शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 05:31 IST

आंबेडकरी विचारांची कास धरून उधाणल्या वादळवाऱ्यासारखं जगलेले कवी, शाहीर वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी १५ ऑगस्टपासून सुरू होते आहे, त्यानिमित्ताने !

जखडबंद पायातील साखळदंडतटातट तुटले तू ठोकताच दंड..lझाले गुलाम मोकळे.. भीमा तुझ्या जन्मामुळे...हे अल्पाक्षरी काव्यगान आहे महाकवी वामनदादा कर्डक यांचं.‍ अतिशय अल्पाक्षरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अमोघ कर्तृत्व त्यांनी या  शब्दावळीत थाटलेलं आहे. ‘दादा’ या आदरार्थी उपाधीने ते सर्वदूर मशहूर आहेत.दादांचा जीवनकाळ १९२२ ते २००४ असा ८२ वर्षांचा. नाशिक जिह्यातील देशवंडी हे त्यांचं गाव. तबाजी कर्डक हे त्यांचे वडील व आई सईबाई. दादा तीन वर्षांचे असतानाच १९२६ साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं. अक्षर गिरविण्याच्या वयातच त्यांना गुरंढोरं  चारावी लागली. दादांचा मोठा भाऊ सदाशिव हा मुंबईतील कापड गिरणीत मजूर होता. १९४० च्या दरम्यान त्यांने उमेदीतील वामन, बहीण सावित्री व आईला मुंबईत आणलं. पोटापाण्यासाठी वामनदादांना सायन येथील कोळशाच्या वखारीत काम करावं लागलं. हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. बॉम्ब पडण्याच्या भीतीने लोक जीव वाचविण्यासाठी घरात,‍ परिसरात चर खोदत. ते खड्डे खोदण्याचं  कामही दादांनी केलं. पुढे मिळेल तिथे मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी हातभार लावला. समकाळात ते आंबेडकरी चळवळीच्या ‘समता सैनिक दला’च्या लेजीम व लाठीकाठी पथकात  वस्ताद म्हणून नावारूपास आले. आंबेडकरी चळवळीच्या ऊर्जाशील माहोलमुळे ते आंबेडकरी चळवळीशी समरस झाले. पुढे त्यांनी गरजेतून कापड गिरणीसह विविध कारखान्यांमध्ये चाकरी केली; परंतु आंबेडकरमय झालेले वामनदादा नोकरीत फारसे रमले नाहीत.आपण निरक्षर आहोत याची सल वामनदादांना सतत बोचत असे. म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणेने मूळाक्षरे तोंडपाठ करीत लिहिण्याचा सराव केला.  काही दिवसांतच ते जिद्दीने साक्षर झाले. कार्यकर्तेपण, चिंतनशील स्वभाव आणि कलासक्त वृत्तीमुळे वाचन, गीतलेखन, चित्रपट, नाटकं, आंबेडकरी जलसे पाहणं हे त्यांचे छंद मुंबापुरीत अधिक वाढीस लागले. त्यांनी काही नाटकं, चित्रपटकथा व मराठी सिनेमांसाठी गीतं लिहिली. चित्रपट निर्माते दत्ता माने यांच्या ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटासाठी दादांनी ‘सांगा या वेडीला.. माझ्या गुलछडीला...हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला’ आणि ‘पंचाआरती’ चित्रपटासाठी, ‘चल गं हरणे तुरू तुरू... चिमण्या उडती भुरू भुरू..’ ही गीतं लिहिली. ‘यो यो यो पाव्हणं..सखूचं मेव्हणं..’ अशी इष्कबाजीची नजाकत असलेली गीतंही त्यांनी लिहिली.  परंतु प्रबोधनकारी गीतकार व शाहीर म्हणूनच दादा समष्टीत नावारूपाला आले.माणसा इथे मी, तुझे गीत गावेअसे गीत गावे, तुझे हित व्हावे..‍अशा  साध्या, सुलभ रचनांमुळे दादांची  गाणी लोकगीतं झाली.  बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान दादांच्या हाच गीतांमधील मुख्य आशय असल्याचं दिसतं. बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दादांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यांची ही प्रसिध्द रचनाच पाहा :सांगा आम्हाला बिर्ला बाटा,  टाटा कुठाय हो..सांगा धनाचा साठा,  आमचा वाटा कुठाय हो..? पूर्वापार स्थापित असलेली आर्थिक विषमता, भांडवलशाहीतून सामान्यांचं होणारं आर्थिक शोषण दादांनी सहजतेनं, परंतु थेटपणे वरील रचनेत मांडलं आहे.  बुद्धाचं अहिंसक विचारदर्शन, छ. शिवराय व शाहूंचं सामाजिक न्यायतत्त्व, म. फुले यांचं सनातन्यांविरुद्धचं सूक्ष्म सत्यशोधन आणि बाबासाहेबांचं समतामुलक तत्त्वज्ञान दादांनी परिश्रमपूर्वक आत्मसात केलेलं होतं. सहज-सुलभ गावरान भाषा, लोककथेतील पारंपरिक संगीत, आत्मभान जागृत करणाऱ्या शब्दकळा आणि दादांची खड्या, परंतु मधुर आवाजातील गायकी; यामुळे त्यांचं गाणं लोकांच्या ओठांवर आपसूकच आलं आणि परिवर्तनाच्या चळवळीचं ऊर्जाबळ ठरलं.जवळपास साठ वर्षे दादांच्या प्रतिभाशाली कवित्वाचा आणि गायकीचा झंझावात महाराष्ट्रात वेगवान राहिला.  निखळ मनुष्यतेचा उद्घोष करणाऱ्या क्रांतिकारी गीतांचा दुर्लभ आविष्कार असलेल्या दादांचं वादळवाऱ्यासारखं व्यक्तित्त्व म्हणूनच अजरामर राहिलेलं आहे.प्रा. गंगाधर आहिरे, नाशिक