शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

महाराष्ट्राच्या इभ्रतीशी खेळणे बंद करा!

By विजय दर्डा | Updated: October 25, 2021 08:58 IST

माजी गृहमंत्री सीबीआयला सापडत नाहीत, राज्याचे पोलीस आपल्या जुन्या प्रमुखाला शोधू शकत नाहीत. महाराष्ट्रात काय चाललेय हे?

- विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

अलीकडे मी जिथे कुठे जातो; मग तो देशाचा एखादा भाग असेल किंवा विदेशातला, लोक एकच प्रश्न विचारतात, महाराष्ट्रात काय चाललेय? या प्रश्नाचे काय उत्तर देऊ? दु:ख होते, संताप येतो. काही लोकांमुळे आमचा प्रदेश, देश दुनियेत बदनाम होत आहे. घाणेरडे राजकारण आणि अमली पदार्थांमुळे महाराष्ट्रातले वातावरण दूषित झाले आहे. प्रशासनही या दुष्टचक्राचे शिकार झाले आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या प्रगतीवर होत आहे. प्रगतीत अडसर ठरणाऱ्यांना मी केवळ इतकेच सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या प्रगतीशी चालणारा हा खेळ बंद करा. राज्यावरील बदनामीच्या डागाने लोक दुखावले गेले आहेत. 

मी असा काळ पाहिलाय, जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाची कहाणी प्रत्यक्ष अनुभविण्यासाठी इतर राज्यांचे अधिकारी, राजकीय नेते राज्याच्या दौऱ्यावर येत असत. उभ्या देशात महाराष्ट्र पोलीस सर्वश्रेष्ठ मानले जात. मात्र आजची स्थिती गंभीर प्रश्न उपस्थित करते आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या आणि गृहमंत्री महिन्याला १०० कोटींची वसुली करून आणायला सांगत, असा आरोप करणाऱ्या परमवीर सिंग यांना महाराष्ट्र पोलीस शोधत आहेत.  परमवीर यांना जमिनीने गिळले की आकाशाने गडप केले, कळायला मार्ग नाही. ज्यांच्यावर आरोप होता, ते गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देऊन कुठे गायब झाले माहीत नाही. सीबीआय त्यांनाही शोधत आहे. लुक आऊट नोटीस जारी झाली आहे, तरी ते सापडत नाहीत. त्यांना शोधणे सीबीआयला अशक्य आहे काय? काहीही असो, इतके नक्की की, दोघांच्या गायब होण्याच्या कहाणीने महाराष्ट्राच्या कपाळी डाग लागला आहे. 

परमवीर यांच्या आरोपात किती दम आहे, देशमुख गृहमंत्रिपदावर असताना त्यांनी खरेच अशी वसुली करायला सांगितले होते का, हे वेळ येईल तेव्हा न्यायिक प्रक्रियेतून समोर येईल, परंतु या सगळ्या प्रक्रियेतून जी परिस्थिती निर्माण झाली, ती एका दुष्टचक्राकडेच बोट दाखवते. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि डीजीपी संजय पांडे  यांना सीबीआयने अलीकडेच समन्स पाठवले. ‘कॅश फॉर ट्रान्सफर डेटा लीक’ प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स पाठवले. कोण बरोबर आणि कोण चूक याविषयी मी काहीच म्हणत नाही, पण हे तर स्पष्टच आहे की, प्रशासनिक संस्था एकमेकांच्या विरुध्द उभ्या राहतात तेव्हा काय परिस्थिती उद्भवत असेल! आज महाराष्ट्र अशाच परिस्थितीशी झगडतो आहे. प्रत्यक्षात काम करणारे लोक ‘आपली केव्हाही शिकार होऊ शकते’ या दहशतीखाली आहेत. अशी स्थिती निर्माण होते तेव्हा प्रशासनावर त्याचा वाईट परिणाम होतो. कामकाज ठप्प होण्याची भीती असते. शेवटी याला जबाबदार कोण?  

अनिल देशमुख यांच्यावरील आरोप ज्याप्रकारे हाताळले जायला हवे होते, तसे हाताळले गेले नाहीत, हे म्हणायला मी मागेपुढे पाहणार नाही. त्यातून परिस्थिती आणखी बिघडली. प्रशासनिक पातळीवर जी पावले टाकायला हवी होती, ती टाकण्यात ढिलाई झाली. त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. महाराष्ट्रात भयंकर राजकीय लढाई लढली जाते आहे, हे लपवण्यात अर्थ नाही. यामध्ये बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली पावले कुठपर्यंत टाकायची आहेत, हे ध्यानात ठेवावे. प्रशासकीय संस्था महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या बळावर यंत्रणा टिकून असते. या संस्थांना कधीही कोणतीही झळ बसायला नको, परंतु विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.दुसरीकडे अमली पदार्थांमुळेही राज्य बदनाम होत आहे. मुंबई अमली पदार्थांचे केंद्र होताना दिसते आहे. अमली पदार्थविरोधी ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी अमली पदार्थांविरुद्ध मोर्चा उघडला, पण त्यांच्यावर राजकीय प्रहार होत आहेत. वानखेडे कोणासमोर वाकत नाहीत, ही त्यांची हिंमत वाखाणण्याजोगी आहे. 

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत १७ हजार कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले आहेत. ड्रग्जमाफिया त्यांचे नाव घेताच कापतात. भारताच्या तरुणाईला विनाशाच्या गर्तेत लोटणाऱ्या माफियांना धूळ चारतील अशा व्यक्तीला पूर्ण मदत केली पाहिजे. आरोपांबद्दल बोलायचे, तर महाराष्ट्राच्या रक्तातच ही सवय भिनत चालली आहे. राजकारणात आरोप होत राहतात, पण काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत. आज स्थिती अशी आहे की, ज्याला जे वाटेल ते तो बोलत सुटतो. हातात काही पुरावा असो नसो. मला वाटते, पुराव्याशिवाय आरोपांचा सिलसिला थांबला पाहिजे. आरोप करत आहात, तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी घ्या. नाही तर असे दिवस येतील, आरोप कोणी गांभीर्याने घेणारच नाही. सध्या जे चालले आहे, त्यामुळे राज्याच्या इभ्रतीला धक्का बसला आहे, हे माझे म्हणणे आपणही मान्य कराल. ते निपटायला जरा वेळ लागेल, पण सुरुवात तर झाली पाहिजे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राज्य मोठे की राजकारण, याचा शांततेत विचार केला पाहिजे. माझा आग्रह फक्त इतकाच आहे की, महाराष्ट्राच्या इज्जतीशी, सन्मानाशी कोणी खेळ करू नये.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी