणेही पालिकांना अवघड जाते. रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा तर दूरच. राज्य सरकारकडून अनुदान मिळवायचे आणि त्यावरच थातूरमातूर कामे करायची, हा अजेंडा असतो. अशा विचित्र स्थितीत काही राज्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे गेले ते एका अर्थाने बरे झाले. अनेक जिल्हा शहरांचे वळण रस्तेही राष्ट्रीय महामार्गाच्या अख्त्यारित होत आहेत. त्यामुळे महानगरांकडे जायचे असेल तर विनाखड्ड्याचा सुकर मार्ग, जिल्हा-शहरांच्या भोवताली रिंगण फेरी मारायची असेल तर गुळगुळीत रस्ता, मात्र एका जिल्ह्याहून दुसऱ्या जिल्ह्याला जायचे असेल, तालुक्याला जायचे असेल, शहरातच फिरायचे असेल तर खड्ड्यांचा मार्ग स्वागत करतो. 

केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडे मोठा निधी आहे. स्वाभाविकच राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना आर्थिक अडचण नाही. भविष्यात या राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या जिल्हा रस्त्यांनाही याच धर्तीवर निधीची उपलब्धता झाली तर विकासाचा महामार्ग खुला होईल. अन्यथा राष्ट्रीय महामार्गांना २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत आणि जिल्हा आणि गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट कायम खड्ड्यात शोधावी लागेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गPotholeखड्डे