शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Nashik Oxygen Leak: विशेष संपादकीय: वेदनादायी दुर्घटनांची साखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:33 IST

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार नाशिकच्या घटनेची चौकशी होईल, दोषींना शिक्षाही होईल. पण, गेलेले जीव परत येणार नाहीत.

मुंबई, पुण्यासाेबतच्या सुवर्ण त्रिकोणातील समृद्ध नाशिकमध्ये महापालिकेच्या इस्पितळात टाकीतून ऑक्सिजनची गळती होते, प्राणवायूचा पुरवठा खंडित होतो अन् किड्यामुंग्यासारखे तडफडून कोविड-१९ संसर्गावर उपचार घेणाऱ्या २४ अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होतो, हे महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाचे अपयश केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, तर सामान्यांच्या प्राणांबद्दल इतकी बेफिकिरी दाखविणे हे पापच आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार नाशिकच्या घटनेची चौकशी होईल, दोषींना शिक्षाही होईल. पण, गेलेले जीव परत येणार नाहीत. ही दुर्घटना काळीज गोठवणारी आहे. ज्यांनी रक्ताची माणसे गमावली त्यांचे ते अपार दु:ख वाटून घेण्याचीदेखील ही वेळ आहे. शिवाय, महामारीचा, आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी आपण अजिबात सक्षम नाही, आरोग्य व्यवस्थेची जणू चाळणी झाल्याचेही पुन्हा या घटनेने अधोरेखित केले आहे. गेल्या काही दिवसांत भंडारा, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी आग व अन्य अपघात घडल्यानंतरही यंत्रणेने धडा घेऊ नये, ही दुर्घटनांची मालिका थांबू नये, हे अधिक वेदनादायी आहे. काहीही करा, पण कोरोनाच्या साखळीआधी ही अपघातांची साखळी तोडा, माणसांचे असे जीव जाणे थांबवा!

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती