शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

उन्हाची चाहूल, पाणीटंचाई अन् नागरिकांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:25 IST

आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व समजले होते. यामुळेच त्यांनी कुंड, तलाव, बावड्या अशा पाणी साठविण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था विकसित केल्या. पण विकासाच्या हव्यासापोटी आम्ही ही व्यवस्था नष्ट केली. एकेकाळी वर्षभर पाण्याने तुडुंब भरून राहणारे लहानलहान तलाव आता ओसाड पडले आहेत.

 - सविता देव हरकरेउन्हाची चाहूल लागतेय. पारा वाढू लागलाय. यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार असा अंदाज वर्तविला जातोय. त्याची अनुभूतीसुद्धा व्हायला लागलीय. आपल्याला येणाºया दिवसात भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या सांगण्यानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमान गेल्या ५० वर्षांच्या तुलनेत १ अंश सेल्सिअसने जास्त असणार आहे. तसे तर देशभरातच तापमान फार जास्त राहण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारतात या काळात सूर्य अधिक आग ओकेल, असा अंदाज आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानात सामान्यापेक्षा दीड अंश जास्त तापमान राहील, अशी शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पहाडी भागांमध्ये तर ते सामान्यापेक्षा २.३ अंश सेल्सिअसवर जाईल, अशी भीती आहे. इकडे मुंबईसह महाराष्टÑात उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीसच तापमान सामान्यापेक्षा जास्त होते. दरम्यान वाढत्या उष्म्यासोबतच ठिकठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्नही उद्भवू लागलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये धरणातील पाणीसाठ्याच्या भरवशावर मार्चपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या राहणार नसली तरी त्यानंतरचे तीन महिने मात्र कठीण असणार आहेत. विदर्भातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये तर आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागलेय. मराठवाड्यातील निम्म्या भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला. या क्षेत्रात येणाºया हजारो गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना आदी जिल्ह्यातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला असल्याची माहिती आहे. तसे बघता दरवर्षी उन्हाळा आला की पाणी टंचाईची समस्या निर्माण होणे हे काही नवीन नाही. पण ‘नेमेची येतो पावसाळा...’ असे मानत आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदायला निघतो. अनेक जिल्हा प्रशासनाने आता कुठे पाणीटंचाई निवारणासाठी आराखडे तयार करणे सुरू केले आहे. काहींनी यासाठीच्या विविध योजनांवर होणाºया खर्चाची माहिती शासनदरबारी कळविली आहे. पण त्यावर वेळीच योग्य कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व समजले होते. यामुळेच त्यांनी कुंड, तलाव, जोहड, बावड्या अशा पाणी साठविण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था विकसित केल्या. पण विकासाच्या हव्यासापोटी आम्ही ही व्यवस्था नष्ट केली. एकेकाळी वर्षभर पाण्याने तुडुंब भरून राहणारे गावागावांमधील लहानलहान तलाव आणि कुंड आता ओसाड पडले आहेत. अनेक तलाव तर अतिक्रमणाच्या विळख्यात नष्ट झाले. पाणी संचयनाच्या या जुन्या पद्धतींचे महत्त्व आम्ही जाणले नाही, हे आमचेच दुर्दैव म्हणायचे. नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आदीम काळापासून मानवी संस्कृती नद्यांच्या काठाकाठाने, तिच्या मदतीनेच फुलली, बहरली. परंतु इतर नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच पाण्याचाही अतिवापर, प्रदूषण तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे मानवच या नद्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. जंगलांवरील अतिक्रमण, अंदाधुंद वृक्षतोड, औद्योगिकरण, वाढते प्रदूषण आणि इतर कारणांमुळे पावसाचे संपूर्ण तंत्रच बिघडवून टाकले आहे. दुसरीकडे भूजल साठे वेगाने कमी होत आहेत. भारताचा विचार केल्यास भूजलाचा ७२ टक्के उपसा आपण केला आहे. महाराष्टÑातील परिस्थिती तर आणखी भीषण आहे. अशात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र