शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

मजबूत गुडघे स्वस्तात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:38 AM

एखाद्याची अक्कल काढायची असल्यास, त्याची अक्कल घुटण्यात आहे काय?

एखाद्याची अक्कल काढायची असल्यास, त्याची अक्कल घुटण्यात आहे काय? असा शब्दप्रयोग सर्रास केला जातो किंवा कुणाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले तरी ‘त्याला गुडघे टेकायला लावले’, असे आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असतो. तर असा हा ‘घुटणा’ म्हणजेच गुडघा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. गुडघा निकामी झाला की माणसाचे चालणेच थांबते. अशा वेळी मग कृत्रिम गुडघा बसविण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो. एरवी या गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचा अवाढव्य खर्च आणि रुग्णांची होणारी लुटमार बघितली की मग कुणाच्याही घुटण्यात आल्याशिवाय राहत नाही. मात्र यापुढे तशी गरज पडणार नाही. कारण केंद्र शासनाने आता गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीच्या दरांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेवरील खर्च जवळपास ७० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून, समस्त गुडघाग्रस्तांसाठी ही आनंदाची वार्ता आहे. राष्टÑीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणाने (एनपीपीए) गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांची होणारी लुबाडणूक थांबविण्याकरिता रुग्णालये, वितरक तसेच आयातदारांच्या नफेखोरीचे आकडे गेल्या आठवड्यात उघडकीस आणले होते. या शस्त्रक्रियेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक नफा कमावला जात असल्याचे एनपीपीएने लक्षात आणून दिले आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात हृदयरुग्णांसाठीच्या स्टेंटस्प्रमाणे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया स्वस्त करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर हालचालींना वेग आला. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आणि रुग्णांना मोठा दिलासा देणारा आहे. अपघात, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे आज अस्थिरोग आणि प्रामुख्याने गुडघ्यांचे आजार प्रचंड वाढले आहेत. देशात आजमितीस दीड ते दोन कोटी लोकांना गुडघा प्रत्यारोपणाची गरज आहे. परंतु केवळ सव्वा ते दीड लाखच शस्त्रक्रिया होत असतात. कारण यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येत असल्याने अनेकदा रुग्णांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसते. परंतु आता किमती घसरल्याने ते शक्य होणार आहे. केंद्र शासनाने यावर्षीच्या प्रारंभी नवे आरोग्य धोरण जाहीर केले होते. या धोरणात ज्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यात जनतेला आरोग्यसेवेवर कराव्या लागणाºया खर्चात कपात प्रमुख होती. त्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे समजण्यास हरकत नाही.