शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 05:31 IST

आंबेडकरी विचारांची कास धरून उधाणल्या वादळवाऱ्यासारखं जगलेले कवी, शाहीर वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी १५ ऑगस्टपासून सुरू होते आहे, त्यानिमित्ताने !

जखडबंद पायातील साखळदंडतटातट तुटले तू ठोकताच दंड..lझाले गुलाम मोकळे.. भीमा तुझ्या जन्मामुळे...हे अल्पाक्षरी काव्यगान आहे महाकवी वामनदादा कर्डक यांचं.‍ अतिशय अल्पाक्षरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अमोघ कर्तृत्व त्यांनी या  शब्दावळीत थाटलेलं आहे. ‘दादा’ या आदरार्थी उपाधीने ते सर्वदूर मशहूर आहेत.दादांचा जीवनकाळ १९२२ ते २००४ असा ८२ वर्षांचा. नाशिक जिह्यातील देशवंडी हे त्यांचं गाव. तबाजी कर्डक हे त्यांचे वडील व आई सईबाई. दादा तीन वर्षांचे असतानाच १९२६ साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं. अक्षर गिरविण्याच्या वयातच त्यांना गुरंढोरं  चारावी लागली. दादांचा मोठा भाऊ सदाशिव हा मुंबईतील कापड गिरणीत मजूर होता. १९४० च्या दरम्यान त्यांने उमेदीतील वामन, बहीण सावित्री व आईला मुंबईत आणलं. पोटापाण्यासाठी वामनदादांना सायन येथील कोळशाच्या वखारीत काम करावं लागलं. हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. बॉम्ब पडण्याच्या भीतीने लोक जीव वाचविण्यासाठी घरात,‍ परिसरात चर खोदत. ते खड्डे खोदण्याचं  कामही दादांनी केलं. पुढे मिळेल तिथे मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी हातभार लावला. समकाळात ते आंबेडकरी चळवळीच्या ‘समता सैनिक दला’च्या लेजीम व लाठीकाठी पथकात  वस्ताद म्हणून नावारूपास आले. आंबेडकरी चळवळीच्या ऊर्जाशील माहोलमुळे ते आंबेडकरी चळवळीशी समरस झाले. पुढे त्यांनी गरजेतून कापड गिरणीसह विविध कारखान्यांमध्ये चाकरी केली; परंतु आंबेडकरमय झालेले वामनदादा नोकरीत फारसे रमले नाहीत.आपण निरक्षर आहोत याची सल वामनदादांना सतत बोचत असे. म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणेने मूळाक्षरे तोंडपाठ करीत लिहिण्याचा सराव केला.  काही दिवसांतच ते जिद्दीने साक्षर झाले. कार्यकर्तेपण, चिंतनशील स्वभाव आणि कलासक्त वृत्तीमुळे वाचन, गीतलेखन, चित्रपट, नाटकं, आंबेडकरी जलसे पाहणं हे त्यांचे छंद मुंबापुरीत अधिक वाढीस लागले. त्यांनी काही नाटकं, चित्रपटकथा व मराठी सिनेमांसाठी गीतं लिहिली. चित्रपट निर्माते दत्ता माने यांच्या ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटासाठी दादांनी ‘सांगा या वेडीला.. माझ्या गुलछडीला...हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला’ आणि ‘पंचाआरती’ चित्रपटासाठी, ‘चल गं हरणे तुरू तुरू... चिमण्या उडती भुरू भुरू..’ ही गीतं लिहिली. ‘यो यो यो पाव्हणं..सखूचं मेव्हणं..’ अशी इष्कबाजीची नजाकत असलेली गीतंही त्यांनी लिहिली.  परंतु प्रबोधनकारी गीतकार व शाहीर म्हणूनच दादा समष्टीत नावारूपाला आले.माणसा इथे मी, तुझे गीत गावेअसे गीत गावे, तुझे हित व्हावे..‍अशा  साध्या, सुलभ रचनांमुळे दादांची  गाणी लोकगीतं झाली.  बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान दादांच्या हाच गीतांमधील मुख्य आशय असल्याचं दिसतं. बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दादांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यांची ही प्रसिध्द रचनाच पाहा :सांगा आम्हाला बिर्ला बाटा,  टाटा कुठाय हो..सांगा धनाचा साठा,  आमचा वाटा कुठाय हो..? पूर्वापार स्थापित असलेली आर्थिक विषमता, भांडवलशाहीतून सामान्यांचं होणारं आर्थिक शोषण दादांनी सहजतेनं, परंतु थेटपणे वरील रचनेत मांडलं आहे.  बुद्धाचं अहिंसक विचारदर्शन, छ. शिवराय व शाहूंचं सामाजिक न्यायतत्त्व, म. फुले यांचं सनातन्यांविरुद्धचं सूक्ष्म सत्यशोधन आणि बाबासाहेबांचं समतामुलक तत्त्वज्ञान दादांनी परिश्रमपूर्वक आत्मसात केलेलं होतं. सहज-सुलभ गावरान भाषा, लोककथेतील पारंपरिक संगीत, आत्मभान जागृत करणाऱ्या शब्दकळा आणि दादांची खड्या, परंतु मधुर आवाजातील गायकी; यामुळे त्यांचं गाणं लोकांच्या ओठांवर आपसूकच आलं आणि परिवर्तनाच्या चळवळीचं ऊर्जाबळ ठरलं.जवळपास साठ वर्षे दादांच्या प्रतिभाशाली कवित्वाचा आणि गायकीचा झंझावात महाराष्ट्रात वेगवान राहिला.  निखळ मनुष्यतेचा उद्घोष करणाऱ्या क्रांतिकारी गीतांचा दुर्लभ आविष्कार असलेल्या दादांचं वादळवाऱ्यासारखं व्यक्तित्त्व म्हणूनच अजरामर राहिलेलं आहे.प्रा. गंगाधर आहिरे, नाशिक