शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टॅम्प्लीऽऽज ! आ म्हा ला  बा स

By सचिन जवळकोटे | Updated: March 18, 2019 10:58 IST

माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ...

माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ‘मी कधी म्हणालो होतो?’ असं विचारू  लागले. ‘संजयमामां’नी तर ‘कमळ’वाल्यांनाच ‘मामा’ बनविलं. ‘विजयदादा’ही ‘मला नकोऽऽ माझ्या लाडक्या लेकरालाच द्या,’ म्हणत मागे सरकू लागले. ही सारी गंमत पाहताना लहानपणीचा खेळ आठवला. खेळात ‘आम्हाला बासऽऽ’ म्हणणारी पोरं जशी ‘टॅम्प्लीऽऽऽज’ म्हणायची.. ती भाषा डोळ्यांसमोर तरळून गेली. 

पार्थ.. स्वार्थ.. परमार्थ !‘थोरले काका बारामतीकर’ नेहमी एका दगडात तीन-तीन पक्षी (की पक्ष?) साधतात, याची पुन्हा एकदा अनुभूती आली. ‘पार्थ’साठी कौटुंबिक ‘तह’ करून मावळ प्रांत नातवाला दिला. त्यासाठी एकीकडं माढ्याची लढाई तहकूब केल्याचा आव आणून दुसरीकडं पराभवाचा शिक्का मारून न घेण्याचा ‘स्वार्थ’ही साधला. नंतर जाता-जाता परत ‘सहकाºयांसाठी माढ्याची जागा मोकळी करतोय’, अशा आविर्भावात ‘परमार्थ’ही साधला. दि ग्रेट काकाऽऽ तुमच्या चाणाक्ष चाणक्यबुद्धीला तोड नाही.. लगाव बत्ती...

  • -  ‘संजयमामा’ मुंबईला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी झेडपीच्या केबिनमध्ये बसलेले. एवढ्यात मोबाईल वाजला. ‘बोला दादाऽऽ’ म्हणत ‘मामां’नी घाईघाईनं साºयांना बाहेर काढलं. कार्यकर्त्यांना प्रश्न पडला; नेमक्या कोणत्या दादांचा कॉल आला? कुणी म्हणालं, ‘बबनदादांचा आसंल.’ दुसºयानं सांगितलं, ‘नायऽऽ अजितदादांचा हाय.’ तिसºयानं शोध लावला, ‘नक्कीच चंद्रकांत दादांचा वाटतुया.’ चौथ्यानं तर कडी केली, ‘भौदा विजयदादांचाच दिसतुया.’
  • - अगाऽऽगाऽऽ एकाच वेळी किती ‘दादां’ना फिरविण्याची करामत हे ‘मामा’ करताहेत? त्यांच्या अनाकलनीय अन् अचाट कर्तृत्वाबद्दल खुद्द कार्यकर्त्यांनाच किती कल्पनांचे धुमारे फुटताहेत? असो.. मुख्य विषय राहिलाच बाजूला. फोन म्हणे फलटणमधील निंबाळकरांच्या ‘रणजितदादां’चा होता. 
  • - मुंबईत ‘वर्षा’वर खुद्द देवेंद्रपंतांनीच शब्द टाकूनही ‘नाना’चा पाढा वाचणाºया या ‘मामां’ना नेमकं हवंय तरी काय? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर त्यांना स्वत:च्या कारखान्यात पंतांच्या सत्तेचा फायदा हवाय; परंतु ‘कमळ’ नकोय. माढा-करमाळा राजकारणात ‘बबनदादां’च्या आमदारकीचा वापर हवाय; परंतु ‘घड्याळ’ नकोय. म्हणूनच गेल्या विधानसभेला मनगटात ‘घड्याळ’ बांधून ‘हाता’त ‘कमळ’ धरण्याचा प्रयत्न करताना वाजलीच नाही त्यांची ‘शिट्टी’.. तेव्हा यंदा वाजवतील की काय ‘कपबशी’... अशी विरोधकांनाही वाटू लागलीय भीती. लगाव बत्ती..

राजकीय जॉब धोक्यातव्हीआरएस म्हणजेच स्वेच्छेनं काम थांबविणं, म्हणजे जॉब बंद.. परंतु नोकरीतला हा श्फर शब्द सोलापूरच्याराजकारणात वेगळ्या अर्थानं चर्चेत आलाय. ‘शहर उत्तर’ची जबाबदारी सुशीलकुमारांनी ज्यांच्यावर सोपवलीय, ती टीम म्हणजे व्हीआरएस. आता या शब्दाचा अर्थ ‘विश्वनाथ, राजशेखर अन् सिद्धाराम’ या तीन अण्णांना विचारायच्या भानगडीत पडू नका. अगोदरच त्या गौडगावच्या महाराजांमुळं यल्लारदू डोकं किट्ट झालंय. जळी-स्थळी भगवी वस्त्रंच दिसू लागलीत. ‘लोकसभेचं जाऊ द्या होऽऽ  समाजावरचा आपला कायमस्वरूपी असलेला होल्ड कमी होतोय की काय,’ अशी भीती या महाराजांमुळं श्फर टीमला वाटू लागलीय; कारण या समाजाच्या जीवावरच यांचा राजकीय जॉब आजपर्यंत ‘जनवात्सल्य’वर चालत आलेला. 

१९६१ नंतर प्रथमच ‘नम् मनशाऽऽ’ला खासदारकीची संधी मिळत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर गुप्तपणे फिरू लागलाय. यामुळं ‘तम-तम मंदीं’चं ज्या पद्धतीनं झपाट्यानं ध्रुवीकरण होऊ लागलंय, ते ‘हात’वाल्यांसाठी निश्चितच धोक्याचं.. म्हणूनच ‘विश्वनाथ अण्णां’नी या महाराजांना ओपन चॅलेंज दिलं की, ‘तुम्हाला मदत करणाºयांची नावं सांगा, राजकारण सोडतो.’ हे ऐकून देशमुख मालकांच्या वाड्यावर म्हणे खुसपूस झाली, ‘आता सोडण्यासारखं राहिलंच काय?’ अशी खोचक प्रतिक्रियाही व्यक्त झाली. मात्र, ‘शहर उत्तरमध्ये कुणीही उभारलं तरी आमचे मालकच नेहमी निवडून येणार’, अशी दर्पोक्ती करणाºया कार्यकर्त्यांना हे माहीत नसावं की ‘काळाचा महिमा अचाट असतो. लोकशाहीत मतदारांची भूमिका अगाध असते.’ 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक