शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘‘समुद्र आमचा अख्खा देश गिळतो आहे...’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 08:45 IST

ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही नसतं. तो सगळ्या एनजीओंनी उभा केलेला बागुलबुवा आहे.” असा समज मनाशी घट्ट पकडून असणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, आणि ते बरेच असतात. 

“ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही नसतं. तो सगळ्या एनजीओंनी उभा केलेला बागुलबुवा आहे.” असा समज मनाशी घट्ट पकडून असणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, आणि ते बरेच असतात. त्यापैकी काहींचं मत हे त्यांच्या राजकीय विचारसरणीने प्रभावित झालेलं असतं. म्हणजे त्यांच्या नेत्याने जर, का “ ग्लोबल वॉर्मिंग झूठ है |” अशी भूमिका घेतली तर, हे लोक फारसा विचार न करता तीच भूमिका लावून धरतात. काहीजण हे ‘आपल्याला काय घेणं देणं आहे’ अशा प्रकारातले असतात. ग्लोबल वॉर्मिंग असलं काय किंवा नसलं काय, त्यांच्या आयुष्यात त्याने काहीच फरक पडणार नाही अशी त्यांची खात्री असते. उन्हाळा फार वाढायला लागला तर, सगळ्या खोल्यांमध्ये एसी लावायचा, थंडी वाढली तर, जास्त गरम कपडे घ्यायचे (तेवढीच फॅशन !) आणि सारखा सारखा अवेळी पाऊस पडायला लागला तर, अजून एक फोर व्हिलर घ्यायची - हे त्यांच्या दृष्टीने  सोपे उपाय असतात.

या दोन प्रकारांच्या पलीकडे तिसऱ्या प्रकारातले लोक असतात, ज्यांना आजूबाजूला घडणाऱ्या घटना दिसत असतात, पण, त्यामध्ये काही संगती आहे हे फारसं पटत नसतं. “ हल्ली पूर्वीइतकी थंडी पडत नाही.” “ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी उन्हाळ्यात इतकं तापमान वाढायचं नाही.” “ हल्ली जवळजवळ दर वर्षीच थंडीत अवकाळी पाऊस पडतो नाही तर, वादळं येतात, ते पूर्वी क्वचित एखाद्या वर्षी व्हायचं.”- अशा बाबी त्यांच्या लक्षात येतात, पण, त्यामागे ग्लोबल वॉर्मिंग इतकं मोठं कारण असेल हे त्यांच्या पचनी पडत नाही. त्यांच्या दृष्टीने त्यासाठी ‘जगातलं पाप वाढलेलं आहे’ इथपासून ‘असं सगळ्याच पिढ्यांना कायम वाटतं’ इथपर्यंत काहीही कारण असू शकतं. परदेशात होणारी  तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठीची जागतिक परिषद आणि आपल्यावर वारंवार येणारं दुबार पेरणीचं संकट याचा आपापसातील संबंध त्यांना जोडता येत नाही. पण, आता मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे ज्यांचा थेट बळी जाणार आहे असा एक देश समोर आला आहे तुवालू ! 

तुवालू या देशाचं नाव कोणी सहसा ऐकलेलंही नसतं. पॅसिफिक समुद्रात असलेलं हे केवळ २६ चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळ असलेलं बेट. त्याची एकूण लोकसंख्या आहे जेमतेम साडेदहा हजार. बरं हे काही टुरिस्ट डेस्टिनेशन वगैरे नाही. इथे वर्षाकाठी जेमतेम दीड हजार पर्यटक जातात.  पण, हेच तुवालू बेट अत्यंत दुर्दैवी कारणासाठी अचानक प्रकाशात आलं आहे. समुद्रसपाटीपासून फारसं उंच नसलेलं हे बेट जागतिक तापमानवाढीचा पहिला बळी ठरणार आहे. गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञ ओरडून  सांगतायत की, जागतिक तापमानवाढ रोखली गेली नाही, तर,  समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. शास्त्रज्ञांचं हे म्हणणं कोणी फार गांभीर्यानं घेतलं नाही, कारण   समुद्राची पातळी वाढेल म्हणजे काय हे आपल्या डोळ्यासमोर येत नाही. हजारो चौरस मैल पसरलेला समुद्र. त्याच्या भरती ओहोटीच्या पातळीत देखील काही ठिकाणी एकेक किलोमीटरचा फरक दिसतो. अशा समुद्राची पातळी एक सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटरनी वाढली तर, काय होणार आहे? 

तर, तुवालू या संपूर्ण देशाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची आहे ६.६ फूट. त्याचे किनाऱ्याचे प्रदेश बहुतेक ठिकाणी समुद्रसपाटीला समांतर आहेत. म्हणजे समुद्राला लागून असणारे उंच कडे वगैरे असला काही प्रकार नाही. त्यामुळे तुवालूच्या किनाऱ्यावरील भागात समुद्राचं पाणी आत आलेलं स्पष्ट दिसतं.

तुवालूवर आलेल्या या संकटाचं गांभीर्य जगापर्यंत पोचावं म्हणून यावर्षी झालेल्या ग्लासगो हवामान बदल परिषदेत तुवालूचे मंत्री गुढघाभर पाण्यात उभं राहून आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. ते जिथे उभे आहेत त्या जागी काही वर्षांपूर्वी सपाट स्वच्छ कोरडी जमीन असायची. आता मात्र ती जागा समुद्राने गिळंकृत केली आहे. इतकंच नाही, तर, या छोट्याशा बेटाला हल्ली सतत चक्रीवादळं, आणि महाप्रचंड मोठ्या लाटांना तोंड द्यावं लागतं. चक्रीवादळ आलं की, इथली अनेक पिके नष्ट होऊन जातात. इथली जमीन मोठ्या प्रमाणात प्रवाळापासून तयार झालेली आहे. त्यामुळे इथल्या सखल भूप्रदेशांमध्ये समुद्राचं पाणी जमिनीतून वर येतं. त्याची ओहोटीच्या वेळी खाजणं तयार होतात. समुद्राचं पाणी मोठ्या भरतीला आणि मोठ्या लाटांमुळे वर येऊन इथली जमीन काही ठिकाणी नापीक होऊ लागलेली आहे. मुळात बेटाचं क्षेत्रफळ २६ चौरस किलोमीटर्स असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. 

प्रश्न एकट्या तुवालूचा आहे का?जगाचं तापमान याच वेगाने वाढत राहिलं, तर, काही वर्षात तुवालू हा देश माणसांना राहण्यासारखा उरणार नाही. तिथल्या सगळ्याच्या सगळ्या नागरिकांना इतर कुठल्यातरी देशात निर्वासित म्हणून जगावं लागेल. आणि तुवालू ही या भयंकराची केवळ सुरुवात असेल. सॉलोमन आयलँड्स, सामोआ, मालदिव असे इतरही अनेक बेटांवर वसलेले देश आज ना उद्या याच संकटात ढकलले जाणार आहेत.