शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मराठवाड्यात नेत्यांना धक्के

By सुधीर महाजन | Updated: October 11, 2017 01:07 IST

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात.

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या दाव्याकडे गंभीरपणे पाहिले तर त्यांनी गावपातळीवर सत्तेत शिरकाव करणे साहजिक आहे; पण या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती असे स्पष्ट चित्र नाही. मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद वगळता सात जिल्ह्यातील १७७३ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. उस्मानाबादेतील १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसºया टप्प्यात आहेत. दावे प्रतिदावे काहीही असले तरी प्रमुख नेत्यांच्या बाबतीत धक्का देणाºया गोष्टी घडल्या.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवखेडा हे भोकरदन तालुक्यातील गाव ते भाजपकडे असणे साहजिक आहे पण येथे भाजपचीच तीन पॅनल्स एकमेकांच्या विरोधात लढत होती. कोणतेही जिंकले तरी ते दानवेंचेच असणार. अशा अडचणीच्या वेळी नेते मंडळी सर्वांनाच आशीर्वाद देतात. बीडमध्ये भाऊबंदकी जोरावर आहे. मुंडे-क्षीरसागर दोघेही त्रस्त आहेत. मुंडे भावंडामध्ये येथेही वरचढ ठरले. गोपीनाथगड असलेली पांगरीची ग्रामपंचायत त्यांच्या समर्थकांनी जिंकली. तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांची नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पळविली.लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांच्या तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या नाहीत. येथे काँग्रेस वरचढ ठरली. दापका, अंबुलगा या ग्रामपंचायती त्यांच्या हातून निसटल्या. परभणीत तर ग्रामपंचायतींचा कौल सत्ताधाºयांच्या विरोधात गेला. माजी खासदार गणेश दूधगावकर यांना दूधगावातील ग्रामपंचायत गमवावी लागली आणि पुतण्या दिलीप हा पराभूत झाला. नांदेडमध्ये शिवसेनेचा जोर कायम होता. तर हिंगोलीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जनतेतून थेट निवडून येणारा सरपंच त्यामुळे त्याला अधिकारही जास्त. दीड वर्षांनंतर होणाºया लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपला आपले बस्तान बसवता आले नाही; पण आता उद्या होणाºया महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर तळ ठोकून आहेत. दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. नांदेड जिल्ह्यात भाजप अजून स्थिर होऊ शकलेला नाही. तेथे काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रभाव असल्याने महापालिका निवडणुकीसाठी भाजपने येथे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना गळास लावले. चिखलीकरांनी आपले साथीदार भाजपमध्ये पाठविले. आणि उघडपणे भाजपचा प्रचार केला. किंबहुना या निवडणुकीचे नेतृत्व केले; पण ग्रामपंचायत निवडणुकीत लाभ भाजपला मिळाला नाही. उद्या होणाºया महापालिका निवडणुकीत त्यांची भाजपसाठीची उपयुक्तता स्पष्ट होईल. शिवाय या निकालाचे दूरगामी परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर होतील. sudhir.mahajan@lokmat.com  

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत