शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची वाढली साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

शरीरातील साखर वाढली की, मधुमेहाचा धोका असतो, नेमका हाच प्रकार महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीला झाला आहे.

शरीरातील साखर वाढली की, मधुमेहाचा धोका असतो, नेमका हाच प्रकार महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीला झाला आहे. साखरेचे घसरते दर आणि वाढणारा उत्पादन खर्च, उसाच्या क्षेत्राचा दरवर्षी होणारा विस्तार आणि यात सरकार आणि बाजारपेठेच्या नियंत्रणामुळे होणारा कोंडमारा आजच्या घडीला ही कारखानदारी अडचणीत आली आणि भविष्यात हे संकट अधिक गहिरे होणार आहे. सारे काही माहीत असूनही सरकार त्यावर तोडगा काढण्याबाबत गंभीर नाही. साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या कृषी अर्थकारणाचा कणा आहे. एकीकडे शेतमालाचे भाव कोसळत असताना नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना सावरले असताना आता तो रस्ताही बंद होणार का? नजीकच्या भविष्यात यावर उपाय दिसत नाही, कारण सरकार यावर तोडगा काढण्याचे फारसे प्रयत्न करते आहे, असे आश्वासक चित्र नाही. काही तरी तुटपुंजी मदत जाहीर करून ते कर्तव्यपूर्तीच्या समाधानात आहे. साखर उद्योगाचे मूळ दुखणे सरकारच्या धोरणात आहे. सरकार नियंत्रण ठेवते; पण पालकत्व घेत नाही. उसाची किंमत ठरविणे, कामगारांचे वेतन निश्चित करणे, तोडणी, वाहतुकीचे दर हे सरकार ठरवते, परंतु साखरेच्या दरावर तसे नियंत्रण नाही, त्यामुळे सरकार आणि बाजारपेठ या दोघांच्या अडकित्त्यात हा उद्योग सापडला आहे. सरकारी धोरणाने कारखाना चालवावा लागतो आणि साखरेच्या दरावर बाजारपेठेचे वर्चस्व आहे. फक्त उत्पादन करणे कारखान्यांच्या हाती. साखर कारखानदारी अडचणीत येण्याचे आजचे वास्तव वेगळेच आहे. आज साखरेचा एका किलोचा उत्पादन खर्च ३५ रुपये, त्याचवेळी बाजारात २५ रुपये किलो या दराने विकावी लागते आणि तिला फारसे ग्राहक नाहीत. यावर्षी देशात ३० दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन झाले. देशाची गरज ही २५ दशलक्ष मेट्रिक टनाची, त्यामुळे गेल्या वर्षीचा साठा आणि आताची साखर लक्षात घेता साखर बक्कळ प्रमाणात आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही दर पडलेले आहेत. अशा परिस्थितीत निर्यातसुद्धा करता येत नाही आणि पावसाळा तोंडावर आल्याने सरकारने परवानगी दिली असली तरी निर्यात करणे शक्य नाही. बाजारपेठेत भाव नाही, निर्यात करता येत नाही आणि कारखाने तर चालवायचे, अशा पेचात कारखानदारी सापडली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शेतीचा आधार असलेली सहकार चळवळ साखर कारखानदारीतूनच बहरली. महाराष्ट्रातील १६५ पैकी ९९ सहकारी कारखाने चालू आहेत. शिवाय ८८ खासगी साखर कारखाने आहेत. अर्थकारणाचा मुद्दा म्हणजे ही कारखानदारी ३० ते ४० हजार कोटीच्या गुंतवणुकीची. ३० लाख सभासद, सुमारे २० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार पाहता महाराष्ट्राच्या अर्थकारणात या उद्योगाचा वाटा मोठा आहे. यावर्षी साखरेला भाव नसल्याने अडचण वाढली. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात सरकारने बिनव्याजी कर्ज दिले होते, त्याची वसुली सुरू झाली. साखरेचा साठा बँकेच्या ताब्यात असतो. भाव पडल्याने कमी भावात निर्यातीसाठी बँक साखर सोडत नाही. अशा पद्धतीने हा उद्योग अडचणीत आला आहे. सरकारने टनामागे ५५ रुपयांची मदत जाहीर केली; पण ती तुटपुंजी आहे. त्याचा कोणताही आधार होणार नाही. यावर्षीच या उद्योगाचे कंबरडे मोडले, पुढचे वर्ष तर कारखानदारीच्या मुळावर उठणारे आहे. पुढच्या वर्षी उसाचे उत्पादन १०७१ दशलक्ष मेट्रिक टन अपेक्षित आहे. जे यावर्षी १०२९ दशलक्ष मेट्रिक टन झाले होते. उताराही ११.२३ टक्के अपेक्षित आहे. सर्व हिशेब लक्षात घेतला तर एकूण उत्पादन आणि शिल्लक साठा अशी १२० दशलक्ष मेट्रिक टन साखर असेल. जागतिक बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली आहे. त्यात ही कारखानदारी सरकारी मदतीशिवाय तग धरणार नाही, यासाठी सरकारलाच मार्ग काढावा लागणार आहे. साखरेचीच साखर वाढल्याने कारखानदारीला झालेला मधुमेह रोखण्यासाठी इन्सुलिन सरकारकडून अपेक्षित आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र