शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 04:50 IST

देशाची राजधानी दिल्ली, पुन्हा एकदा ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या धर्तीवर प्रदूषण आणि गारठ्याच्या धुक्यात हरवून जात त्यातून दोषारोपांच्या चक्रात अडकली आहे.

- शैलेश माळोदेदेशाची राजधानी दिल्ली, पुन्हा एकदा ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या धर्तीवर प्रदूषण आणि गारठ्याच्या धुक्यात हरवून जात त्यातून दोषारोपांच्या चक्रात अडकली आहे. दरवर्षी या दिवसात दिल्लीतील धुके इतके दाट होते की हिवाळ्यापेक्षा प्रदूषणाचा विळखाच मनाला खूप यातना देतो, शारीरिक यातनांबद्दल तर न बोललेलेच बरे. दरवेळेला ‘प्रदूषणात वाढ’ यासारख्या मथळ्यांचे फार कौतुकही आता राहिलेले नाही. वायुप्रदूषण हा केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनलाय. तो केवळ पर्यावरणीय मुद्दा राहिलेला नाही की त्यावर परिषदांतून पक्त चर्चेचे गुºहाळ लावावे आणि बाहेर पडल्यावर वाहनातून डिझेलवर चालणाऱ्या इंजीनद्वारे प्रदूषणकारी वायुउत्सर्जन करीत निघून जावे.वायुप्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याशी निगडित मुद्दा बनलाय. त्याचा संबंध प्रत्येक श्वसन करणाºया जीवाशी आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर प्राण्यांशीही आहे. अबालवृद्ध आणि स्त्री-पुरुष तसेच धर्म, जात हा विषय त्यात नाहीच. ज्या प्रमाणात वायुप्रदूषणात वाढ होतेय त्याच प्रमाणात जणू नीती निर्धारकांचा त्या संदर्भातील प्रतिसाद मंदावतोय, असे मत व्यक्त होताना दिसते. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या २०१६ च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी १ लक्ष मुले पाच वर्षांची होण्याच्या आतच मृत्युमुखी पडताना दिसताहेत. कारण हवाप्रदूषण त्याचप्रमाणे देशातील लोकांचे सरासरी आयुर्मानही जागतिक प्रमाणापेक्षा दोन ते तीन वर्षांनी घटतेय.आकडेवारी असे दर्शवते की जगातील इतर समकक्ष परिस्थिती असलेल्या राष्ट्रांच्या तुलनेत भारताची स्थिती वायुप्रदूषणाचा विचार करता अत्यंत वाईट आहे. ग्रीनपीस संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असून दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. शेजारी देशांशी तुलना केल्यास स्थिती अधिकच वाईट असल्याचे दिसते. चीनचा आकडा पाच, पाकिस्तान दोन आणि बांगलादेशचा एक आहे. पर्यावरणीय कामगिरीचा विचार करता जागतिक क्रमवारीत भारत शेवटून चौथ्या म्हणजे १८१ राष्ट्रांत १७७ व्या स्थानावर आहे. उर्वरित क्रमांक बांगलादेश, बुरुंडी, डेमॉक्रेटिक रिपब्लिक आॅफ कांगो आणि नेपाळ यांचे आहेत.

सध्या दिल्लीच्या स्थितीचा विचार करता येथील बालकांचे आरोग्य आणि जीवनाचा दर्जा खूप खालावलेला आहे. आरोग्याचा विचार करता काही तज्ज्ञांच्या मते दररोज २२ सिगारेट्स ओढल्यानंतर जे काही प्रदूषण फुप्फुसात होत असेल त्या पातळीची स्थिती सध्या दिल्ली हवेची आहे. वाढते पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे प्रदूषकांचे विविध स्रोतांपासून वाढणारे प्रमाण हे पूर्वीच धोकादायक असल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी काळजीचे कारण होते. परंतु सध्याचे पार्टिक्युलेट मॅटरचे संकट पूर्वीपेक्षा वेगळे आहे. कारण लोकांची प्रदूषण पातळी मॉनिटर करण्याची क्षमता वाढलीय आणि ही खूपच महत्त्वाची बाब आहे. केवळ हवामान खात्याशी संबंधित संस्था वा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अंदाज आणि आकड्यांवर अवलंबून राहण्याचे दिवस विविध अ‍ॅप्समुळे इतिहासजमा झाले आहेत. तरीही वाढती जागरूकता आणि सामाजिक माध्यमांवर व्यक्त होणारा संताप अर्थपूर्ण कार्यवाहीत रूपांतरित झालेला दिसत नाही.हवेची घटती गुणवत्ता लक्षात घेता आणि त्यात स्थानिक घटकांचा वाटा ध्यानात ठेवता केंद्र आणि राज्य सरकारला अप्रिय परंतु कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. दिल्लीतील खासगी वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता सम-विषम वाहनांचा दिल्ली सरकारचा निर्णय आणि त्याचबरोबर गरज भासल्यास हवेची गुणवता खूप घसरल्याच्या स्थितीत दुचाकी, तिचाकी आणि अगदी चारचाकींवरही बंदी आणण्यासारख्या निर्णयाबरोबरच बांधकाम रोखणे, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील वीज केंद्र बंद ठेवण्यासारखे पर्याय वापरावे लागतील.
दिल्ली सरकार आणि केंद्राद्वारे संपूर्ण वर्षाच्या आकडेवारीची सरासरी दाखवून परिस्थिती सुधारत असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि त्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा तळ झाकला जातो. परिस्थिती बिकट होण्यापूर्वी किमान दोन महिने अगोदरच याबाबत कठोर पावले उचलायला हवीत. त्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारांतील कठीण नातेसंबंध लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्यासाठी खºया अर्थाने ठोस कार्यवाही करणारी सक्षम, मजबूत आणि स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. नाहीतर दरवर्षी त्या काळापुरत्या क्षणिक प्रतिक्रिया उमटतील आणि प्रदूषणाविरुद्धची लढाई केवळ प्रार्थना आणि हवेवर अवलंबून राहील. दिल्लीकरांनी खरोखरच याचा विचार करायला हवा.(पर्यावरण अभ्यासक)

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhi pollutionदिल्ली प्रदूषण