शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही भारतासाठी तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 07:23 IST

बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष केवळ त्या देशातील हिंदूंवरच नाही, तर भारतावरही आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे.

बांगलादेश सनातन जागरण मंच या संघटनेचे प्रवक्ते आणि चितगावस्थित पुंडरिक धामचे प्रमुख संत चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या अटकेमुळे, बांगलादेश पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ चटोग्राम येथे २२ नोव्हेंबरला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत कथितरीत्या बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच भगवा ध्वज लावण्यात आल्याचे कारण पुढे करून, दास यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ऑक्टोबरमध्येच करण्यात आला होता. दास यांच्याशिवाय आणखी १९ हिंदू संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधातही अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामुळे बांगलादेशातील वाढत्या इस्लामीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारताच्या सहकार्याने १९७१ मध्ये पाकिस्तानातून फुटून निघत अस्तित्वात आलेल्या बांगलादेशने सर्वधर्मसमभावाचे धोरण स्वीकारले होते; परंतु, १९८८ मध्ये सर्वधर्मसमभावाला तिलांजली देत, त्या देशाने मुस्लीम राष्ट्र म्हणून स्वत:ची ओळख कायम केली. पुढे पुन्हा एकदा धोरण म्हणून सर्वधर्मसमभावाला स्थान देण्यात आले असले तरी, पंधराव्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून इस्लामचे महत्त्व गडद करण्यात आले आहे. मूलतत्त्ववाद्यांच्या वाढत्या प्रभावामुळे बांगलादेशातील परंपरागत सामाजिक वीण विस्कटली आहे. सध्या भारतात आश्रयास आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावण्यात आल्यापासून तर मूलतत्त्ववाद्यांचा उन्माद वाढतच चालला आहे. वस्तुत: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनुस यांना बांगलादेशाच्या अंतरिम सरकारची धुरा सोपविण्यात आल्यामुळे मूलतत्त्ववाद्यांचा लगाम कसला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, एव्हाना ती पुरती फोल ठरली आहे.

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या देशात प्रामुख्याने दोन गट होते. मुक्ती समर्थक आणि मुक्ती विरोधक! मुक्ती विरोधकांचे पाकिस्तानला समर्थन होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेख मुजीबुर रहेमान सरकारने अनेक मुक्ती विरोधकांचे नागरिकत्व काढून घेतले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानची वाट धरली; परंतु, १९७७ नंतर त्यांनी हळूहळू बांगलादेशात परतणे सुरू केले आणि सरकारमधील पदेही बळकावली! त्यानंतर त्यांनी जमात-ए-इस्लामी या कट्टर विचारधारेच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवाय अनेक बांगलादेशी इस्लामी सैनिकांनी १९७० मधील अफगाण युद्धात सहभाग घेतला आणि १९९० च्या दशकात ते मायदेशी परतले तेव्हा, स्वत:सोबत इस्लामिक सत्तेचे तत्त्वज्ञानही घेऊन आले. या पृष्ठभूमीवर १९९२ नंतर बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लागला. त्या काळात सत्तेत असलेल्या बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने युद्ध गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याचे धोरण स्वीकारले. पुढे २०१३ मध्ये दिलावर हुसेन सईद या कट्टर इस्लामी नेत्याला एका लवादाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर, मदरसा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेने त्याचा जोरदार निषेध केला. त्याच संघटनेने २०१३ मध्ये १३ प्रतिगामी मुद्द्यांचा अंतर्भाव असलेली कार्यक्रमपत्रिका सरकारला सादर केली.

वर्षभरात निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याच्या पृष्ठभूमीवर, तत्कालीन अवामी लीग सरकारने त्यापुढे मान तुकवली. त्यानंतर कट्टरतावादाला अधिकच चालना मिळाली आणि अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचारांची मालिकाच सुरू झाली. अल्पसंख्याक समुदायांमध्ये हिंदू सर्वांत मोठा समुदाय असल्याने त्या समुदायालाच सर्वाधिक चटके सोसावे लागले. गत अर्धशतकात बांगलादेशातील हिंदूंची संख्या तब्बल ७५ लाखांनी घटली आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन आदिवासी ओईकोयो परिषद या संघटनेनुसार, बांगलादेशाच्या लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी १९५१ मध्ये २२ टक्के होती. ती २०११ मध्ये केवळ ८.५ टक्के एवढीच उरली होती. त्यानंतर ती आणखी घसरलीच असणार! अल्पसंख्याकांच्या विरोधात  उफाळणारा जातीय हिंसाचार, त्यामुळे भारताच्या दिशेने होणारे पलायन आणि हिंदू धर्मीयांचा कमी जननदर त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष केवळ त्या देशातील हिंदूंवरच नाही, तर भारतावरही आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे; पण, भारतासाठी ही मोठी तारेवरची कसरत आहे. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी वाहतानाच, त्या देशासोबतच्या संबंधांमध्ये कटुता न येऊ देण्याची काळजीही भारत सरकारला घ्यावी लागेल; अन्यथा परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चीन आणि पाकिस्तान टपून बसलेलेच आहेत! पश्चिम आणि उत्तरेसोबत पूर्वेलाही द्वेषभाव बाळगणारा देश भारताला परवडणार नाही!

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशHinduहिंदूPakistanपाकिस्तानchinaचीन