शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जगणं, उरणं अन् मरणं सुंदर करून गेलेला एक साळिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी रोजी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी रोजी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.रंध्री रंध्री माझ्या़, आंध्री भाषा जरीमंद्र गीत उरी, मराठीचेमराठीचे झाड, होऊनि अश्वत्थकरिते अस्वस्थ, दिनरातसोलापूर ही बहुभाषिकांची नगरी. इथे मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू भाषिक सोलापूरकर म्हणून गुण्यागोविंदाने राहतात. नाटक, गाणं आणि साहित्यात रुची असलेले कलावंत-साहित्यिक आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून जशी कलेची उपासना करतात, त्याआधी मराठीच्या दरबारात त्यांची सेवा रुजू झालेली असते. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली असेच मराठीचे थोर अमराठी उपासक. ते आवर्जून सांगतात, माझ्या रंध्रा रंध्रात तेलुगू अर्थात आंध्री भाषा आहे; पण उरातलं गीत मराठीचंच. अवघ्या मराठी साहित्यरसिकांना गेल्या चार दशकात आपल्या तरल, प्रांजळ कवितांचा अनुभव देणाºया या महान कवीने गत शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) साहित्यशारदेची सेवा करत करत अखेरचा श्वास घेतला. खरं तर बोल्ली म्हणजे एक आश्चर्यच! एका राजकारणी आणि उद्योजक घराण्यात या माणसाचा जन्म झाला. शिक्षण आणि कलेला घरातून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नव्हतं. शिक्षणही जेमतेम मॅट्रिकपर्यंतच; पण साहित्य, नाटक आणि चित्रकलेत या माणसानं हुकूमत गाजवली. कविता, कादंबरी, अनुवादापासून सर्वच साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तौलनिक अभ्यासाचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’, ‘दक्षिण भाषेतील रामायणे’ हे ग्रंथ अजोड आहेत. साहित्य आणि कलेच्या प्रांतात एखाद्या राजासारखं वावरणारा हा माणूस मात्र साधूवृत्तीचा होता. लहान-थोर, ज्ञानी-अज्ञानी कुणीही असो साºयांचे स्वागत ते ‘देवा’ असे संबोधूनच करायचे. वैराग्यभावही त्यांच्या ‘रंध्री रंध्री’ होता. एका अमराठी माणसानं मराठी साहित्यात अष्टपैलू कामगिरी करूनही त्याची समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही, याबद्दलची खंतही त्यांना कधी वाटली नाही.सर्वांना समजून घेणारे, सामावून घेणारे कविवर्य बोल्ली यांनी आयुष्यभर आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान-प्रदान केले. अभंग कलश (वचनानुवाद), पंचपदी (तेलुगू कथांचा अनुवाद), संत वेमन्ना (तेलुगू वचनांचा अनुवाद), यकृत (नाट्यानुवाद), कमलपत्र (चरित्रानुवाद), राजर्षी शाहू छत्रपती (तेलुगू चरित्र) या त्यांच्या आंतरभारतीच्या साहित्यकृती. बोल्ली हे दीर्घकाळ कवितेच्या प्रांतात वावरले. त्यांचा कवितेचा प्रवास १९७८ साली ‘मैफल’ या काव्यसंग्रहाने सुरू झाला. बोरकरांची ‘मैफल’ला प्रस्तावना लाभली. १९८२ साली प्रकाशित झालेल्या ‘झुंबर’ या काव्यसंग्रहाची प्रशंसा पु.ल. देशपांडे यांनी केली. कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह ‘झुंबर’ रसिकांच्या हाती आलं. त्याकाळी मुलांचं ‘चांदोबा’ हे मासिक खूपच लोकप्रिय होतं. सर्व भारतीय भाषांमधून ते प्रकाशित व्हायचं. बोल्ली यांचे साहित्यात नाव झालेले होते. ‘चांदोबा’च्या प्रकाशकांना ते ठाऊक होतं. त्यांनी बोल्ली यांना ‘चांदोबा’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली; पण ते चेन्नईत फारसे रमले नाहीत, पुन्हा सोलापुरी आले अन् मायमराठीची सेवा सुरू केली. ‘एका साळिया’ने या आत्मचरित्रातील त्यांनी मांडलेला स्वत:चा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. जीवनावर प्रेम करणारा हा थोर कवी नेहमीच साहित्यानंदात मग्न असायचा अन् सांगत राहायचा, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, जगण्या-मरण्यातील उरणं सुंदर आहे!-रवींद्र देशमुख

टॅग्स :Solapurसोलापूर