शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जगणं, उरणं अन् मरणं सुंदर करून गेलेला एक साळिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी रोजी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी रोजी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.रंध्री रंध्री माझ्या़, आंध्री भाषा जरीमंद्र गीत उरी, मराठीचेमराठीचे झाड, होऊनि अश्वत्थकरिते अस्वस्थ, दिनरातसोलापूर ही बहुभाषिकांची नगरी. इथे मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू भाषिक सोलापूरकर म्हणून गुण्यागोविंदाने राहतात. नाटक, गाणं आणि साहित्यात रुची असलेले कलावंत-साहित्यिक आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून जशी कलेची उपासना करतात, त्याआधी मराठीच्या दरबारात त्यांची सेवा रुजू झालेली असते. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली असेच मराठीचे थोर अमराठी उपासक. ते आवर्जून सांगतात, माझ्या रंध्रा रंध्रात तेलुगू अर्थात आंध्री भाषा आहे; पण उरातलं गीत मराठीचंच. अवघ्या मराठी साहित्यरसिकांना गेल्या चार दशकात आपल्या तरल, प्रांजळ कवितांचा अनुभव देणाºया या महान कवीने गत शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) साहित्यशारदेची सेवा करत करत अखेरचा श्वास घेतला. खरं तर बोल्ली म्हणजे एक आश्चर्यच! एका राजकारणी आणि उद्योजक घराण्यात या माणसाचा जन्म झाला. शिक्षण आणि कलेला घरातून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नव्हतं. शिक्षणही जेमतेम मॅट्रिकपर्यंतच; पण साहित्य, नाटक आणि चित्रकलेत या माणसानं हुकूमत गाजवली. कविता, कादंबरी, अनुवादापासून सर्वच साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तौलनिक अभ्यासाचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’, ‘दक्षिण भाषेतील रामायणे’ हे ग्रंथ अजोड आहेत. साहित्य आणि कलेच्या प्रांतात एखाद्या राजासारखं वावरणारा हा माणूस मात्र साधूवृत्तीचा होता. लहान-थोर, ज्ञानी-अज्ञानी कुणीही असो साºयांचे स्वागत ते ‘देवा’ असे संबोधूनच करायचे. वैराग्यभावही त्यांच्या ‘रंध्री रंध्री’ होता. एका अमराठी माणसानं मराठी साहित्यात अष्टपैलू कामगिरी करूनही त्याची समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही, याबद्दलची खंतही त्यांना कधी वाटली नाही.सर्वांना समजून घेणारे, सामावून घेणारे कविवर्य बोल्ली यांनी आयुष्यभर आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान-प्रदान केले. अभंग कलश (वचनानुवाद), पंचपदी (तेलुगू कथांचा अनुवाद), संत वेमन्ना (तेलुगू वचनांचा अनुवाद), यकृत (नाट्यानुवाद), कमलपत्र (चरित्रानुवाद), राजर्षी शाहू छत्रपती (तेलुगू चरित्र) या त्यांच्या आंतरभारतीच्या साहित्यकृती. बोल्ली हे दीर्घकाळ कवितेच्या प्रांतात वावरले. त्यांचा कवितेचा प्रवास १९७८ साली ‘मैफल’ या काव्यसंग्रहाने सुरू झाला. बोरकरांची ‘मैफल’ला प्रस्तावना लाभली. १९८२ साली प्रकाशित झालेल्या ‘झुंबर’ या काव्यसंग्रहाची प्रशंसा पु.ल. देशपांडे यांनी केली. कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह ‘झुंबर’ रसिकांच्या हाती आलं. त्याकाळी मुलांचं ‘चांदोबा’ हे मासिक खूपच लोकप्रिय होतं. सर्व भारतीय भाषांमधून ते प्रकाशित व्हायचं. बोल्ली यांचे साहित्यात नाव झालेले होते. ‘चांदोबा’च्या प्रकाशकांना ते ठाऊक होतं. त्यांनी बोल्ली यांना ‘चांदोबा’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली; पण ते चेन्नईत फारसे रमले नाहीत, पुन्हा सोलापुरी आले अन् मायमराठीची सेवा सुरू केली. ‘एका साळिया’ने या आत्मचरित्रातील त्यांनी मांडलेला स्वत:चा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. जीवनावर प्रेम करणारा हा थोर कवी नेहमीच साहित्यानंदात मग्न असायचा अन् सांगत राहायचा, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, जगण्या-मरण्यातील उरणं सुंदर आहे!-रवींद्र देशमुख

टॅग्स :Solapurसोलापूर