शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मालमत्तांची करमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:55 IST

निवडणुकांच्या काळात राजकीय घोषणांचे पीक येते. मात्र अशा घोषणा करताना त्या पूर्ण कधी व कशा करणार? त्यामुळे आर्थिक व सामाजिक परिणाम काय होईल, याबाबत विचार केला जात नाही.

निवडणुकांच्या काळात राजकीय घोषणांचे पीक येते. मात्र अशा घोषणा करताना त्या पूर्ण कधी व कशा करणार? त्यामुळे आर्थिक व सामाजिक परिणाम काय होईल, याबाबत विचार केला जात नाही. कालांतराने अचानक आठवलेल्या या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी धावपळ सुरू होते. वचननाम्यातून जाहीर केलेल्या पाचशे चौ. फुटांच्या घरांना करमाफी व सातशे चौ. फुटांच्या घरांना ६0 टक्के सवलत या घोषणेच्या सवलतीचा निम्मा काळ लोटल्यानंतर आता त्याचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय चढाओढ रंगात आली आहे. मुंबईत १ एप्रिल २0१0 पासून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करण्यात आली. मात्र २0१२ मध्ये मंजूर झालेल्या या मालमत्ता करप्रणालीतून पाचशे चौरस फुटांच्या घरांना वगळण्यात आले. ही सूट २0१0 ते २0१५ या पाच वर्षांसाठी असल्याने सुमारे १४ लाख मालमत्ताधारकांना याचा फायदा मिळाला होता. तसेच त्या काळात वसूल केलेला मालमत्ता कराचा परतावा सूट मिळालेल्या करदात्यांना देण्यात आला होता. ही सवलत आणखी पाच वर्षे सुरू ठेवण्याची मागणी पुन्हा होऊ लागली. फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या वचननाम्यात या मागणीला स्थान मिळाले. त्यानुसार पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याची ठरावाची सूचना मार्च २0१७ मध्ये पालिका महासभेत मंजूर झाली. हीच सूचना काही सुधारणांसह जुलै २0१७ मध्ये पालिका महासभेत पुन्हा मंजूर करून महापालिका प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आली. मात्र त्यानंतरही या सूचनेबाबत आयुक्तांचा अभिप्राय किंवा करमाफीचा प्रस्ताव आणण्याची कोणतीच हालचाल प्रशासकीय पातळीवर झाली नाही. याचा फायदा उठवत भाजपाने थेट सातशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुकूलता मिळवली आहे. भाजपाने अशी कुरघोडी केल्यामुळे शिवसेनेत धावपळ उडाली आहे. त्यामुळे यापूर्वीच मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या सूचनेनुसार पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम प्रशासनाने तयार करून राज्य सरकारकडे पाठवावा यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी ७५0 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची ठरावाची सूचना मांडून शिवसेनेला मात दिली आहे. मालमत्ता करातून वार्षिक साडेतीनशे कोटींचे उत्पन्न जमा होत असते. मात्र सातशे चौ. फुटांपर्यंतच्या घरांना कर माफ केल्यास यात शंभर कोटी रुपयांची घट होणार आहे. त्याचबरोबर २0१५ ते २0२0 या पाच वर्षांच्या कालावधीत ही सवलत देण्याचे ठरल्यास अडीच ते तीन वर्षे याआधीच लोटली असल्याने ही करमाफीचा कालावधीही निश्चित करावा लागेल.