शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

भक्कम पाया आवश्यक

By admin | Updated: April 24, 2017 23:25 IST

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला.

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला. यानंतर टी-२०च्या वेगाने संपूर्ण क्रिकेट खेळच बदलला. टी-२० क्रिकेटच्या आक्रमक रूपामुळे आज कसोटी सामन्यांची रंगत कमी होत असल्याची बोंब आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे. क्रिकेटची रंगत वाढवण्याच्या हेतूने पाच दिवसांचा कसोटी सामना व एकदिवसीय सामन्याला मागे टाकून तीन तासांमध्ये संपणारा टी-२० क्रिकेटचा थरार पुढे आला. पण, त्याचवेळी हे खरं क्रिकेट आहे का, असा प्रश्नही पडतो. जो खेळ तंत्रशुद्ध फलंदाजीचा, लयबद्ध गोलंदाजीचा म्हणून ओळखला जातो, त्या खेळाची ओळख आज आक्रमकता, विध्वंसक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी अशी झाली आहे. टी-२०चे स्वरूप पाहता हे आवश्यक आहे हे जरी मान्य केले तरी हे खरेखुरे क्रिकेट नक्कीच नाही. यामुळे युवा खेळाडू आक्रमकतेला प्राधान्य देताना क्रिकेटचा मूळ पाया विसरत आहेत. क्रिकेटसाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. अगदी, १० ते १४ वर्षांखालील खेळाडूही एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांसारखे आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटचा पाया भक्कम असणे आवश्यक का आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा. सध्या भारताचे सर्वच खेळाडू टी-२० खेळत असताना पुजारा मात्र या प्रारूपमध्ये बसत नसल्याने त्याचा विचार आयपीएलसाठी होत नाही. मात्र, कसोटी सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरत असताना हाच पुजारा भारताचा तारणहार ठरतो. नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये हेच सिद्ध झाले. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम टी-२०च्या भडीमारामुळे सध्याच्या खेळाडूंमध्ये कमी दिसतो. शेवटी क्रिकेट हा तंत्र व संयम यावर अधिक अवलंबून असल्याने खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.