शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

By संदीप प्रधान | Updated: May 9, 2018 00:06 IST

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय.

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय. स्वागतिकेचा चेहरा (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दिवसभर बौद्धिक ऐकल्यावर होतो तसा) लांब झाला. चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह घेऊन ती अमित शहा यांच्याकडे गेली. अमितभाई, बाहेर कुणीतरी डॉ. विश्वामित्र आलेत. ते भलतेच काहीतरी बडबडत आहेत. मला काही समजत नाही. त्यांना तुमच्याकडे पाठवू का? अमितभार्इंनी आपले टक्कल कराकरा खाजवले. चेहरा वेडावाकडा केला. स्वागतिकेला न बोलताच इशारा मिळाला. मात्र, तोवर बाहेर सुरक्षारक्षकांचा गलका ऐकू आला आणि दरवाजातून डॉ. विश्वामित्र चक्क आत घुसले. अखेर, मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो तर... विश्वामित्र हसत पुटपुटले. शहांनी खिशातून रुमाल काढून घाम पुसला. लक्ष्यापर्यंत पोहोचलो म्हणजे, काय म्हणायचे काय आहे तुम्हाला? शहांनी संशयाने पाहत प्रश्न केला. घाबरू नका. आपण सारे त्या नियतीदेवीची मुलं आहोत. तिच्या हातातील कळसूत्री बाहुल्या. अमितभाई, तुम्ही मागच्या जन्मात एका पक्षाचे प्रमुख होतात आणि चक्क स्त्री होतात. (अमितभाई सुटलेले पोट दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतात) आपले पंतप्रधान नरेंद्रभाई हे मागच्या जन्मातही पंतप्रधान होते. मात्र, मागच्या जन्मात ते कुशाग्र बुद्धीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या जन्मात ज्या ज्या घटना घडल्या, त्या त्या घटना तशातशा पुन्हा घडू लागल्या आहेत. म्हणजे... अमितभार्इंनी घोगºया आवाजात प्रश्न केला. वेट वेट माय बॉय. इतकी घाई करू नको. गोष्ट फार गुंतागुंतीची आहे. त्यावेळी एका मुलीची काही नराधमांनी बलात्कार करून हत्या केली होती. समाजमन बिथरले होते. वारूळ फुटल्यानं मुंग्या सैरावैरा पळाव्या व त्यांनी डंख मारण्याकरिता त्वेषानं चाल करावी, तसं घडलं होतं. आताही एक कोवळ्या निष्पाप जीवाच्या बाबतीत तेच घडलं. मेणबत्ती मोर्चे निघाले. सोशल मीडियावर संतापानं काहिली झाली. त्या जन्मात काही दिग्विजयी मंडळींच्या वक्तव्यानं काहूर माजलं होतं. आता तर वाचाळवीरांनी कहर केलाय. नारद काय, गणपतीची प्लास्टिक सर्जरी काय, सापेक्षतावादाचा सिद्धांत काय, त्यावेळी पंतप्रधान एक शब्द बोलले असते, तर पुढचे सारे घडायचे टळले असते. मी खूप प्रयत्न केला. आताही तेच, अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन आणि शौचालये, सफाई, डिजिटलायझेशन, सॅनिटरी नॅपकीन यावर अखंड बडबड. पण, हे तुम्ही थांबवू शकता. अमितभार्इंनी ‘कसे काय’, असा चाचरत प्रश्न केला. फक्त एकदा तुम्ही नरेंद्रभार्इंकडे जा आणि त्यांना म्हणा की, नोटाबंदी, रोहित वेमुला, कठुआ, नीरव मोदी, राफेल डील आणि जय शहाबद्दल बोला. मौन संपवा. आता अमितभाई लालबुंद झाले. त्यांनी डॉ. विश्वामित्राच्या बखोटीला धरून त्याला केबिनबाहेर आणले आणि ‘पागल कही का’, असं जोरात किंचाळले. क्षणार्धात डॉक्टरची दाढी, मिशा व केसांचा विग कार्यकर्त्यांच्या हाती लागला. तो वैफल्यग्रस्त भक्त असल्याचे उघड झाले. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली