शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

मंदीचे दहा प्रकार आणि भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 05:45 IST

ब्रेक्झिटच्या धसमुसळ्या परिस्थितीमुळे ब्रिटनमध्ये सर्व प्रकारची खरेदी मंदावली आहे

डॉ. गिरीश जाखोटिया

मंदी आणि मंदीसदृश परिस्थिती यातील सीमारेषा बऱ्याचदा अस्पष्ट असते जी भल्याभल्यांना कळत नाही. मग रोगनिदान नीट न होता उपायांचा भडिमार केला जातो, ज्याने रोग बरा न होता बिकट होत जातो. यासाठी मंदीचे दहा प्रकार संक्षिप्तपणे बघणे आवश्यक आहे. हे दहा प्रकार भारताच्या सद्य:स्थितीच्या संदर्भात तपासणेही जरुरीचे ठरते. अर्थकारणीय चक्राच्या नैसर्गिक परिणामामुळे उद्भवणारी ‘साधारण अल्पजीवी मंदी’ही ते चक्र सुधारले की आपोआपच नाहीशी होते. दीर्घकालीन मंदी मात्र चिकट रोगासारखी असते. ठोस रचनात्मक उपायांशिवाय ती जात नाही. मांद्य आलेल्या जपानी अर्थव्यवस्थेचा हा रोग तब्बल पंचवीस वर्षे चालू आहे.

मंदीचा पहिला प्रकार हा सर्वसामान्यांची क्र यशक्ती खूप कमी झाल्याने उद्भवतो. अमेरिका आजही या तडाख्यातून बाहेर आलेली नाही. मुळात बहुतेक विकसनशील देशांतील सर्वसाधारण लोक उत्तम व्यावसायिक शिक्षण न मिळाल्याने उत्तम (वा मध्यम) वेतन देणारे कौशल्य मिळवू नाही शकले. भरीसभर म्हणून बरेच पर्यायी तरुण कर्मचारी कमी वेतनात उपलब्ध असल्याने सर्वसाधारण वेतनवृद्धी प्रमाणशील झालीच नाही. बहुसंख्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना योग्य भाव आणि वित्तीय आधार न मिळाल्याने ते ‘क्र यशक्ती’च्या दुष्टचक्र ात अडकले. यामुळे या साºयांची क्र यशक्ती कमी होत गेली, एकूण मागणी कमी होत गेली नि तिचा सर्वदूर परिणाम उद्योग व सेवाक्षेत्रावर झाला. यालट दुसºया प्रकारात इंडोनेशिया व चीनमध्ये उत्पादकीय (क्षमता) व्यवस्था वारेमाप वाढल्याने ‘पुरवठा’ प्रचंड वाढला, पण मागणी मर्यादित राहिली. यास्तव अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हळूहळू घटत गेला.

