शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विद्यार्थ्यांना हक्काचा दिवस मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 03:53 IST

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आज ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस राज्यभर साजरा होणार आहे. उद्या तो देशभर साजरा होईल व कालांतराने तो जगभर साजरा होईल.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आज ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस राज्यभर साजरा होणार आहे. उद्या तो देशभर साजरा होईल व कालांतराने तो जगभर साजरा होईल. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र लहानपणीच सर्व विद्यार्थ्यांना कळेल. त्यांच्या प्रेरणेतून आदर्श विद्यार्थी घडतील.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगताचे आदर्श विद्यार्थी होते. ते आजन्म विद्यार्थी राहिले. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून चांगले आदर्श विद्यार्थी घडावेत या भावनेतून विद्यार्थी दिवस साजरा करण्याची मागणी जुनीच आहे. नागपुरात १४ एप्रिल १९९६ ते १४ एप्रिल २००० वर्षापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समितीद्वारे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत असे. कालांतराने त्यात खंड पडला. तरीही काही शैक्षणिक संस्था आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करीत. परंतु शासन स्तरावर सर्व शाळा महाविद्यालयातून हा दिवस साजरा व्हावा, अशी जनतेतून मागणी होती. त्या संबंधाने मागील १५ वर्षांपासून सरकारांना अनेक निवेदन देऊन झाली परंतु निर्णय झाला नव्हता.विधानसभेत १६ मार्च २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस घोषित करण्यात यावा, यासाठी मी औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचदिवशी या आशयाचे पत्र दिले. जवळपास दीड वर्षे या विषयाला सरकारकडे लावून धरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी होत असताना या निर्णयाला फार महत्त्व होते. शेवटी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयाची गोड बातमी कानावर आली. अनेक वर्षांच्या केलेल्या प्रयत्नांना यश आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनाची माहिती घेत असताना ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, सातारा येथे त्यांचा शाळा प्रवेश झाल्याची माहिती मिळाली. सुभेदार रामजी मालोजी सपकाळ (बाबासाहेबांचे वडील ) हे सैन्यातून महु येथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रेल्वे कॉन्ट्रक्टर, सातारा यांच्याकडे खासगी नोकरी पत्करली. त्यानिमित्ताने ते साताºयाला वास्तव्यास आले होते. तेव्हा बाल भीमाचे नाव या शाळेत घातले गेले. तो दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. याच शाळेत त्यांंना वर्गाबाहेर बसविण्यात येत होते. पिण्याचे पाणीही सार्वजनिक ठिकाणी पिण्याची मनाई होती. तरीही त्यांनी निमूटपणे शिक्षण घेतले. जातीवादाचे हे चटके सहन करीत त्यांनी विद्याव्यासंगाला सदैव जपले. त्यातून ज्ञान संपादित करून समाजाची व राष्ट्राची सेवा केली. देशात व जगात समाजाच्या अनेक घटकांचे दिवस साजरे केले जातात. परंतु समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक विद्यार्थी याचा कुठलाही दिवस नाही. आता या घटकाची दखल घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा दिवस मिळाला आहे. आज देशातील तर उद्या जगातील सर्व विद्यार्थी एकाच धाग्यात गुंफले जातील. विद्यार्थ्यांचा मान-सन्मान होईल, सत्कार होईल. शिक्षकांनादेखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या सोबतीप्रमाणे वागण्यासाठी, शिक्षक-विद्यार्थी या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी एक चांगला दिवस प्राप्त झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवचेतना मिळेल.- आ. डॉ. मिलिंद माने, (editorial@lokmat.com)