शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

भक्कम पाया आवश्यक

By admin | Updated: April 24, 2017 23:25 IST

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला.

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला. यानंतर टी-२०च्या वेगाने संपूर्ण क्रिकेट खेळच बदलला. टी-२० क्रिकेटच्या आक्रमक रूपामुळे आज कसोटी सामन्यांची रंगत कमी होत असल्याची बोंब आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे. क्रिकेटची रंगत वाढवण्याच्या हेतूने पाच दिवसांचा कसोटी सामना व एकदिवसीय सामन्याला मागे टाकून तीन तासांमध्ये संपणारा टी-२० क्रिकेटचा थरार पुढे आला. पण, त्याचवेळी हे खरं क्रिकेट आहे का, असा प्रश्नही पडतो. जो खेळ तंत्रशुद्ध फलंदाजीचा, लयबद्ध गोलंदाजीचा म्हणून ओळखला जातो, त्या खेळाची ओळख आज आक्रमकता, विध्वंसक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी अशी झाली आहे. टी-२०चे स्वरूप पाहता हे आवश्यक आहे हे जरी मान्य केले तरी हे खरेखुरे क्रिकेट नक्कीच नाही. यामुळे युवा खेळाडू आक्रमकतेला प्राधान्य देताना क्रिकेटचा मूळ पाया विसरत आहेत. क्रिकेटसाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. अगदी, १० ते १४ वर्षांखालील खेळाडूही एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांसारखे आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटचा पाया भक्कम असणे आवश्यक का आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा. सध्या भारताचे सर्वच खेळाडू टी-२० खेळत असताना पुजारा मात्र या प्रारूपमध्ये बसत नसल्याने त्याचा विचार आयपीएलसाठी होत नाही. मात्र, कसोटी सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरत असताना हाच पुजारा भारताचा तारणहार ठरतो. नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये हेच सिद्ध झाले. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम टी-२०च्या भडीमारामुळे सध्याच्या खेळाडूंमध्ये कमी दिसतो. शेवटी क्रिकेट हा तंत्र व संयम यावर अधिक अवलंबून असल्याने खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.