शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवीकरण आता तरी थांबवा

By admin | Updated: February 20, 2016 02:30 IST

कोणत्याही मोहिमांचे केवळ उत्सवी उरूस भरवून तात्कालिक प्रसिद्धीवर समाधानाचा ढेकर देण्याची कार्यपद्धती अंगीकारली, तर काय होते हे ‘स्मार्ट सिटी’ची पहिली बस हुकल्याने नाशिककरांच्या लक्षात आले होतेच

कोणत्याही मोहिमांचे केवळ उत्सवी उरूस भरवून तात्कालिक प्रसिद्धीवर समाधानाचा ढेकर देण्याची कार्यपद्धती अंगीकारली, तर काय होते हे ‘स्मार्ट सिटी’ची पहिली बस हुकल्याने नाशिककरांच्या लक्षात आले होतेच, आता त्यापाठोपाठ ‘स्वच्छ भारत अभियाना’तही गटांगळीच खाल्ल्याने त्यावर जणू शिक्कामोर्तब होऊन गेले आहे. कारण ‘स्मार्टनेस’ची स्वप्ने तर खूप उशिरा पडू लागली होती; परंतु तत्पूर्वी ‘स्वच्छ व सुंदर नाशिक’च्या घोषणा करून व त्याबाबत एकेक दिवसीय स्वच्छता मोहिमा राबवून जी आरंभशूरता प्रदर्शिली गेली त्यात सातत्य राखले न गेल्यानेच नाशकातील अस्वच्छता चव्हाट्यावर येऊन गेली आहे.केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या उदयोन्मुख शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश असल्याने एकीकडे येथील विकासाच्या तसेच गुंतवणुकीच्या संधी वाढणे अपेक्षित असतानाच दुसरीकडे केंद्राच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत करण्यात आलेल्या देशभरातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत नाशिक ३१व्या क्रमांकावर राहिल्याने कसे ठरणार नाशिक स्मार्ट असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या वीस शहरांमध्ये महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश असून, नाशिकचा नंबर त्याही खाली आहे. अगदी अलीकडेच पार पडलेल्या सिंहस्थ - कुंभमेळ्याच्या शाही पर्वण्यांचे उत्कृष्ट नियोजन व त्यादरम्यान राखल्या गेलेल्या स्वच्छतेबाबत मुख्यमंत्र्यापासून ते परदेशस्थ संस्थांपर्यंत, साऱ्यांकडून पाठ थोपटून झालेल्या नाशिकच्या कारभाऱ्यांची ही पाठ स्वच्छताविषयक सर्वेक्षणाच्या निमित्ताने मात्र उघडी पडली, कारण समाजमन असो की शासकीय कार्यशैली, स्वच्छतेबाबत प्रामाणिक व सातत्यपूर्वक प्रयत्न केले जाण्याऐवजी केवळ दिखावूपणाच प्रदर्शिला गेलेला दिसून आला. ‘स्मार्ट नाशिक’च्या स्पर्धेत धावण्यापूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अशीच एक प्रदर्शनी स्वच्छता मोहीम राबविली गेली होती. महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीणकुमार गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन आदि भल्याभल्यांनी नाका-तोंडाला पट्ट्या बांधत यात सहभाग घेतला. पण त्या दिवसानंतर अधिकारी, त्यांच्या अखत्यारितील शासकीय यंत्रणा व त्यांना साथ देणाऱ्या सामाजिक संस्था-संघटनांनीही स्वच्छतेतील ‘स्व’ उच्चारल्याचे कधी दिसले नाही. म्हणूनच जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या पुढाकाराने नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाशकातून चेतना यात्रा काढण्यात येत असतानाच नाशकातील गोदावरी पाणवेली व शेवाळाने व्यापलेली दिसून आली. शेवटी स्वच्छतेसारखी बाब केवळ एका मोहिमेने साधणे शक्यच नाही. त्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न व जागृती होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांची स्वयंसहभागाची साथ लाभणेही त्यासाठी अपेक्षित आहे.बुडत्याचा पाय खोलात!नऊ मीटरपर्यंतच्या रस्त्यावरील प्लॉटधारकांना ‘टीडीआर’ नाकारण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्यामुळे भाजपाबद्दलच्या नाराजीत भर पडून गेली आहे. महापालिकेच्या महासभेत या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात असताना शिवसेनेने स्वत:ला लोकांबरोबर ठेवले त्यामुळे याही प्रकरणी भाजपा एकाकी पडली. आरोग्य विद्यापीठातील काही विद्याशाखा, वनविभागाचे कार्यालय तसेच एकलहऱ्यातील वाढीव वीजनिर्मिती प्रकल्प नागपुरात स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू असल्याने तसेही नाशिककर संतप्त असून, या ‘पळवापळवी’च्या विरोधात ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. अशात ‘टीडीआर’चे नवीन धोरण आल्याने या संतापात भर पडली आहे. यामुळे नाशकातून निवडून गेलेल्या तीनही भाजपा आमदारांची मोठी अडचण झाली आहे. भाजपाला नाशिक राखायचे आहे की नाही, असा प्रश्न त्यातून विचारला जात असून, शिवसेनेसाठी ही स्थिती अधिक अनुकूल ठरल्यास आश्चर्य वाटू नये.- किरण अग्रवाल