ब्रेक्झिटच्या धसमुसळ्या परिस्थितीमुळे ब्रिटनमध्ये सर्व प्रकारची खरेदी मंदावली आहे. हा मंदी माजण्याचा तिसरा प्रकार. चलनवलनातला कृत्रिम अवरोध हा मंदीचा मानवनिर्मित प्रकार गरिबांच्या मुळावर उठतो. राजकीय बेशिस्त व सरकारी धोरणातील घिसाडघाई, बँकांचा लघुउद्योजकांना मंदगतीने व अपुरा होणारा कर्जपुरवठा, रोकडता कमी होणे, संसाधनांच्या उपलब्धतेतील गंभीर कुचराई यामुळे स्थानिक अर्थकारण थंडावते. यात भर पडते ती बक्कळ पगार खाणाºया पण संपूर्ण जबाबदारी न घेणाºया नोकरशहांची! हा मंदीचा चौथा प्रकार.पाचवा प्रकार हा खूप गंभीर व चिकट असा ‘आंतरिक असंतुलना’चा. शेती, सेवाक्षेत्र व उत्पादन क्षेत्र यातील चुकीची प्राधान्ये व चुकीच्या गुंतवणुकीमुळे जे असंतुलन निर्माण होते ते अर्थव्यवस्थेच्या गाड्याला गाळात रुतवते. उदाहरणार्थ, शेतीची उत्पादकता व शेतकºयांचे उत्पन्न न वाढल्यास ग्रामीण व तालुक्यातील अर्थव्यवस्था निस्तेजच राहणार. ती फक्त शहरी मागणीने सुधारता येणार नाहीच. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कररचनेबद्दलचा दृष्टिकोन हा व्यूहात्मक नसेल तर निर्माण झालेल्या असंतुलनामुळे नवी गुंतवणूक व नवे व्यापार होत नाहीत. यामुळेही अर्थव्यवस्थेत शैथिल्य येते जे मंदीकडे नेते. मंदीचा सहावा प्रकार हा देशाबाहेरील कारणांमुळे उद्भवतो. जर्मनी व चीनने निर्यातीवर प्रचंड भर दिला नि आज जगभरातील मागणी रोडावल्यामुळे या अर्थव्यवस्थाही मंदीच्या आरंभीच्या तडाख्यात सापडल्या.सातव्या मंदीच्या प्रकारास बºयाच राष्ट्रीय संसाधनांचं नियंत्रण काही मोजक्या उद्योगसमूहांच्या हाती जाणं व त्यात राजकारण्यांनी सामील होणं कारणीभूत असतं. व्हेनेझुएला, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान इ. अर्थव्यवस्था या मंदीने ग्रस्त आहेत. आठवा मंदीचा प्रकार हा सैद्धांतिक गोंधळामुळे बाळसं धरतो. आजचा पोलंड, काही अंशी फ्रान्स, भारतातील पश्चिम बंगालची पारंपरिक अर्थव्यवस्था या समाजवाद-साम्यवादाच्या धबडग्यात अडकल्याने उद्योजकीय अनुत्साह वाढत गेला, खासगी गुंतवणूक कमी झाली आणि आर्थिक वेग मंदावला.

नवव्या प्रकारात समांतर अर्थव्यवस्था चालविणारे समाजकंटक मुद्दामहून अर्थकारणात अवरोध निर्माण करतात. यांना जेव्हा नवे सरकारी नियम, पारदर्शकता व शिस्त नको असते तेव्हा हे लोक आपलं काळं-पांढरं भांडवल व करबुडवी खरेदी-विक्री काही काळासाठी वेगाने रोखतात (जिची स्टेरॉइडसारखी सवय अर्थव्यवस्थेला आधीच लागलेली असते) नि सरकारी व्यवस्थेलाच आव्हान देऊ लागतात. यांच्या समांतर अर्थव्यवस्थेला रोखण्याच्या व बदलाच्या वेदनाकारक प्रक्रियेमुळे आणि हे समाजकंटक लोक सापडेपर्यंत काही काळासाठी मंदी तयार होते जी सोसणे गरिबांना भाग पडते. मंदीचा दहावा प्रकार हा धनदांडग्यांच्या अपरिमित भ्रष्टाचारामुळे उद्भवतो. कर्करोगाप्रमाणे तो सामान्यांची क्रयशक्ती हळूहळू नष्ट करतो. ही सुरुवातीची मंदी नंतर प्रचंड अशा कृत्रिम महागाईला आमंत्रण देते.मंदीची किमान निम्मी संभाव्य कारणे भारतीय अर्थव्यवस्थेला आस्तेकदम लागू होऊ लागली आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. आज आपली अर्थव्यवस्था ही विविध कारणांस्तव ‘विस्कळीत’ झाली आहे हे आम्हाला प्रांजळपणे मान्य करावे लागेल. पाच वर्षांच्या सत्तेच्या दुसºया कालखंडात या सरकारकडून रयतेच्या ‘आर्थिक अपेक्षा’ साधार आहेत, ज्या पुºया नाही झाल्या तर चिकट मंदीच्या तडाख्यात आम्ही सापडू. जागतिक अर्थकारण व राजकारण गोंधळाचे असताना आमचं घरातलं अर्थकारण विस्कळीत होणं निश्चितच परवडणार नाही !( लेखक व्यूहात्मक व उद्योजकीय व्यवस्थापन आणि आर्थिक सल्लागार आहेत )

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbusinessव्यवसाय