शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश भटांचे कृतघ्न विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:32 IST

कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा परवा स्मृतिदिन होता. नागपुरात सुरेश भटांच्या नावाने असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मात्र त्या दिवशी सामसूम होती. भटांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करायला कुणीच आले नाही. एरवी कळपाने जयंती-पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघालासुद्धा त्या दिवशी भटांचा विसर पडला. नागपुरात साहित्य संस्थांचा सुकाळ आहे.

- गजानन जानभोर

कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा परवा स्मृतिदिन होता. नागपुरात सुरेश भटांच्या नावाने असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मात्र त्या दिवशी सामसूम होती. भटांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करायला कुणीच आले नाही. एरवी कळपाने जयंती-पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघालासुद्धा त्या दिवशी भटांचा विसर पडला. नागपुरात साहित्य संस्थांचा सुकाळ आहे. भटांच्या पुण्याईवर मोठी झालेली माणसेही त्यात आहेत. पण, तीही कृतघ्न झालीत. या नतद्रष्ट्यांनी भटांची आठवण ठेवली नाही म्हणून भट विस्मृतीत जाणार नाहीत. आपल्या निसर्गदत्त प्रतिभेने समाजमन समृद्ध करणा-या माणसांचा विसर पडणे ही गोष्ट त्याकाळातील माणसांची संस्कृती आणि प्रवृत्ती अधोरेखित करीत असते. भटांची गझल, कविता सामान्य माणसांसाठीच होती. ती दुर्बोध नाही आणि एकलकोंडीही नव्हती. माणसात रमणारा आणि त्याच्या जगण्याची कविता लिहिणारा हा खºया अर्थाने ‘महाकवी’ होता. भटसाहेबांची कविता अंत:प्रेरणेतून आलेली होती. जुन्या इंग्रजी कविता किंवा कादंबºया वाचून त्यांना ती स्फूरली नाही, त्यामुळे त्यांच्या कवितांवर अमक्या-टमक्यांचा प्रभाव होता, असे म्हणण्याची बिशाद मराठीच्या कुठल्याही समीक्षकात नव्हती.भटसाहेब कलंदर होते. ‘फाटक्या पदरात माझे मावेल अंबर...दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर’ असे असूनही त्यांचा संसार शुन्याचा पण सुखाचा होता. आपल्या पश्चात आपले स्मरण व्हावे, जयंती-पुण्यतिथी लोकांनी साजरी करावी अशी संस्थात्मक तजवीज या अवलियाने कधी करून ठेवली नाही. नागपुरात भटांचे साधे घरही नाही. पण, मराठी कवितेला जनाभिमुख करणाºया या श्रेष्ठ कवीची आठवण राहावी म्हणून नितीन गडकरींनी जिद्दीला पेटून नागपुरात त्यांच्या नावाचे जागतिक दर्जाचे सांस्कृतिक सभागृह महानगरपालिकेला उभारायला लावले. पण, मनपातील आपलीच माणसे अशी दळभद्री निघतील याची कल्पना बहुदा गडकरींनाही नसावी. ज्येष्ठ नेते सुसंस्कृत असून उपयोग नाही, त्यांचे कार्यकर्तेही तसेच निपजावे लागतात. ज्या महापालिकेत आलिया भटशी सुरेश भटांचे नाते जोडणारे ‘महाज्ञानी’ नगरसेवक आहेत तिथे त्यांचा विसर पडावा हे एका अर्थाने बरेच झाले. नागपूर विद्यापीठालाही त्यांच्या नामस्मरणाची गरज वाटू नये, ही बाबसुद्धा तेवढीच संतापजनक आहे. विदर्भ साहित्य संघाबद्दल तर आता काहीच बोलायला नको. विदर्भाच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व करणाºया या संस्थेवर टीका करायलाही अलीकडे लाज वाटू लागली आहे. भट जिवंत असताना विदर्भ साहित्य संघांशी त्यांनी उभा दावा मांडला होता. भटांबद्दलचा तो राग या कद्रू पदाधिकाºयांच्या मनात अजूनही आहे का, असा प्रश्न कुणी विचारला तर तो चुकीचा ठरू नये.भटसाहेबांसारखी माणसे कोणत्याच कळपात रमली नाहीत. ती कुणाच्या सावलीतही कधी नव्हती. ते स्वतंत्र वादळ होते. भट सतत अस्वस्थ असायचे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी जे काही लिहिले ते अक्षय ठरले. म्हणूनच आजही साºयांच्याच मनात त्यांच्या कवितांना अढळ स्थान आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळात भटांच्या ‘लाभले आम्हास भाग्य...’ या मराठी गौरव गीताचे जाहीर वाचन होेते. पण, त्याचवेळी मात्र त्यांच्या गावातील माणसे अशी बेईमान व्हावीत हा विषण्ण करणारा अनुभव आहे. ज्यांना या श्रेष्ठ कवीचे विस्मरण झाले त्यांचे स्मरण तर सोडा साधे नावही उद्या जगाला आठवणार नाही. पण, भट असे विस्मृतीत जाणार नाहीत. त्यांनीच लिहून ठेवले आहे, ‘राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी...’