शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

आता तरी बीटी घालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:46 PM

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतकरी वा शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातही आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत. विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांची संख्या तर कितीतरी पट अधिक आहे. एका अर्थाने हे सगळे बीटी कपाशीचे बळी आहेत. कपाशीचे सर्वाधिक नुकसान करणाºया बोंडअळीला प्रतिबंध करणारे बियाणे म्हणून बीटी कपाशीची प्रचंड भलावण केल्या गेली. प्रारंभीच्या काळात बीटी बियाण्यांमुळे शेतकºयांचा कीटकनाशकांवरील खर्च कमी झालाही; पण लवकरच बीटी कपाशीवरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. यावर्षी तर प्रतिकूल पर्जन्यमान व हवामानामुळे बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. परिणामी मनाई असलेल्या व अपवादात्मक स्थितीत वापरावयाच्या अतिजहाल कीटकनाशकांची बेसुमार फवारणी झाली आणि त्याचाच परिपाक मोठ्या प्रमाणातील मृत्यूंच्या रूपाने समोर आला आहे. वास्तविक बीटी कपाशीचे भारतात आगमन झाले त्यावेळीच डॉ. वंदना शिवांसारख्या पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केला होता; परंतु त्यांना कुणी जुमानले नाही. बीटी कपाशी बियाणे अपयशी सिद्ध झाल्याची कबुली, ते बियाणे भारतात आणणाºया बहुराष्ट्रीय कंपनीने २०१० मध्येच दिली होती. गुलाबी बोंडअळीने स्वत:मध्ये बीटी प्रतिबंधक क्षमता विकसित केल्याचे सदर कंपनीने आनुवंशिक अभियांत्रिकी मान्यता समिती म्हणजेच जीईएसीला अधिकृतरीत्या कळविले होते. बीटी बियाण्याच्या अपयशाचा दृश्य परिणाम हा आहे, की २००६ च्या तुलनेत २०१३ मध्ये कीटकनाशकांचा वापर जवळपास तिप्पट झाला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार २००६ मध्ये देशात एकूण ४६०० मेट्रिक टन कीटकनाशकांचा वापर झाला, तर २०१३ मध्ये तो ११५९८ मेट्रिक टनांवर पोहचला. बीटी कपाशीचे अपयश सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की गत काही वर्षात राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्येही बीटी कपाशीची भूमिका आहे. उपलब्ध आकडेवारी व वस्तुस्थितीचे विश्लेषण असे दाखविते, की ज्या भागात बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याच भागांमध्येच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, सरकारने आता तरी या जीवघेण्या बियाण्यांवर अविलंब बंदी लादावी!

टॅग्स :Farmerशेतकरी