शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बाबरीचा त्वरित निकाल करा

By admin | Updated: April 7, 2017 23:30 IST

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्या न्यायव्यवस्थेच्या सुस्तपणाएवढाच त्यातील काही न्यायमूर्तींच्या सावधपणावर प्रकाश टाकणारा आहे.

२५ वर्षांपूर्वी बाबरी मशीद जमीनदोस्त करणारे भाजपाचे पुढारी आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन आलेले तथाकथित कारसेवक यांच्याविरुद्ध आजवर दोन वेगळ्या न्यायालयांत सुरू असलेले फौजदारी खटले एकत्र आणून त्यांची एकाच न्यायालयात सुनावणी करण्याचा व त्या देशविरोधी अपराधाचा निकाल येत्या दोन वर्षात लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्या न्यायव्यवस्थेच्या सुस्तपणाएवढाच त्यातील काही न्यायमूर्तींच्या सावधपणावर प्रकाश टाकणारा आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, उमा भारती यांसारख्या मोठ्या पुढाऱ्यांची सुनावणी रायबरेलीच्या तर सामान्य कारसेवकांविरुद्धची सुनावणी लखनौच्या न्यायालयात आजवर सुरू आहे. दरवेळी कोणती ना कोणती कारणे पुढे येऊन त्यात तारखांवर तारखा पडत तिचे रखडणे तब्बल पाव शतकाएवढे चालले आहे. यातले अनेक आरोपी आता इतिहासजमा झाले तर ते खटले ऐकणारे काही न्यायाधीशही निवृत्त झाले वा निमाले आहेत. या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.पी.सी. घोष व न्या. आर.एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने हे दोन्ही खटले लखनौच्या एकाच न्यायालयाकडे वर्ग करण्याचा व त्यात त्यांची दैनंदिन व एकत्र सुनावणी करण्याचा आदेश दिला आहे. एकाच खटल्यातील दोन तऱ्हेच्या आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र न्यायालयांनी खटले ऐकण्यात विसंगती येण्याची व त्या दोन न्यायालयांची निकालपत्रे परस्परांहून भिन्न असण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. ही विसंगती व विरोध टाळायला हे दोन्ही खटले एकाच न्यायालयाने ऐकावे असे त्यांचे मत आहे. यामुळे या खटल्याचा निकाल २०१९ पर्यंत लागला आणि त्यामुळे अनेक बड्या पुढाऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या तलवारी उतरलेल्या दिसल्या तर त्यामुळे देशातील एका वर्गाला आनंद तर दुसऱ्याला जखमी झाल्याचे दु:ख होणार आहे. ते व्हायचे तेव्हा होवो; पण त्या खटल्याच्या निकालाचे रखडणे त्याहून अधिक क्लेषदायक आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे येत्या दोन वर्षात त्याचा निकाल लागला तर देशालाही एका मोठ्या जोखडातून बाहेर आल्यासारखे वाटणार आहे. मात्र तसे येण्यात काही अडचणी आहेत आणि त्या सरकार पक्षाकडूनच पुढे केल्या जात आहेत. दोन न्यायालयांत चाललेले हे खटले एकत्र आणले तर त्यातील साक्षीदारांच्या बयानात विसंगती दिसेल, त्यात दुहेरीपण येईल, कदाचित ती परस्परविरोधीही असतील इथपासून दोन्ही ठिकाणचे पुरावे एकमेकांशी मिळतेजुळते असणार नाहीत व त्यामुळे त्यांचा एकत्र निकाल करणे अवघड होईल अशा तऱ्हेचा युक्तिवाद या प्रकरणात सरकारकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या कालबद्ध सुनावणीत अडथळे आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे हे उघड आहे. दोन्ही न्यायालयात आजवर झालेली सुनावणी योग्य व रीतसर झाली असेल तर त्यात अशी विसंगती येण्याचे कारण नाही. शिवाय लखनौच्या न्यायालयाला त्यातील खरे काय व खोटे काय याची पारखही नीट करता येईल. त्यासाठी ही सुनावणी थांबविणे व २५ वर्षे चाललेला खटला आणखी २५ वर्षे पुढे चालविणे याला न्यायदृष्ट्याच कोणता अर्थ उरणार नाही. एक गोष्ट मात्र महत्त्वाची. असा अर्थ उरू न देण्याच्याच इराद्याने हे अडचणीचे दाखले सरकारकडून पुढे आणले जात असतील तर त्याला एक राजकीय अर्थ आहे आणि तो सर्वांना समजणारा आहे. सामान्यपणे केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाला अडचणीचे ठरतील असे खटले लांबविणे, त्या पक्षाच्या ध्येयधोरणाशी वा साध्या राजकीय भूमिकेशी फटकून असणाऱ्या बाबी पुढे येणार नाहीत असा प्रयत्न करणे, आपल्या माणसांविरुद्धचे पुरावे ढिसाळ होतील व त्यात सुसंगती राहणार नाही अशी व्यवस्था करणे या गोष्टी अशावेळी सीबीआयसकट सगळ्या सरकारी यंत्रणा करतात. या यंत्रणांनी समझोता एक्स्प्रेसवर हल्ला चढविणारे आरोपी सोडण्याची व्यवस्था केली. अजमेर दर्ग्याचे अपराधी मोकळे केले. मालेगाव ‘स्वच्छ’ केले आणि हैदराबाद व दादरी येथील आरोपी सुटतील अशाच तऱ्हेचे बचाव पुढे आणले. सरकारच्या या पक्षपाती प्रयत्नांपुढे न्यायालयेही फारशी ताठपणे उभी राहिलेली दिसली नाहीत. हा प्रकार देशाच्या न्यायालयांवरील जनतेचा विश्वास उडविणारा व त्याची लोकशाही बैठक मोडून काढणारा आहे. न्यायालयांनी तटस्थपणे निर्णय देणे हे जेवढे आवश्यक तेवढेच त्यांच्यासमोर सत्य सादर करणे हे सरकारी तपासयंत्रणांचे कर्तव्य आहे. या यंत्रणाच पक्षपाती असतील तर डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता जे ऐकेल तेच आपल्या निकालात ग्राह्य मानेल. त्यामुळे राजकारणाने व सरकारने तसे केले तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याची बूज राखण्याचे कारण नाही. त्याने न्यायाच्या बाजूने उभे राहणे, खटल्याचा जलदगती समारोप करणे, आरोपींना शासन करणे व कायद्याचे श्रेष्ठत्व सांगणे हेच लोकशाही व देश यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ज्या प्रकरणातील आरोपींना साऱ्या जगाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर प्रत्यक्ष गुन्हा करताना पाहिले ती माणसे उद्या मोकळी सुटली तर आपल्या न्यायालयांची जगातील पतही कमी होणार आहे हे येथे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यायचे आहे.