शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

By संदीप प्रधान | Updated: May 9, 2018 00:06 IST

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय.

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय. स्वागतिकेचा चेहरा (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दिवसभर बौद्धिक ऐकल्यावर होतो तसा) लांब झाला. चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह घेऊन ती अमित शहा यांच्याकडे गेली. अमितभाई, बाहेर कुणीतरी डॉ. विश्वामित्र आलेत. ते भलतेच काहीतरी बडबडत आहेत. मला काही समजत नाही. त्यांना तुमच्याकडे पाठवू का? अमितभार्इंनी आपले टक्कल कराकरा खाजवले. चेहरा वेडावाकडा केला. स्वागतिकेला न बोलताच इशारा मिळाला. मात्र, तोवर बाहेर सुरक्षारक्षकांचा गलका ऐकू आला आणि दरवाजातून डॉ. विश्वामित्र चक्क आत घुसले. अखेर, मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो तर... विश्वामित्र हसत पुटपुटले. शहांनी खिशातून रुमाल काढून घाम पुसला. लक्ष्यापर्यंत पोहोचलो म्हणजे, काय म्हणायचे काय आहे तुम्हाला? शहांनी संशयाने पाहत प्रश्न केला. घाबरू नका. आपण सारे त्या नियतीदेवीची मुलं आहोत. तिच्या हातातील कळसूत्री बाहुल्या. अमितभाई, तुम्ही मागच्या जन्मात एका पक्षाचे प्रमुख होतात आणि चक्क स्त्री होतात. (अमितभाई सुटलेले पोट दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतात) आपले पंतप्रधान नरेंद्रभाई हे मागच्या जन्मातही पंतप्रधान होते. मात्र, मागच्या जन्मात ते कुशाग्र बुद्धीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या जन्मात ज्या ज्या घटना घडल्या, त्या त्या घटना तशातशा पुन्हा घडू लागल्या आहेत. म्हणजे... अमितभार्इंनी घोगºया आवाजात प्रश्न केला. वेट वेट माय बॉय. इतकी घाई करू नको. गोष्ट फार गुंतागुंतीची आहे. त्यावेळी एका मुलीची काही नराधमांनी बलात्कार करून हत्या केली होती. समाजमन बिथरले होते. वारूळ फुटल्यानं मुंग्या सैरावैरा पळाव्या व त्यांनी डंख मारण्याकरिता त्वेषानं चाल करावी, तसं घडलं होतं. आताही एक कोवळ्या निष्पाप जीवाच्या बाबतीत तेच घडलं. मेणबत्ती मोर्चे निघाले. सोशल मीडियावर संतापानं काहिली झाली. त्या जन्मात काही दिग्विजयी मंडळींच्या वक्तव्यानं काहूर माजलं होतं. आता तर वाचाळवीरांनी कहर केलाय. नारद काय, गणपतीची प्लास्टिक सर्जरी काय, सापेक्षतावादाचा सिद्धांत काय, त्यावेळी पंतप्रधान एक शब्द बोलले असते, तर पुढचे सारे घडायचे टळले असते. मी खूप प्रयत्न केला. आताही तेच, अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन आणि शौचालये, सफाई, डिजिटलायझेशन, सॅनिटरी नॅपकीन यावर अखंड बडबड. पण, हे तुम्ही थांबवू शकता. अमितभार्इंनी ‘कसे काय’, असा चाचरत प्रश्न केला. फक्त एकदा तुम्ही नरेंद्रभार्इंकडे जा आणि त्यांना म्हणा की, नोटाबंदी, रोहित वेमुला, कठुआ, नीरव मोदी, राफेल डील आणि जय शहाबद्दल बोला. मौन संपवा. आता अमितभाई लालबुंद झाले. त्यांनी डॉ. विश्वामित्राच्या बखोटीला धरून त्याला केबिनबाहेर आणले आणि ‘पागल कही का’, असं जोरात किंचाळले. क्षणार्धात डॉक्टरची दाढी, मिशा व केसांचा विग कार्यकर्त्यांच्या हाती लागला. तो वैफल्यग्रस्त भक्त असल्याचे उघड झाले. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली